शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

साखर कामगारांनी समन्वय समिती तयार करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमसूर : ‘सहकारात शेतकरी जसा महत्त्वाचा आहे तसाच कामगारही महत्त्वाचा आहे. शेतकरी टिकला पाहिजे तसा कामगारसुद्धा टिकला पाहिजे. उसाचा भाव ३५०० रुपये झाला. कामगारांच्या बोनस व पगारवाढी प्रश्नांबाबत कामगारांच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बोलणी करण्यास मी पुढाकार घेईन,’ अशी ग्वाही देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली.यशवंतनगर, ता. कºहाड ...

लोकमत न्यूज नेटवर्कमसूर : ‘सहकारात शेतकरी जसा महत्त्वाचा आहे तसाच कामगारही महत्त्वाचा आहे. शेतकरी टिकला पाहिजे तसा कामगारसुद्धा टिकला पाहिजे. उसाचा भाव ३५०० रुपये झाला. कामगारांच्या बोनस व पगारवाढी प्रश्नांबाबत कामगारांच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बोलणी करण्यास मी पुढाकार घेईन,’ अशी ग्वाही देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली.यशवंतनगर, ता. कºहाड येथे साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल व संसदीय कामकाजाची ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल खासदार शरद पवार यांचा जाहीर सत्कार आणि साखर कामगारांचा भव्य मेळावा असा दुहेरी कार्यक्रम बुधवारी कारखाना कार्यस्थळावर पार पडला. याप्रसंगी खासदार पवार बोलत होत होते. यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, राष्ट्रीय सहकारी साखर संघ दिल्लीचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, सहकारी साखर कारखाना संघ मुंबईचे माजी अध्यक्ष विजयसिंंह मोहिते-पाटील, माजी ग्रामविकास मंत्री आमदार जयंत पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सहकारी साखर कारखाना मुंबईचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, उपाध्यक्ष श्रीराम शेटे, आमदार मोहनराव कदम, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी आमदार राजेंद्र पाटील, माजी आमदार मानसिंंगराव नाईक, माजी आमदार राजन मोहोळ, अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र सकटे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे-पाटील, आमदार जयंत पाटील, तात्यासाहेब काळे आदींची मनोगते झाली. यावेळी राज्यातील साखर कामगारांच्या वतीने खासदार शरद पवार यांना चांदीचा मंगलकलश, शाल, श्रीफळ, दुर्गामातेची मूर्ती देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी, कर्मचारी, आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, सभासद उपस्थित होते.कामगारांचा बोनस काय वाढत नाय... तेव्हा हे वागणं बरं नव्हं!शरद पवार यांनी आपल्या भाषणात व्यासपीठावर उपस्थित असलेले सोनहिरा कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांना उद्देशून प्रश्न केला. मोहनराव, तुम्ही किती दर दिला? यावेळी ३,३५१ असे उत्तर ऐकल्यावर पवार पुढे म्हणाले, पूर्वीप्रमाणे दराच्या दोन टक्क्यांनी कामगारांच्या बोनसची रक्कम किती होईल? असा प्रश्न करत खासदार पवार म्हणाले, उसाचे दर वाढत गेले; पण कामगारांचा बोनस काय वाढत नाय...तेव्हा हे वागणं बरं नव्हं ! असा चिमटा काढताच कामगारांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला.