शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
3
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
4
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
5
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
6
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
7
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
8
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
9
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
10
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
11
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
12
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
13
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
14
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
15
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
16
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
17
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
18
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
19
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
20
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...

सातारकरांचा टाहो.. रस्ता नको; धूळ आवरा

By admin | Updated: February 4, 2015 23:56 IST

प्राचीन ‘कार्य’संस्कृतीचा शोध : चार वर्षांच्या उत्खननामुळे हाडे खिळखिळी; रुमाल नाकाला-गाडी गॅरेजला

सातारा : मोहेंजोदाडोप्रमाणे प्राचीन संस्कृतीचा शोध घेण्यासाठी साताऱ्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले उत्खनन अजूनही संपलेले नाही. सर्व यंत्रणा ‘भूमिगत’ करणारे सातारा हे जणू एकमेव शहर असून, तेच ते रस्ते वारंवार खोदावे लागणे ही ‘अपरिहार्यता’ बनली आहे. अर्थात, खोदकाम कंत्राटदार वगळता कोणताही समाजघटक या उत्खननास अनुकूल नाही. कारण गेल्या चार वर्षांत ‘रुमाल नाकाला-गाडी गॅरेजला’ अशी स्थिती सामान्य सातारकरांची झाली आहे.हडप्पा-मोहेंजोदाडोप्रमाणे प्राचीन संस्कृतीचा शोध लागो न लागो; प्राचीन ‘कार्य’संस्कृतीचा शोध मात्र सातारकरांना लागला आहे. कोणत्याही शहरात कधीच पाहिली नाही, अशी ही कार्यसंस्कृती चार वर्षांहून अधिक काळ संतप्त सातारकरांचा मुकाबला करत अजूनही खिंड (नव्हे खड्डे) लढवीतच आहे. भूमिगत कामे संपली; आता नवे रस्ते होणार... आता कोणालाही कोणत्याही कामासाठी खोदकामाची परवानगी दिली जाणार नाही, असे इशारे ऐकून सीलकोटचे गुळगुळीत रस्ते सातारकरांच्या स्वप्नात येऊ लागले; परंतु हे स्वप्नही आता भंगले आहे. भानावर आलेले सातारकर पुन्हा एकदा नाकाला रुमाल लावून सज्ज झाले आहेत. काही ठिकाणी सीलकोटही यांत्रिक टिकावासमोर टिकाव धरू शकले नाहीत. महाराष्ट्र ‘आ’जीवन प्राधिकरणाने आपल्या शब्दकोशातच ‘अंतिम मुदत’ हा शब्द नसल्याचे सिद्ध करून दाखविले. मे महिन्याच्या १५ तारखेची मुदत सलग तीन वर्षे निग्रहाने धुडकावून लावली. नागरिकांसह नगरसेवकांचाही रोष खुल्या दिलाने झेलला; पण कार्यशैलीत बदल केला नाही. ‘महावितरण’नेही उत्खननात सहभाग घेतला आणि अ‍ॅनाकोंडासारख्या जाडजूड वाहिन्या जमिनीखाली पसरल्या. त्यांचे अवशेष कुठेकुठे रस्त्याच्या वरही दिसतात. रिलायन्सने उत्खनन करायचे की नाही, यावर बराच खल झाला. बीएसएनएलने मधल्या मध्ये आपला ‘वाटा’ उचलला. इतक्या वेळा रस्ते वेगवेगळ्या कारणांसाठी खोदले गेल्यानंतर आता एखादा रस्ता कोणत्या कारणासाठी, कोणत्या यंत्रणेमार्फत खोदला जात आहे, हेही कळेनासे झाले आहे. अर्थात, सातारकरांना त्यात रसही राहिलेला नाही. फक्त रस्ता खोदला जातो आहे, एवढेच नागरिक हताशपणे पाहतात. हाडे खिळखिळी होणे, गाड्यांची वाट लागणे, नाका-तोंडात धूळ जाऊन वेगवेगळ््या आजारांचा मुकाबला करावा लागणे, अशा प्रयोगांनी सातारकर भलतेच ‘टणक’ झाले आहेत. काही ठिकाणी एकाशेजारी एक असे दोन समांतर चर एकाच वेळी खणल्याचे उघड्या डोळ्यांनी पाहावे लागत आहे, तर काही ठिकाणी रस्ता दोन्ही बाजूंनी दोन वेगवेगळ्या कारणांसाठी खोदला गेला आहे. टायरविक्रेते आणि गॅरेजवाल्यांचा मात्र फायदा झाला आहे. (प्रतिनिधी)खोदकाम कुणाला फायदेशीर?शहरात वर्षानुवर्षे सतत सुरू असलेले खोदकाम कुणाच्यातरी दृष्टीने फायदेशीर असणार, असा आरोप नागरिकांकडून आता होऊ लागला आहे. चार वर्षांपासून एका पाठोपाठ एक रस्ते खोदले गेले. मुजवले गेले. पुन्हा दुसऱ्या यंत्रणेकडून खोदले गेले. सर्व कामे एकाच वेळी करता येणे शक्य नव्हते का, असा प्रश्नही वारंवार विचारला गेला. मात्र, त्यालाही उत्तर न देता ‘प्राचीन कार्यसंस्कृती’ सुरूच राहिली. आता मुख्य रस्त्यांनी सीलकोटची मऊ शाल पांघरायला सुरुवात केली असताना पुन्हा एकदा खोदकामे सुरू झाल्याने ते नक्कीच कुणाच्यातरी पथ्यावर पडते आहे, अशी उघड चर्चा सातारकर करू लागले आहेत.