शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

‘सह्यााद्री’चा ३५० हेक्टर क्षेत्रावरील ऊस उभा

By admin | Updated: May 29, 2015 23:46 IST

शेतकऱ्यातून नाराजी : नियोजनाचा अभाव; कोरेगाव दक्षिण भागात साखर कारखान्याकडून बघ्याची भूमिका...

रहिमतपूर : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कोरेगाव तालुक्यातील दक्षिण भागातील कार्यक्षेत्रातील सुमारे ३५० हेक्टर ऊस अजून उभा आहे. योग्य नियोजनाचा अभाव कार्यक्षेत्रात असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. या भागातील कारखान्याचे उपाध्यक्ष व संचालक फक्त बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. सह्याद्री्र कारखान्याच्या निवडणुकीत आ. बाळासाहेब पाटील यांच्यावर या परिसरातील शेतकऱ्यांनी मोठा विश्वास ठेवून परिसरातील उमेदवारांना निवडून आणले. आमदारांनी या परिसरातील लक्ष्मी संभाजीराव गायकवाड यांना उपाध्यक्षपद दिल्याने परिसरात फार मोठा उत्साह होता. तसेच नंदकुमार पाटील व कांतीलाल पाटील हे दोन संचालकसुद्धा कार्यरत आहेत. परंतु या भागात वाठार (किरोली) व रहिमतपूर असे दोन गट आहेत. येथे त्यांचे नियंत्रण राहिलेले दिसत नाही. वाठार गटात २५० हेक्टर तर रहिमतपूर गटात १५० हेक्टर ऊस ताडीविना अजून उभा आहे. त्यातच सभासदाच्या काही लागणीसुद्धा गेल्या नाहीत. एकरी १० ते १२ हजार रुपये ऊस तोडण्यासाठी टोळ्या मागत आहेत. तरीही ऊस जाळूनच नेण्यास सुरुवात केली आहे. पैसे दिले नाहीत तर ऊस तोडला जात नाही. आगामी पावसाची भीती असल्यामुळे शेतकरी पैसे देवून ऊस तोडत आहेत. त्यासाठी परिसरातील संचालकांनी टोळ्या वाढवून लवकरात लवकर शेतकऱ्याचा ऊस कसा जाईल, यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा सभासद वर्गातून होत आहे. प्रशासनाच्या बैठका होवून नियोजन करावे, अशी अपेक्षाही शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे. याबाबत कारखान्याच्या उपाध्यक्षांशी संपर्क होवू शकला नाही. (वार्ताहर)रहिमतपूर गटातील सुमारे १०० हेक्टर ऊस शिल्लक आहे. दि. १० जूनपर्यंत ऊस संपविण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे. नोंदीचा कोणताही ऊस शिल्लक राहणार नाही, अशी यंत्रणा राबवत आहोत. -विजयकुमार कदम, फिल्डमनपावसाची भीती असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. माझा स्वत:चा लागण आणि खोडवा सात एकर ऊस अजून तोडलेला नाही. असे अनेक शेतकरी आहेत. ऊसतोड टोळ्या वाढविण्याची गरज आहे. - संभाजी व्यंकटराव माने, शेतकरी रहिमतपूर.