शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सूर्यनारायणाच्या साक्षीनं ‘मॉर्निंग वॉक’

By admin | Updated: August 11, 2015 00:03 IST

अफवा बंद; पण भीती कायम : अंधारात बाहेर पडण्यास घाबरतायत नागरिक--फेकूगिरीची ‘सोशल’ कथा

माणिक डोंगरे -मलकापूर  चोरट्यांच्या अफवेने गत महिना ढवळून निघाला. सध्या अफवा बंद झाल्या असल्या तरी चोरट्यांची भीती मात्र कायम आहे. आजही गावाला येणारा पाहुणा किंवा आडरानातील व्यावसायिक नऊच्या आत घरात येत आहेत. शहरात मॉर्निंग वॉकला बाहेर पडणारे भीतीपोटी सूर्यनारायणाच्या साक्षीनेच बाहेर पडत आहेत. जुन-जुलै महिन्यांत कऱ्हाड तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये चोरटे दिसल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. कापील, काले, धोंडेवाडी, नांदलापूर, आटके यासह परिसरातील विविध गावांमध्ये घरांवर दगड पडण्याचे प्रकारही घडले. रानात काम करण्यासाठी गेलेल्या मजुरांना उसात चोरटे दिसल्याचे सांगितले गेले; रात्र गस्त वाढल्या. दिवसा काम व रात्री जागरण करून नागरिक हैराण झाले होते. पाचवड फट्यानजीक चार फिरस्त्यांना चोर समजून युवकांनी बेदम चोप दिला होता. तर रात्रीच्या वेळी आलेल्या पाहुण्यांनाही चोर समजून प्रसाद देण्यात आला.या घटनांमध्ये किती प्रमाणात सत्यता आहे. किती प्रमाणात अफवा आहेत, हे आजतागायत कोणालाही उमगलेले नाही. पाचवड फाटा, धोंडेवाडी फाटा, आटके टप्पा अशा महामार्ग व राज्य मार्गालगतच्या; पण आडरानातील व्यावसायिकांनी तर आठ वाजताच दुकाने बंद करून घर गाठणे सुरू केले आहे. त्याचबरोबर पाहुणा नऊच्या आत घरात पोहोचू लागला आहे. सूर्यनारायणाच्या साक्षीनेच उजाडल्यानंतरच मॉर्निंग वॉकला जाणे पसंत करत आहेत. फिरस्त्या विक्रेत्यांना ओळखपत्रे द्यावीतसातारा : चोरीच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर फिरस्त्या विक्रेत्यांना व्यवसाय करणे कठीण झाले असून, त्यांची उपासमार टाळण्यासाठी पोलिसांनी त्यांना ओळखपत्रे किंवा शिफारसपत्रे द्यावीत, अशी मागणी करणारे निवेदन ‘सिटू’शी संलग्न असलेल्या जिल्हा जनरल वर्कर्स युनियनच्या वतीने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना सोमवारी देण्यात आले.संबंधित विक्रेत्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय ‘सिटू’ने घेतला असल्याचेही वृत्तात म्हटले होते. ‘सिटू’चे जिल्हाध्यक्ष वसंत नलावडे, कोषाध्यक्ष सलीम आतार आणि फिरस्त्यांच्या प्रतिनिधींनी मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले. संघटनेने प्रत्यक्ष वस्तीत जाऊन खातरजमा केली असून, फिरस्त्यांशी लोक संशयाने वागत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली आहे. पोलिसांनी लक्ष घालून फिरत्या विक्रेत्यांना ओळखपत्रे किंवा त्यांचे फोटो असलेले पत्र द्यावे, तसेच त्यांच्या अडवणुकीविषयी कार्यवाही करावी, असे पत्रात म्हटले आहे. मजुरांचा तुटवडाकापील-गोळेश्वर, जखिणवाडी, मलकापूर, काले या शहरालगतच्या गावांतील शेतकरी ऊस उत्पादनाऐवजी पालेभाज्या व फळभाज्यांची पिके घेण्याकडे वळला आहे. या पिकांचे संगोपन व काढणी वेळेत होणे गरजेचे असते. चोरट्यांच्या अफवेमुळे महिला मजूर न मिळाल्याने सध्या अनेक कामे लांबणीवर पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचेही आर्थिक नुकसान झाले आहे. मजुरांचा तुटवडाकापील-गोळेश्वर, जखिणवाडी, मलकापूर, काले या शहरालगतच्या गावांतील शेतकरी ऊस उत्पादनाऐवजी पालेभाज्या व फळभाज्यांची पिके घेण्याकडे वळला आहे. या पिकांचे संगोपन व काढणी वेळेत होणे गरजेचे असते. चोरट्यांच्या अफवेमुळे महिला मजूर न मिळाल्याने सध्या अनेक कामे लांबणीवर पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचेही आर्थिक नुकसान झाले आहे.