शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

दुष्काळबाधितांच्या निधीसाठी ‘स्वाभिमानी’चा ठिय्या !

By admin | Updated: May 25, 2016 23:29 IST

कऱ्हाडात आंदोलन : तहसीलदारांना निवेदन; प्रशासनातील हलगर्जीपणा

कऱ्हाड : मसूरपूर्व भागातील काही दुष्काळबाधित गावांमधील शेतकऱ्यांना प्रशासनातील हगर्जीपणामुळे अद्यापही दुष्काळी निधी मिळालेला नाही. गावातील गावकामगार तलाठी, सर्कल अधिकारी यांच्या चुकीच्या नोंदीमुळे व कामचुकारामुळे बरचसे शेतकरी दुष्काळी निधीपासून वंचित राहिले आहेत. अशा शेतकऱ्यांना तत्काळ निधी द्या, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कऱ्हाड उत्तरचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे, योगेश झांबरे, राजेंद्र पाटील, प्रवीण शिंदे, तुकाराम कुंभार, आप्पासो शिंदे, सुखदेव शिंदे, रमेश पाटील, पोपट जाधव आदींसह संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.नायब तहसीलदार मिनल भामरे-भोसले यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दुष्काळी निधी वाटपाबाबतचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासन शेतकऱ्यांना दुष्काळी निधी देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, प्रशासनातील काही ठराविक लोकांच्या गैरकारभारामुळे दुष्काळी निधी हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. पीक-पाण्याच्या चुकीच्या नोंदी करणे, शेतकऱ्यांचे चुकीचे बँक खाते क्रमांक देणे तसेच खातेदारांच्या नावांमध्ये चुका करणे, अशा प्रकारची कामे केल्यामुळे शेतकऱ्यांना निधी मिळालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे आज विदर्भ, मराठवाड्यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये मात्र, या आत्महत्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे होऊ नयेत याची दक्षता घेऊन लवकरात लवकर मदत निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्यावा. (प्रतिनिधी) कऱ्हाड तहसीलसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.