शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

विषय आहे खोल खोल ..बजेटचा आवाज ढोल ढोल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 13:06 IST

सातारा : सातारा नगरपालिकेची सभा गुरुवारी भलतीच गाजली. कविता अन् चारोळी लिहलेल्या साहित्यामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं गेलं. एकीकडं करवाढीच्या विरोधात नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी सभात्याग केला, तर दुसरीकडे भाजपच्या नगरसेवकांनी पस्तीस लाखांच्या प्राणायम हॉलवर हल्लाबोल चढवला. सातारा नगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी सकाळी सर्वसाधारण सभा सुरू झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माधवी कदम ...

ठळक मुद्देसातारा नगरपालिकेच्या सभेत मेंबर बनले साहित्यिक करवाढीच्या विरोधात नगर विकास आघाडीच्या सदस्यांचा सभात्याग

सातारा : सातारा नगरपालिकेची सभा गुरुवारी भलतीच गाजली. कविता अन् चारोळी लिहलेल्या साहित्यामुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं गेलं. एकीकडं करवाढीच्या विरोधात नगर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी सभात्याग केला, तर दुसरीकडे भाजपच्या नगरसेवकांनी पस्तीस लाखांच्या प्राणायम हॉलवर हल्लाबोल चढवला.

 सातारा नगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी सकाळी सर्वसाधारण सभा सुरू झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माधवी कदम होत्या. या सभेत करवाढीचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला. 'पूर्वीच्या बजेटच्या सभेत आम्ही या बेकायदेशीर करवाढीला कडाडून विरोध केला होता, तरीही ही बेकायदेशीर करवाढ कोणतीही परवानगी नसताना तुम्ही परस्पर सातारकरांवर कशी काय  कशी काय लादू शकता ?', असा सवाल नगरविकास आघाडीच्या अशोक मोने यांच्यासह इतर काही नगरसेवकांनी विचारला. पाणीपट्टी करात वाढ याबरोबरच स्वच्छता कर आणि अग्निशमन कर असे एकूण तीन विषय या सभेत मोठ्या गोंधळात चर्चिले गेले. विशेष म्हणजे प्रत्येक सभेत काहीतरी वेगळं करून सर्वांचं लक्ष वेधून घेणारे विनोद उर्फ बाळासाहेब खंदारे हे आज जणू साहित्यिक बोलून आले होते. 'विषय आहे खोल खोल.. बजेटचा आवाज वाजेना ढोल ढोल' ही आगळी वेगळी कविता लिहिलेला फ्लेक्स त्यांनी सभागृहात आणला होता. तसेच ,'गोरे नाहीत.. गोडबोले आहेत,' हे मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या बाबतीत लिहिलेले  कापडही त्यांनी आपल्या शरीराभोवती गुंडाळले होते. तसेच शहरातील रस्त्यांवर रोज बंद चालू होणारा एलईडी बल्ब दाखवण्यासाठी चक्क बॅटरीला लावलेला एक एलईडी स्ट्रीट लाईट सभागृहात आणला होता. शेवटी सत्ताधारी शहर विकास आघाडीच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत नगर विकास आघाडीचे सर्व सदस्य सभात्याग करून बाहेर पडले. त्यानंतर भाजपच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. सभापती वसंत लेवे यांच्या वॉर्डात पस्तीस लाख रुपये खर्चून मेडिटेशन हॉल अर्थात प्राणायम इमारत बांधली जात असल्याबद्दल प्रचंड गोंधळ निर्माण झाला. 'एकीकडे सध्या अस्तित्वात असलेली आहे ती मालमत्ता व्यवस्थित सांभाळता येत नाही, तेव्हा पालिकेने हा नवा उद्योग का करावा ?' असा सवाल यावेळी करण्यात आला.