शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
7
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
8
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
9
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
11
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
12
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
13
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
14
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
15
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
16
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
17
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
18
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
19
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
20
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!

‘सह्यााद्री’चा ३५० हेक्टर क्षेत्रावरील ऊस उभा

By admin | Updated: May 29, 2015 23:46 IST

शेतकऱ्यातून नाराजी : नियोजनाचा अभाव; कोरेगाव दक्षिण भागात साखर कारखान्याकडून बघ्याची भूमिका...

रहिमतपूर : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कोरेगाव तालुक्यातील दक्षिण भागातील कार्यक्षेत्रातील सुमारे ३५० हेक्टर ऊस अजून उभा आहे. योग्य नियोजनाचा अभाव कार्यक्षेत्रात असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या भागातील कारखान्याचे उपाध्यक्ष व संचालक फक्त बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. सह्याद्री्र कारखान्याच्या निवडणुकीत आ. बाळासाहेब पाटील यांच्यावर या परिसरातील शेतकऱ्यांनी मोठा विश्वास ठेवून परिसरातील उमेदवारांना निवडून आणले. आमदारांनी या परिसरातील लक्ष्मी संभाजीराव गायकवाड यांना उपाध्यक्षपद दिल्याने परिसरात फार मोठा उत्साह होता. तसेच नंदकुमार पाटील व कांतीलाल पाटील हे दोन संचालकसुद्धा कार्यरत आहेत. परंतु या भागात वाठार (किरोली) व रहिमतपूर असे दोन गट आहेत. येथे त्यांचे नियंत्रण राहिलेले दिसत नाही. वाठार गटात २५० हेक्टर तर रहिमतपूर गटात १५० हेक्टर ऊस ताडीविना अजून उभा आहे. त्यातच सभासदाच्या काही लागणीसुद्धा गेल्या नाहीत. एकरी १० ते १२ हजार रुपये ऊस तोडण्यासाठी टोळ्या मागत आहेत. तरीही ऊस जाळूनच नेण्यास सुरुवात केली आहे. पैसे दिले नाहीत तर ऊस तोडला जात नाही. आगामी पावसाची भीती असल्यामुळे शेतकरी पैसे देवून ऊस तोडत आहेत. त्यासाठी परिसरातील संचालकांनी टोळ्या वाढवून लवकरात लवकर शेतकऱ्याचा ऊस कसा जाईल, यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा सभासद वर्गातून होत आहे. प्रशासनाच्या बैठका होवून नियोजन करावे, अशी अपेक्षाही शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. याबाबत कारखान्याच्या उपाध्यक्षांशी संपर्क होवू शकला नाही. (वार्ताहर)रहिमतपूर गटातील सुमारे १०० हेक्टर ऊस शिल्लक आहे. दि. १० जूनपर्यंत ऊस संपविण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे. नोंदीचा कोणताही ऊस शिल्लक राहणार नाही, अशी यंत्रणा राबवत आहोत. -विजयकुमार कदम, फिल्डमनपावसाची भीती असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. माझा स्वत:चा लागण आणि खोडवा सात एकर ऊस अजून तोडलेला नाही. असे अनेक शेतकरी आहेत. ऊसतोड टोळ्या वाढविण्याची गरज आहे. - संभाजी व्यंकटराव माने, शेतकरी रहिमतपूर.