शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

उन्हाळी भुईमूग काढणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:05 IST

................ खरीप हंगाम तयारी दहिवडी : माण तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. यासाठी जमीन मशागत करण्यात ...

................

खरीप हंगाम तयारी

दहिवडी : माण तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. यासाठी जमीन मशागत करण्यात येत आहे. रब्बी हंगाम संपल्यानंतर शेतकरी जमिनीची नांगरणी करतात, तसेच खत ओढून विस्कटणी करण्यात येते. सध्या खरीप हंगामासाठी शेतकरी तयारी करताना दिसून येत आहेत. वळवाचा पाऊस झाल्यानंतर शेतकरी बियाण्याची तयारी करतो. पाऊस वेळेत पडण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

..........................

विहिरींनी गाठला तळ

वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील वरकुटे मलवडी परिसरातील विहिरींनी तळ गाठला आहे. यामुळे उन्हाळी पिकांना पाणी कमी पडू लागले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात या परिसरातील शेतकरी भुईमूग, कडवळ पीक घेतो. यंदा अनेक शेतकऱ्यांनी हे पीक घेतले आहे, पण सध्या पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे पीक करपत चालले आहे. वळवाचा एखादा चांगला पाऊस पडला, तर पिकांना फायदा होणार आहे.

.......................

लॉकडाऊनचा फटका

सातारा : कोरोना विषाणूमुळे जिल्ह्यात कडक लॉकडाऊन आहे. यामुळे फळ आणि भाजी विक्रेत्यांना फटका बसू लागला आहे. किरकोळ विक्रेते दररोज मालाची खरेदी करून त्याची हतगड्यावरून विक्री करतात, पण सोमवारी कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला, तसेच त्याची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू झाली. यामुळे किरकोळ विक्रेत्यांना माल खपविण्यासाठी काहीच करता आले नाही. काहींनी पोलिसांची नजर चुकवून बोळात जाऊन भाजी, तसेच फळांची विक्री केली.

....................................

साताऱ्यात ढगाळ वातावरण

सातारा : सातारा शहरात दोन दिवसांपूर्वी वळवाचा पाऊस झाला, पण सध्या ढगाळ वातावरण आहे. यामुळे उकाडा कमी झाला आहे. मागील काही दिवसांपासून सातारा शहर व परिसरात वळवाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी झालेली आहे. त्यातच दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत आहे. परिणामी, पाऊस पडत नसला, तरी उकाडा कमी झाला आहे. अजून काही दिवस ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज आहे.

...................................................