शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

साखर कामगारांनी समन्वय समिती तयार करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 23:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमसूर : ‘सहकारात शेतकरी जसा महत्त्वाचा आहे तसाच कामगारही महत्त्वाचा आहे. शेतकरी टिकला पाहिजे तसा कामगारसुद्धा टिकला पाहिजे. उसाचा भाव ३५०० रुपये झाला. कामगारांच्या बोनस व पगारवाढी प्रश्नांबाबत कामगारांच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बोलणी करण्यास मी पुढाकार घेईन,’ अशी ग्वाही देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली.यशवंतनगर, ता. कºहाड ...

लोकमत न्यूज नेटवर्कमसूर : ‘सहकारात शेतकरी जसा महत्त्वाचा आहे तसाच कामगारही महत्त्वाचा आहे. शेतकरी टिकला पाहिजे तसा कामगारसुद्धा टिकला पाहिजे. उसाचा भाव ३५०० रुपये झाला. कामगारांच्या बोनस व पगारवाढी प्रश्नांबाबत कामगारांच्या वतीने राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बोलणी करण्यास मी पुढाकार घेईन,’ अशी ग्वाही देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी दिली.यशवंतनगर, ता. कºहाड येथे साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल व संसदीय कामकाजाची ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल खासदार शरद पवार यांचा जाहीर सत्कार आणि साखर कामगारांचा भव्य मेळावा असा दुहेरी कार्यक्रम बुधवारी कारखाना कार्यस्थळावर पार पडला. याप्रसंगी खासदार पवार बोलत होत होते. यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, राष्ट्रीय सहकारी साखर संघ दिल्लीचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील, सहकारी साखर कारखाना संघ मुंबईचे माजी अध्यक्ष विजयसिंंह मोहिते-पाटील, माजी ग्रामविकास मंत्री आमदार जयंत पाटील, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, सहकारी साखर कारखाना मुंबईचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, उपाध्यक्ष श्रीराम शेटे, आमदार मोहनराव कदम, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी आमदार राजेंद्र पाटील, माजी आमदार मानसिंंगराव नाईक, माजी आमदार राजन मोहोळ, अण्णा भाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष मच्छिंद्र सकटे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे-पाटील, आमदार जयंत पाटील, तात्यासाहेब काळे आदींची मनोगते झाली. यावेळी राज्यातील साखर कामगारांच्या वतीने खासदार शरद पवार यांना चांदीचा मंगलकलश, शाल, श्रीफळ, दुर्गामातेची मूर्ती देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी, कर्मचारी, आजी-माजी आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, सभासद उपस्थित होते.कामगारांचा बोनस काय वाढत नाय... तेव्हा हे वागणं बरं नव्हं!शरद पवार यांनी आपल्या भाषणात व्यासपीठावर उपस्थित असलेले सोनहिरा कारखान्याचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांना उद्देशून प्रश्न केला. मोहनराव, तुम्ही किती दर दिला? यावेळी ३,३५१ असे उत्तर ऐकल्यावर पवार पुढे म्हणाले, पूर्वीप्रमाणे दराच्या दोन टक्क्यांनी कामगारांच्या बोनसची रक्कम किती होईल? असा प्रश्न करत खासदार पवार म्हणाले, उसाचे दर वाढत गेले; पण कामगारांचा बोनस काय वाढत नाय...तेव्हा हे वागणं बरं नव्हं ! असा चिमटा काढताच कामगारांच्या टाळ्यांचा कडकडाट झाला.