शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

ऊस पाचट व्यवस्थापन उपयुक्त - संग्राम पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:40 IST

पिंपोडे बुद्रुक : ऊस पाचटातील पोषक घटक जाळून नष्ट करण्याऐवजी त्याचे जमिनीवर आच्छादन केल्यास अधिक फायदा होतो. पाचटाचे योग्य ...

पिंपोडे बुद्रुक : ऊस पाचटातील पोषक घटक जाळून नष्ट करण्याऐवजी त्याचे जमिनीवर आच्छादन केल्यास अधिक फायदा होतो. पाचटाचे योग्य व्यवस्थापन केल्यास ती जमिनीची सुपीकता व सजीवतेसाठी उपयुक्त ठरते,’ असे मत बोरगाव कृषीविज्ञान केंद्रातील शेतीविषयक कार्यक्रमाचे प्रमुख संग्राम पाटील यांनी व्यक्त व्यक्त केले आहे.

आनेवाडी (ता. वाई) येथे बोरगाव येथील कृषीविज्ञान केंद्र आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऊस पाचट व्यवस्थापन प्रात्यक्षिक कार्यक्रमात पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले, दरवर्षी तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे ऊस पाचट ठेवणे गरजेचे आहे. यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होऊन मातीतील ओलावा टिकून राहतो. पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढविणे शक्य होते. तसेच खोडव्याला कमी पाण्यात व दुष्काळी परिस्थितीतही तग धरणे शक्य होते.

यावेळी वैभव शिंदे यांच्या सेंद्रिय केळी प्रक्षेत्रावर शिवारफेरी घेण्यात आली. शिंदे यांनी मागील चार वर्षांपासून संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने केळी पिकाचे व्यवस्थापन केलेले आहे.

शिवरफेरीला कृषीविज्ञान केंद्राचे डॉ. महेश बाबर, भूषण यादगीरवार, सागर सकटे व कृषी सहाय्यक सुजित जगताप आणि नेवसे उपस्थित होते.

फोटो ओळ : आनेवाडी (ता. वाई) येथे ऊस पाचट व्यवस्थापनविषयी संग्राम पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

\\\\\\\\\\\\\\\\\