शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा झाला कमी; साखर महागली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:45 IST

नितीन काळेल लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मागील काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या साखरेचा दर वाढू लागला आहे. सणामुळे असणारी ...

नितीन काळेल

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : मागील काही महिन्यांपासून स्थिर असलेल्या साखरेचा दर वाढू लागला आहे. सणामुळे असणारी मागणी व पाश्चात्त्य देशातही दर वाढल्याने निर्यातीला चालना मिळू शकते. या कारणांनी क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची वाढ आहे. त्यामुळे बाजारातही किरकोळ विक्रीचा किलोचा दर रुपयाने वाढला आहे. त्यामुळे ऐन श्रावणात सणासुदीचा गोडवा कमी होत चालला आहे, तसेच साखरेचा दर आणखी वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त होत आहे. यामुळे आगामी काळातील सणासुदीतही गोडवा कमीच होणार आहे.

..............

क्विंटलमध्ये...

जिल्ह्याला दररोज लागते साखर १००००

श्रावण महिन्यात मागणी वाढली १२०००

........................

साखरेचे दर (प्रति किलो)

जानेवारी ३४

फेब्रुवारी ३४

मार्च ३४

एप्रिल ३४

मे ३५

जून ३५

जुलै ३५

ऑगस्ट ३६

.......................................

का वाढले भाव...

मागील काही महिन्यांपासून साखरेचा दर स्थिर होता, पण आता सणाचे दिवस आहेत. त्यामुळे साखरेला मागणी वाढली आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून साखरेचा दर वाढत चालला आहे. क्विंटलमागे ५० रुपयांची वाढ आहे. त्यामुळे साखरेचा किरकोळ विक्री दर वाढविण्यात येऊ लागला आहे. येणाऱ्या काळात अनेक सण आहेत. त्यामुळे दर आणखी वाढू शकतो.

- संजय भोईटे, दुकानदार सातारा.

................................................

शासनाने महिन्याचा साखर कोटा कमी केली आहे. त्यातच सणाचे दिवस असल्याने साखरेला मागणी वाढत आहे. पाश्चात्त्य देशातही साखरेचे दर वाढले आहेत. त्यामुळे निर्यातीला चालना व एमएसपी वाढू शकते. त्यामुळे होलसेल साखरेचा भाव क्विंटलला ५० ते ६० रुपयांनी, तर एम ग्रेडचा दर १०० रुपयांनी वाढला आहे. दरात आणखी वाढ होऊ शकते.

- जितेंद्र देवदारे, साखरेचे होलसेल व्यापारी, सातारा.

......................................................

महिन्याचे बजेट वाढले...

मागील काही महिन्यांपासून भाज्यांचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे घर खर्चाचे बजेट कोलमडलेले आहे. त्यातच डाळींच्या दरात थोडी वाढ झाली असतानाच आता साखरही महाग झाली आहे. आता सणाचे दिवस आहेत. त्यामुळे साखरेची जादा खरेदी करावी लागते. त्यातच दर वाढीने महिन्याचे बजेट कोलमडले आहे.

- कविता पाटील, गृहिणी.

................

कोरोना विषाणूच्या संकटामुळे लोकांची कामे गेली. त्याचबरोबर या संकटामुळे महागाईही आली. घरात भाजीपाला, डाळी अन् साखरच अधिक लागते. भाजी आणि डाळींचे दर अगोदरच वाढले आहेत. त्यातच आता साखरेचा दर किलोमागे एक रुपयाने वाढला असला तरी आणखी महाग होऊ शकते. त्यामुळे घरखर्चावर मर्यादा आलेल्या आहेत.

- सुनीता कुऱ्हाडे, गृहिणी.

...............................................................