शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
4
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
5
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
6
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
7
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
8
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
9
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
10
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
11
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
12
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
13
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
14
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
15
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
16
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
17
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
18
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
19
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
20
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?

परंपरा टिकविणे, खंडित करण्यात चढाओढ!

By admin | Updated: October 9, 2014 23:01 IST

माणमध्ये हातघाईची लढाई...

नितीन काळेल -- सातारा --जिल्ह्यातील आठही मतदारसंघात जवळपास पंचरंगी लढत होत असली तरी खऱ्या अर्थाने सामना रंगणार आहे तो काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप यांच्यामध्येच. उमेदवारांनी विजयासाठी आटापिटा सुरू केला असून यामध्ये विद्यमान सात आमदारांना पुन्हा विजयाचा ‘मान’ मिळणार का, हाच महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. अनेक मतदारसंघात एकच उमेदवार मागील काही वर्षांपासून निवडून येत आहे. काही ठिकाणी आलटून-पालटून आमदारकी मिळत आहे. मतदारसंघाची ही जय-पराजयाची परंपरा टिकविण्यासाठी आणि खंडित करण्यासाठी चढाओढ सुरू आहे. कऱ्हाड दक्षिण आणि फलटण मतदारसंघात एकाच पक्षाकडे (व्यक्ती) अनेक वर्षांपासून सत्ता आहे. सातारा आणि कऱ्हाड उत्तरमध्येही मागील काही वर्षांपासून शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि बाळासाहेब पाटील सत्ता गाजवत आहेत. आघाडी आणि महायुती तुटल्यामुळे सर्वत्र बहुरंगी लढती झाल्या. भाजपने मित्रपक्ष आपल्याकडे वळवले आणि ‘मनसे’ही रिंगणात उतरली. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी चौरंगी तर काही ठिकाणी पंचरंगी लढत आहे. कऱ्हाड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसकडून रिंगणात आहेत. विद्यमान आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने ते अपक्ष म्हणून मैदानात आहेत. ते येथून सात वेळा निवडून आले आहेत. भाजपचे डॉ. अतुल भोसले मागील वेळी कऱ्हाड उत्तरमधून राष्ट्रवादीतर्फे उभे होते. तेथे घड्याळ्याची टिकटिक वाढलीच नाही आणि त्यांना परभाव पत्करावा लागला. आता ते दक्षिणेतून रिंगणात आहेत. शिवसेनेचे अजिंक्य पाटील तर ‘मनसे’चे अ‍ॅड. विकास पवारही आहेत. उंडाळकरांना विजयी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील राष्ट्रवादीकडून रिंगणात आहेत. त्यांच्यापुढेही काँग्रेसचे धैर्यशील कदम आणि ‘स्वाभिमानी’चे मनोज घोरपडे यांनी जोरदार आव्हान उभे केले आहे. बाळासाहेब सलग तीन वेळा निवडून आले असून विजयाची परंपरा त्यांना टिकवावी लागणार आहे. इतर पक्षांचे उमेदवार ही परंपरा खंडित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पाटणमध्ये आमदार विक्रमसिंह पाटणकर यांनी पुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांना रिंगणात उतरविले आहे. येथे शिवसेनेचे शंभूराज देसाई यांच्याशी त्यांचा सामना आहे. काँग्रेसकडून हिंदुराव पाटील आहेत. हजार मतांच्या आत-बाहेर विजय किंवा पराभव ठरविणारी ही निवडणूक आता आणखी रंगतदार झाली आहे. राष्ट्रवादीला दुसऱ्यांदा विजय मिळाला तरच येथे परंपरा निर्माण होऊ शकते. सातारा-जावलीतून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यापूर्वी अभयसिंहराजे भोसले हे सलग अनेक वेळा निवडून आले आहेत. यंदा शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात भाजप व शिवसेनेने तगडे उमेदवार दिले आहेत. त्यामुळे विजयाची पंरपरा टिकविण्यासाठी संघर्ष आहेच. सेनेकडून माजी आमदार दगडूदादा सकपाळ रिंगणात आहेत. काँग्रेसच्या रजनी पवार, भाजपचे दीपक पवारही जोरदार प्रचार करीत आहेत. वाईत सलग चार वेळा मदनराव पिसाळ निवडून आले होते. २००४ च्या निवडणुकीत मदन भोसले निवडून आले. त्यांनी मकरंद पाटील यांचा पराभव केला होता. २००९ ला मात्र मदन भोसले यांचा मकरंद पाटील यांनी पराभव केला. यंदा दोघेही रिंगणात असून सेनेकडून डी.एम. बावळेकर व भाजपकडून पुरूषोत्तम जाधव रिंगणात आहेत. सर्वच उमेदवार तगडे असल्याने परंपरा जपण्या-मोडण्याचा संघर्ष येथेही आहेच. फलटणला १९९५ पासून सबकुछ रामराजे नाईक-निंबाळकर अशी परिस्थिती आहे. २००९ ला मतदारसंघ राखीव झाल्याने रामराजे यांनी दीपक चव्हाण यांना मैदानात उतरवून विजयी केले. आताही राष्ट्रवादीकडून चव्हाण हेच उमेदवार आहेत. काँग्रेसकडून दिंगबर आगवणे, सेनेकडून डॉ. नंदकुमार तासगावकर, ‘स्वाभिमानी’कडून पोपटराव काकडे रिंगणात आहे. आमदार चव्हाण यांच्यावर विजयाचा गुलाल पडण्यासाठी रामराजे यांनी अनेक व्यूहरचना केल्याचे दिसत आहे. वीस वर्षांची परंपरा टिकविण्यासाठी रामराजे यांनाही संघर्ष करावाच लागणार आहे. कोरेगावात मागील निवडणुकीत जावळीतून जाऊन शशिकांत शिंदे यांनी विजयी सलामी ठोकली. त्यांनी शालिनीताई पाटील यांचा पराभव केला होता. त्यापूर्वी शालिनीताई दोन वेळा राष्ट्रवादीकडून निवडून आल्या होत्या. आता शिंदे यांनाही सलग विजयाची परंपरा टिकवावी लागणार आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसकडून अ‍ॅड. विजयराव कणसे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, सेनेचे हणमंत चवरे तर ‘स्वाभिमानी’कडून संजय भगत रिंगणात आहेत. माणमध्ये हातघाईची लढाई...माण विधानसभा मतदारसंघ खुला झाल्यानंतर अनेकांनी आमदार होण्यासाठी देव पाण्यात घातले पण पहिल्याच प्रयत्नात जयकुमार गोरे यांनी बाजी मारली. येथील इतिहास पाहता मागील दोनवेळचा अपवाद वगळता येथील विद्यमान आमदार दोन ते तीनवेळा निवडून आला आहे. त्यामुळे आमदार गोरे ही खंडीत परंपरा मोडीत काढून माणचा ‘मान’ पुन्हा मिळविणार का याकडे लक्ष लागले आहे. येथे माजी आमदार सदाशिवराव पोळ, ‘रासप’चे शेखर गोरे, अपक्ष अनिल देसाई, शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख आणि ‘मनसे’चे धैर्यशील पाटील यांनी विजयासाठी जोरदार प्रचार मोहीम राबविली आहे. माणमध्ये हातघाईची लढाई... माण विधानसभा मतदारसंघ खुला झाल्यानंतर अनेकांनी आमदार होण्यासाठी देव पाण्यात घातले पण पहिल्याच प्रयत्नात जयकुमार गोरे यांनी बाजी मारली. येथील इतिहास पाहता मागील दोनवेळचा अपवाद वगळता येथील विद्यमान आमदार दोन ते तीनवेळा निवडून आला आहे. त्यामुळे आमदार गोरे ही खंडीत परंपरा मोडीत काढून माणचा ‘मान’ पुन्हा मिळविणार का याकडे लक्ष लागले आहे. येथे माजी आमदार सदाशिवराव पोळ, ‘रासप’चे शेखर गोरे, अपक्ष अनिल देसाई, शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख आणि ‘मनसे’चे धैर्यशील पाटील यांनी विजयासाठी जोरदार प्रचार मोहीम राबविली आहे.