शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
4
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
5
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
6
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
7
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
8
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
9
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
10
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
11
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
12
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
13
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
14
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
15
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
16
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
17
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
18
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
19
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
20
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

ऊस पाचट व्यवस्थापन उपयुक्त - संग्राम पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:40 IST

पिंपोडे बुद्रुक : ऊस पाचटातील पोषक घटक जाळून नष्ट करण्याऐवजी त्याचे जमिनीवर आच्छादन केल्यास अधिक फायदा होतो. पाचटाचे योग्य ...

पिंपोडे बुद्रुक : ऊस पाचटातील पोषक घटक जाळून नष्ट करण्याऐवजी त्याचे जमिनीवर आच्छादन केल्यास अधिक फायदा होतो. पाचटाचे योग्य व्यवस्थापन केल्यास ती जमिनीची सुपीकता व सजीवतेसाठी उपयुक्त ठरते,’ असे मत बोरगाव कृषीविज्ञान केंद्रातील शेतीविषयक कार्यक्रमाचे प्रमुख संग्राम पाटील यांनी व्यक्त व्यक्त केले आहे.

आनेवाडी (ता. वाई) येथे बोरगाव येथील कृषीविज्ञान केंद्र आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऊस पाचट व्यवस्थापन प्रात्यक्षिक कार्यक्रमात पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले, दरवर्षी तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे ऊस पाचट ठेवणे गरजेचे आहे. यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होऊन मातीतील ओलावा टिकून राहतो. पाण्याच्या पाळ्यातील अंतर वाढविणे शक्य होते. तसेच खोडव्याला कमी पाण्यात व दुष्काळी परिस्थितीतही तग धरणे शक्य होते.

यावेळी वैभव शिंदे यांच्या सेंद्रिय केळी प्रक्षेत्रावर शिवारफेरी घेण्यात आली. शिंदे यांनी मागील चार वर्षांपासून संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने केळी पिकाचे व्यवस्थापन केलेले आहे.

शिवरफेरीला कृषीविज्ञान केंद्राचे डॉ. महेश बाबर, भूषण यादगीरवार, सागर सकटे व कृषी सहाय्यक सुजित जगताप आणि नेवसे उपस्थित होते.

फोटो ओळ : आनेवाडी (ता. वाई) येथे ऊस पाचट व्यवस्थापनविषयी संग्राम पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

\\\\\\\\\\\\\\\\\