शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

खटाव तालुक्याचा दुष्काळग्रस्त मागणीचा अहवाल शासनाकडे सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:15 IST

सातारा : खटाव तालुक्यातील गावनिहाय दुष्काळी परिस्थितीजन्य अहवाल प्रशासनाकडून आला आहे. तो सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र ...

सातारा : खटाव तालुक्यातील गावनिहाय दुष्काळी परिस्थितीजन्य अहवाल प्रशासनाकडून आला आहे. तो सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केला.सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी गुरुवार, दि. १५ रोजी सातारा येथे जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठकीत घेतली होती. या बैठकीला आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे उपस्थित होते. या बैठकीत जमिनीतील पाणी पातळी व पीक परिस्थितीचा आढावा घेतला असता खटाव तालुक्यात पाणी टंचाई तीव्रता जास्त असल्याचे आढळून आले.सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय दुष्काळी परिस्थितीचा आढावा सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतला. खटाव तालुक्यातील फक्त वडूज मंडळाचा दुष्काळ यादी समावेश झालेला होता. परंतु जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जमिनीतील पाण्याची पातळी व पीक परिस्थितीचा आढावा घेतला असता खटाव तालुक्यातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात आली. गावनिहाय परिस्थितीजन्य अहवाल सादर करण्याच्या सूचना सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते.गावनिहाय अहवाल सोमवार, दि. १९ रोजी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे. या अहवालावर मुख्यमंत्री महोदयांनी योग्य तो निर्णय घेणार असल्याचे सांगितले.हिवाळी अधिवेशनात आमदार आक्रमककायम टंचाईग्रस्त असणाºया खटाव तालुक्याला राज्यशासनाच्या दुष्काळी यादीतून वगळण्यात आले. यामुळे तालुक्यातून असंतोष व्यक्त होत असतानाच तालुक्याचे तिन्ही लोकप्रतिनिधी सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आक्रमक झाले. विधीमंडळाच्या प्रवेशद्वारावर आमदार जयकुमार गोरे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील यांनी धरणे आंदोलन केले. ‘खटाव तालुक्यात दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे...’, ‘तालुक्यात दुष्काळ जाहीर न करणाºया सरकारचा धिक्कार असो,’ अशा घोषणा दिल्या. तीनही आमदारांनी खटावमध्ये दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करणाºया गांधी टोप्याही परिधान केल्या होत्या. पहिल्याच दिवशी सरकारने फक्त दुष्काळ जाहीर केला मात्र दुष्काळी उपाययोजना लागू केल्या नाहीत. अनेक तालुक्यांना दुष्काळी यादीतून वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी निदर्शने केली.