शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळबाधितांच्या निधीसाठी ‘स्वाभिमानी’चा ठिय्या !

By admin | Updated: May 25, 2016 23:29 IST

कऱ्हाडात आंदोलन : तहसीलदारांना निवेदन; प्रशासनातील हलगर्जीपणा

कऱ्हाड : मसूरपूर्व भागातील काही दुष्काळबाधित गावांमधील शेतकऱ्यांना प्रशासनातील हगर्जीपणामुळे अद्यापही दुष्काळी निधी मिळालेला नाही. गावातील गावकामगार तलाठी, सर्कल अधिकारी यांच्या चुकीच्या नोंदीमुळे व कामचुकारामुळे बरचसे शेतकरी दुष्काळी निधीपासून वंचित राहिले आहेत. अशा शेतकऱ्यांना तत्काळ निधी द्या, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कऱ्हाड उत्तरचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे, योगेश झांबरे, राजेंद्र पाटील, प्रवीण शिंदे, तुकाराम कुंभार, आप्पासो शिंदे, सुखदेव शिंदे, रमेश पाटील, पोपट जाधव आदींसह संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.नायब तहसीलदार मिनल भामरे-भोसले यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दुष्काळी निधी वाटपाबाबतचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासन शेतकऱ्यांना दुष्काळी निधी देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, प्रशासनातील काही ठराविक लोकांच्या गैरकारभारामुळे दुष्काळी निधी हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. पीक-पाण्याच्या चुकीच्या नोंदी करणे, शेतकऱ्यांचे चुकीचे बँक खाते क्रमांक देणे तसेच खातेदारांच्या नावांमध्ये चुका करणे, अशा प्रकारची कामे केल्यामुळे शेतकऱ्यांना निधी मिळालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे आज विदर्भ, मराठवाड्यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये मात्र, या आत्महत्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होऊ नयेत याची दक्षता घेऊन लवकरात लवकर मदत निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्यावा. (प्रतिनिधी) कऱ्हाड तहसीलसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.