शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

जादा दराने खत विक्री झाल्यास कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:27 IST

सातारा : रासायनिक खतांच्या किंमती कमी झाल्यानंतर पोत्यांवरील वाढीव दर एमआरपीचा फायदा घेत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची लुबाडणूक होत ...

सातारा : रासायनिक खतांच्या किंमती कमी झाल्यानंतर पोत्यांवरील वाढीव दर एमआरपीचा फायदा घेत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची लुबाडणूक होत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या कृषी समिती सभेत चर्चा झाली. यानंतर सभापती मंगेश धुमाळ यांनी कारवाईची सूचना केली. तसेच खरीप हंगामात खते व बियाणे साठा मुबलक आहे. टंचाई भासणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची मासिक सभा सभापती मंगेश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. या सभेस जिल्हा कृषी विकास अधिकारी विनायक पवार, अनिल काळे, सदस्य राजेश पवार, प्रतीक कदम, सुरेखा जाधव, प्रियांका ठावरे, आदी उपस्थित होते.

या सभेत प्रारंभी खरीप हंगामाचा आढावा घेण्यात आला. सद्यपरिस्थितीत खतांच्या किमती कमी होऊनही पोत्यांवर एमआरपी असल्याचे सांगून त्या दराने विक्री होत असल्याची तक्रार काही सदस्यांनी केली. वास्तविक केंद्र सरकारने खतांच्या किमती कमी केल्यानंतर सध्याच्या दराने विक्री होणे आवश्यक असतानाही काही ठिकाणी शेतकऱ्यांची लुबाडणूक होत आहे. याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी आल्या होत्या. यासाठी कृषी विभागाने ठोस पावले उचलली असून वाढीव दराने खत विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना केली आहे, असे मंगेश धुमाळ यांनी सांगितले.

जिल्ह्यात तालुकानिहाय घेतल्या जाणाऱ्या पिकांनुसार अनुदानावर डीबीटीच्या माध्यमातून वाटाणा, सोयाबीन, भात, बाजरी, मका बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी याबाबत पंचायत समिती स्तरावर नोंदणी करावी. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मेलद्वारे नोंदणी करावी. लॉकडाऊन उठल्यानंतर याबाबतची हार्ड कॉपी द्यावी, असेही धुमाळ यांनी स्पष्ट केले.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खते, बियाणे यांची टंचाई भासू नये, यासाठी कृषी विभागाकडून तालुकानिहाय आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी विनायक पवार यांनी सांगितले.

.........................................................................