शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

‘जलयुक्त शिवार’ अभियान यशस्वी करुया

By admin | Updated: December 17, 2014 23:03 IST

जिल्हाधिकारी : दुष्काळावर मात करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन

सातारा : ‘राज्यातील दुष्काळ कायमस्वरूपी मिटविण्यासाठी राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे, जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने हे अभियान यशस्वी करावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी मंगळवारी येथे केले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबविण्यात जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत, अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, उपजिल्हाधिकारी पराग सोमण, अधीक्षक कृषी अधिकारी प्रतापसिंह कदम आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, ‘राज्यातील दुष्काळ कायमस्वरूपी घालविण्यासाठी राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार’ अभियान हाती घेतले आहे. या अंतर्गत तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष हे प्रातांधिकारी असणार आहेत. सिंचन क्षेत्रात वाढ करणे, पाण्याच्या क्षमतेत वाढ करणे, त्याचप्रमाणे पीकपद्धतीत बदल करावे लागतील. यासाठी तुषार तसेच ठिबक सिंचनपद्धती राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागेल. तर काही ठिकाणी पाण्याच्या नियंत्रणासाठी कठोर पावले उचलावी लागतील.’ ‘प्रांताधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर समिती गठित करून त्यामध्ये साखर कारखाने, सूतगिरणी, बाजार समिती, स्वयंसेवी संस्था, उद्योजक, सामाजिक संघटना, सेवाभावी मंडळे आदींचा समावेश करावा,’ असेही मुदगल म्हणाले. (प्रतिनिधी)ही कामे लागतील मार्गी...बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना पुनर्जीवित करणे, विकेंद्रित पाणीसाठे निर्माण करणे, गाळ काढण्यासाठी मोठी मोहीम, हातपंपाच्या दुरुस्ती, पाण्याचा ताळेबंद राखणे, आपल्या प्रियजनांच्या नावाने स्मृतिवन निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करावे. हिरवी टेकडी, वृक्षारोपण, नाला खोलीकरण, सरळीकरण, माथा ते पायथा सीसीटी आदी पाणलोट विकासाचे कामे करावयाची आहेत. ठिकठिकाणी जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती, शेततळ्याची दुरुस्ती, नाले, ओढे जोडणे आदी कामे करावयाची आहेत.