शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

‘सह्यााद्री’चा ३५० हेक्टर क्षेत्रावरील ऊस उभा

By admin | Updated: May 29, 2015 23:46 IST

शेतकऱ्यातून नाराजी : नियोजनाचा अभाव; कोरेगाव दक्षिण भागात साखर कारखान्याकडून बघ्याची भूमिका...

रहिमतपूर : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कोरेगाव तालुक्यातील दक्षिण भागातील कार्यक्षेत्रातील सुमारे ३५० हेक्टर ऊस अजून उभा आहे. योग्य नियोजनाचा अभाव कार्यक्षेत्रात असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या भागातील कारखान्याचे उपाध्यक्ष व संचालक फक्त बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. सह्याद्री्र कारखान्याच्या निवडणुकीत आ. बाळासाहेब पाटील यांच्यावर या परिसरातील शेतकऱ्यांनी मोठा विश्वास ठेवून परिसरातील उमेदवारांना निवडून आणले. आमदारांनी या परिसरातील लक्ष्मी संभाजीराव गायकवाड यांना उपाध्यक्षपद दिल्याने परिसरात फार मोठा उत्साह होता. तसेच नंदकुमार पाटील व कांतीलाल पाटील हे दोन संचालकसुद्धा कार्यरत आहेत. परंतु या भागात वाठार (किरोली) व रहिमतपूर असे दोन गट आहेत. येथे त्यांचे नियंत्रण राहिलेले दिसत नाही. वाठार गटात २५० हेक्टर तर रहिमतपूर गटात १५० हेक्टर ऊस ताडीविना अजून उभा आहे. त्यातच सभासदाच्या काही लागणीसुद्धा गेल्या नाहीत. एकरी १० ते १२ हजार रुपये ऊस तोडण्यासाठी टोळ्या मागत आहेत. तरीही ऊस जाळूनच नेण्यास सुरुवात केली आहे. पैसे दिले नाहीत तर ऊस तोडला जात नाही. आगामी पावसाची भीती असल्यामुळे शेतकरी पैसे देवून ऊस तोडत आहेत. त्यासाठी परिसरातील संचालकांनी टोळ्या वाढवून लवकरात लवकर शेतकऱ्याचा ऊस कसा जाईल, यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा सभासद वर्गातून होत आहे. प्रशासनाच्या बैठका होवून नियोजन करावे, अशी अपेक्षाही शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. याबाबत कारखान्याच्या उपाध्यक्षांशी संपर्क होवू शकला नाही. (वार्ताहर)रहिमतपूर गटातील सुमारे १०० हेक्टर ऊस शिल्लक आहे. दि. १० जूनपर्यंत ऊस संपविण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे. नोंदीचा कोणताही ऊस शिल्लक राहणार नाही, अशी यंत्रणा राबवत आहोत. -विजयकुमार कदम, फिल्डमनपावसाची भीती असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. माझा स्वत:चा लागण आणि खोडवा सात एकर ऊस अजून तोडलेला नाही. असे अनेक शेतकरी आहेत. ऊसतोड टोळ्या वाढविण्याची गरज आहे. - संभाजी व्यंकटराव माने, शेतकरी रहिमतपूर.