शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा झाला कमी; साखर महागली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:45 IST

नितीन काळेल लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मागील काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या साखरेचा दर वाढू लागला आहे. सणामुळे असणारी ...

नितीन काळेल

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : मागील काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या साखरेचा दर वाढू लागला आहे. सणामुळे असणारी मागणी व पाश्चात्त्य देशातही दर वाढल्याने निर्यातीला चालना मिळू शकते. या कारणांनी क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची वाढ आहे. त्यामुळे बाजारातही किरकोळ विक्रीचा किलोचा दर रुपयाने वाढला आहे. त्यामुळे ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा कमी होत चालला आहे, तसेच साखरेचा दर आणखी वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त होत आहे. यामुळे आगामी काळातील सणासुदीतही गोडवा कमीच होणार आहे.

..............

क्विंटलमध्ये...

जिल्ह्याला दररोज लागते साखर १००००

श्रावण महिन्यात मागणी वाढली १२०००

........................

साखरेचे दर (प्रति किलो)

जानेवारी ३४

फेब्रुवारी ३४

मार्च ३४

एप्रिल ३४

मे ३५

जून ३५

जुलै ३५

ऑगस्ट ३६

.......................................

का वाढले भाव...

मागील काही महिन्यांपासून साखरेचा दर स्थिर होता, पण आता सणाचे दिवस आहेत. त्यामुळे साखरेला मागणी वाढली आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून साखरेचा दर वाढत चालला आहे. क्विंटलमागे ५० रुपयांची वाढ आहे. त्यामुळे साखरेचा किरकोळ विक्री दर वाढविण्यात येऊ लागला आहे. येणाऱ्या काळात अनेक सण आहेत. त्यामुळे दर आणखी वाढू शकतो.

- संजय भोईटे, दुकानदार सातारा.

................................................

शासनाने महिन्याचा साखर कोटा कमी केली आहे. त्यातच सणाचे दिवस असल्याने साखरेला मागणी वाढत आहे. पाश्चात्त्य देशातही साखरेचे दर वाढले आहेत. त्यामुळे निर्यातीला चालना व एमएसपी वाढू शकते. त्यामुळे होलसेल साखरेचा भाव क्विंटलला ५० ते ६० रुपयांनी, तर एम ग्रेडचा दर १०० रुपयांनी वाढला आहे. दरात आणखी वाढ होऊ शकते.

- जितेंद्र देवदारे, साखरेचे होलसेल व्यापारी, सातारा.

......................................................

महिन्याचे बजेट वाढले...

मागील काही महिन्यांपासून भाज्यांचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे घर खर्चाचे बजेट कोलमडलेले आहे. त्यातच डाळींच्या दरात थोडी वाढ झाली असतानाच आता साखरही महाग झाली आहे. आता सणाचे दिवस आहेत. त्यामुळे साखरेची जादा खरेदी करावी लागते. त्यातच दर वाढीने महिन्याचे बजेट कोलमडले आहे.

- कविता पाटील, गृहिणी.

................

कोरोना विषाणूच्या संकटामुळे लोकांची कामे गेली. त्याचबरोबर या संकटामुळे महागाईही आली. घरात भाजीपाला, डाळी अन् साखरच अधिक लागते. भाजी आणि डाळींचे दर अगोदरच वाढले आहेत. त्यातच आता साखरेचा दर किलोमागे एक रुपयाने वाढला असला तरी आणखी महाग होऊ शकते. त्यामुळे घरखर्चावर मर्यादा आलेल्या आहेत.

- सुनीता कुऱ्हाडे, गृहिणी.

...............................................................