शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

‘जलयुक्त शिवार’ अभियान यशस्वी करुया

By admin | Updated: December 17, 2014 23:03 IST

जिल्हाधिकारी : दुष्काळावर मात करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन

सातारा : ‘राज्यातील दुष्काळ कायमस्वरूपी मिटविण्यासाठी राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे, जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने हे अभियान यशस्वी करावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी मंगळवारी येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबविण्यात जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, उपजिल्हाधिकारी पराग सोमण, अधीक्षक कृषी अधिकारी प्रतापसिंह कदम आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘राज्यातील दुष्काळ कायमस्वरूपी घालविण्यासाठी राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार’ अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष हे प्रातांधिकारी असणार आहेत. सिंचन क्षेत्रात वाढ करणे, पाण्याच्या क्षमतेत वाढ करणे, त्याचप्रमाणे पीकपद्धतीत बदल करावे लागतील. यासाठी तुषार तसेच ठिबक सिंचनपद्धती राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागेल. तर काही ठिकाणी पाण्याच्या नियंत्रणासाठी कठोर पावले उचलावी लागतील.’ ‘प्रांताधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर समिती गठित करून त्यामध्ये साखर कारखाने, सूतगिरणी, बाजार समिती, स्वयंसेवी संस्था, उद्योजक, सामाजिक संघटना, सेवाभावी मंडळे आदींचा समावेश करावा,’ असेही मुदगल म्हणाले. (प्रतिनिधी)ही कामे लागतील मार्गी...बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना पुनर्जीवित करणे, विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करणे, गाळ काढण्यासाठी मोठी मोहीम, हातपंपाच्या दुरुस्ती, पाण्याचा ताळेबंद राखणे, आपल्या प्रियजनांच्या नावाने स्मृतिवन निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करावे. हिरवी टेकडी, वृक्षारोपण, नाला खोलीकरण, सरळीकरण, माथा ते पायथा सीसीटी आदी पाणलोट विकासाचे कामे करावयाची आहेत. ठिकठिकाणी जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती, शेततळ्याची दुरुस्ती, नाले, ओढे जोडणे आदी कामे करावयाची आहेत.