शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या कलेतून सुगडी घेतात आकार!

By admin | Updated: January 8, 2015 00:01 IST

कुंभारवाड्यात लगबग सुरू : कच्चा माल आणणे अन् विक्रीची जबाबदारी पुरुषांकडे

कोंडवे : पुरुषांची मक्तेदारी असलेल्या अनेक क्षेत्रांमध्ये महिलांनी यशस्वी प्रवेश केल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळते. मकरसंक्रांतीसाठी आवश्यक असणाऱ्या सुगडी बनविण्यामध्ये ही महिलाराज दिसत आहे. पुरुषांकडे कच्चा माल आणणे आणि विक्री करण्याची जबाबदारी सोपवून महिला सुगडी करण्यात व्यस्त झाल्या आहेत.कुंभारवाड्यात डिसेंबर महिन्यापासूनच सुगड्या तयार करण्याची लगबग सुरू होते. पूर्वी घरातील महिलांना सुगड्या वाळवणे आणि रंगविणे हे दोन कामच दिले जात होते. त्यानंतर यात बदल होत महिला सुगड्या विक्रीसाठीही बाजारात दिसू लागल्या. अलीकडे अनेक कुंभारवाड्यातून सुगडी मॉल आणि महानगरांपर्यंत जाऊ लागली आहे. त्यामुळे कामाचा ताण कुंभारवाड्यात वाढत असल्याचे चित्र दिसते. यावर्षी वीस रुपयांपासून पन्नास रुपयांपर्यंत सुगड्या बाजारात उपलब्ध आहेत. विविध रंगसंगतीच्या या सुगड्या रंगविण्याचे काम सध्या कुंभारवाड्यात सुरू आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुगड्यांच्या किमतीमध्ये दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. सुगड्यांसाठी आवश्यक असलेल्या मातीचे दर वाढल्याने ही वाढ करण्यात आली असल्याचे दत्तात्रय कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)गेल्या काही वर्षांपासून आम्ही महिला सुगडी तयार करण्याचे काम करत आहोत. सुगडी तयार करण्यासाठी आवश्यक असलेला नाजूकपणा आणि वळणदारपणा महिलांच्या बोटांत असते. त्यामुळे आकर्षक आणि व्यवस्थित आकारात सुगडी करायची असेल तर त्या महिला उत्तम प्रकारे करू शकतात. - सुभद्रा कुंंभार, सातारासुगड्यांवर खडे आणि लेसही...!मार्केटिंगच्या आजच्या युगात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सुगड्यांना सजविण्यात येत आहे. आकर्षक रंगसंगती आणि उत्कृष्ट सजावट केली तरच या सुगड्यांना उठाव मिळतो. त्यामुळे रंगसंगती ठरविणे आणि सुगड्यांवर अंतिम हात फिरविण्याची जबाबदारी कलासक्त महिला घेतात. दूरचित्रवाणीवरील मालिकांचा प्रभावही सुगड्यांवर दिसतो. म्हणूनच सुगडी अधिक आकर्षित करण्यासाठी यंदा पहिल्यांदाच त्याच्यावर खडे आणि लेस लावण्यात आल्या आहेत. ही सुगडी यंदा बाजारात जास्त भाव खाणार, असा विश्वास सचिन कुंभार यांनी व्यक्त केला.निर्यात करण्याकडे भरसाताऱ्यातील अनेक कुंभारवाड्यात सुगडी तयार केली जाते. त्यामुळे मागणी कमी आणि पुरवठा अधिक असे चित्र दिसते. परिणामी शहरात या सुगड्यांना फारसा चांगला दर मिळत नाही. त्या तुलनेत महानगरांमध्ये चांगला दर मिळतो. शहरात विक्री करण्यास मर्यादा येत असल्यामुळे अनेक कुंभारवाड्यातून सुगडी निर्यात करण्यावर भर दिला जातो. यामुळे सुगड्यांना दरही चांगला मिळतो.