शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यनारायणाच्या साक्षीनं ‘मॉर्निंग वॉक’

By admin | Updated: August 11, 2015 00:03 IST

अफवा बंद; पण भीती कायम : अंधारात बाहेर पडण्यास घाबरतायत नागरिक--फेकूगिरीची ‘सोशल’ कथा

माणिक डोंगरे -मलकापूर  चोरट्यांच्या अफवेने गत महिना ढवळून निघाला. सध्या अफवा बंद झाल्या असल्या तरी चोरट्यांची भीती मात्र कायम आहे. आजही गावाला येणारा पाहुणा किंवा आडरानातील व्यावसायिक नऊच्या आत घरात येत आहेत. शहरात मॉर्निंग वॉकला बाहेर पडणारे भीतीपोटी सूर्यनारायणाच्या साक्षीनेच बाहेर पडत आहेत. जुन-जुलै महिन्यांत कऱ्हाड तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये चोरटे दिसल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. कापील, काले, धोंडेवाडी, नांदलापूर, आटके यासह परिसरातील विविध गावांमध्ये घरांवर दगड पडण्याचे प्रकारही घडले. रानात काम करण्यासाठी गेलेल्या मजुरांना उसात चोरटे दिसल्याचे सांगितले गेले; रात्र गस्त वाढल्या. दिवसा काम व रात्री जागरण करून नागरिक हैराण झाले होते. पाचवड फट्यानजीक चार फिरस्त्यांना चोर समजून युवकांनी बेदम चोप दिला होता. तर रात्रीच्या वेळी आलेल्या पाहुण्यांनाही चोर समजून प्रसाद देण्यात आला.या घटनांमध्ये किती प्रमाणात सत्यता आहे. किती प्रमाणात अफवा आहेत, हे आजतागायत कोणालाही उमगलेले नाही. पाचवड फाटा, धोंडेवाडी फाटा, आटके टप्पा अशा महामार्ग व राज्य मार्गालगतच्या; पण आडरानातील व्यावसायिकांनी तर आठ वाजताच दुकाने बंद करून घर गाठणे सुरू केले आहे. त्याचबरोबर पाहुणा नऊच्या आत घरात पोहोचू लागला आहे. सूर्यनारायणाच्या साक्षीनेच उजाडल्यानंतरच मॉर्निंग वॉकला जाणे पसंत करत आहेत. फिरस्त्या विक्रेत्यांना ओळखपत्रे द्यावीतसातारा : चोरीच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर फिरस्त्या विक्रेत्यांना व्यवसाय करणे कठीण झाले असून, त्यांची उपासमार टाळण्यासाठी पोलिसांनी त्यांना ओळखपत्रे किंवा शिफारसपत्रे द्यावीत, अशी मागणी करणारे निवेदन ‘सिटू’शी संलग्न असलेल्या जिल्हा जनरल वर्कर्स युनियनच्या वतीने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना सोमवारी देण्यात आले.संबंधित विक्रेत्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय ‘सिटू’ने घेतला असल्याचेही वृत्तात म्हटले होते. ‘सिटू’चे जिल्हाध्यक्ष वसंत नलावडे, कोषाध्यक्ष सलीम आतार आणि फिरस्त्यांच्या प्रतिनिधींनी मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले. संघटनेने प्रत्यक्ष वस्तीत जाऊन खातरजमा केली असून, फिरस्त्यांशी लोक संशयाने वागत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली आहे. पोलिसांनी लक्ष घालून फिरत्या विक्रेत्यांना ओळखपत्रे किंवा त्यांचे फोटो असलेले पत्र द्यावे, तसेच त्यांच्या अडवणुकीविषयी कार्यवाही करावी, असे पत्रात म्हटले आहे. मजुरांचा तुटवडाकापील-गोळेश्वर, जखिणवाडी, मलकापूर, काले या शहरालगतच्या गावांतील शेतकरी ऊस उत्पादनाऐवजी पालेभाज्या व फळभाज्यांची पिके घेण्याकडे वळला आहे. या पिकांचे संगोपन व काढणी वेळेत होणे गरजेचे असते. चोरट्यांच्या अफवेमुळे महिला मजूर न मिळाल्याने सध्या अनेक कामे लांबणीवर पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचेही आर्थिक नुकसान झाले आहे. मजुरांचा तुटवडाकापील-गोळेश्वर, जखिणवाडी, मलकापूर, काले या शहरालगतच्या गावांतील शेतकरी ऊस उत्पादनाऐवजी पालेभाज्या व फळभाज्यांची पिके घेण्याकडे वळला आहे. या पिकांचे संगोपन व काढणी वेळेत होणे गरजेचे असते. चोरट्यांच्या अफवेमुळे महिला मजूर न मिळाल्याने सध्या अनेक कामे लांबणीवर पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचेही आर्थिक नुकसान झाले आहे.