शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

उसाला अवकाळीचा फटका

By admin | Updated: May 19, 2015 00:33 IST

तोडी लांबल्या, फड उभाच : हंगाम पूर्ण करण्याचे कारखान्यांपुढे आव्हान

वडगाव हवेली : तालुक्यात गत काही दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. वारंवार होणाऱ्या पावसामुळे ऊसतोडीचा खोळंबा होत असून, परिणामी यावर्षीचा गळित हंगाम लांबण्याची शक्यता आहे.तालुक्यातील साखर कारखान्यांपुढे गळित हंगाम पूर्ण करण्याचे आव्हान असताना अवकाळी पावसाने गळित हंगामामध्ये अडथळा आणला आहे. शेतकऱ्यांना वेळेत ऊसतोड करून मशागत करायची गडबड असताना अवकाळीने शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. कारखान्यांच्या सुरू हंगामातील गळित पूर्ण करण्यासाठी ऊस फड पेटवून शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. परंतु, आपला ऊस तोडून जाणे महत्त्वाचे असल्यामुळे शेतकरी जाईल त्या परिस्थितीत ऊसतोड करून घेण्याच्या मन:स्थितीत आहेत.ऊसतोडणी कामगारांना कडक उन्हामध्ये ऊसतोड करावी लागत आहे. हंगाम संपेपर्यंत फड पेटवून ऊसतोडणी केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. ऊस न पेटवता हंगाम पूर्ण करणे कारखान्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे पेटवून ऊस तोडणी सुरू केल्याचे पाहावयाय मिळत आहे. हंगाम कधी संपतो, असे या तोडणी कामगारांना झाले आहे. त्यांना त्यांच्या गावाकडे जाण्याची ओढ लागली आहे. परंतु अवकाळी पावसामुळे कामगारांचे गावाकडे जाण्याचे दिवस लांबणीवर जात आहेत. ऊसतोडणी हंगामाचे अखेरचे दिवस शेतकऱ्यांसाठी त्रासाचे असतात. शेतकऱ्यांना आपला ऊस तोडणीचे संकट समोर असते तर ऊस तोडणी कामगारांना कारखान्याचा गळित हंगाम आटोपण्याचे संकट समोर असते, अशा वेळी ऊस पेटवून ऊसतोड करण्याच्या सूचना कारखान्यांकडून मिळाल्याने ऊस तोडणी कामगारांना ऊसतोडणी सुलभ झाली आहे. पेटवून नेलेल्या उसाला कपात न करता बिल मिळणार असल्याने जाईल त्या परिस्थितीत ऊसतोड करून घेणे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पसंत केले आहे. (प्रतिनिधी) उसाचा घात होतोच कसा?जिल्ह्याच्या सर्वच भागातील ऊसाला आगी लागत असल्याच्या घटना अलीकडे पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीचा बारकाईने विचार करता ऊसाला आग अपघाताने लागत आहेत. की लावल्या जात आहेत, हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे वेळीच तोड करण्यासाठी कारखान्यांना योग्य नियोजन करण्याची गरज आहे