शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना हवी सत्र परीक्षा : अभ्यासाशिवाय अन्य काहीच करता येत नसल्याची काहींची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 23:43 IST

सातारा : अभ्यासाचा वाढणारा ताण, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्राध्यापकांची होणारी घाई आणि अभ्यासाशिवाय अन्य काहीच न करता येण्याची विद्यार्थ्यांची हतबलता यामुळे मूल्यमापनासाठी वार्षिक

ठळक मुद्देमहाविद्यालयीन कॅम्पस आग्रही

भोलेनाथ केवटे ।सातारा : अभ्यासाचा वाढणारा ताण, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्राध्यापकांची होणारी घाई आणि अभ्यासाशिवाय अन्य काहीच न करता येण्याची विद्यार्थ्यांची हतबलता यामुळे मूल्यमापनासाठी वार्षिक पध्दतीच ठेवावी, असा आग्रह महाविद्यालयातील कॅम्पसमध्ये दिसून येत आहे.

सध्या प्रचलित असणाऱ्या, मूल्यमापनासाठी सतत वापरल्या जाणाºया पद्धती म्हणजे लेखी परीक्षा. या घेण्याच्या पद्धती म्हणजे सत्रपद्धती आणि वार्षिक पद्धती. अनेक उत्तम शैक्षणिक संस्था, परदेशी विद्यापीठे तसेच स्थानिक विद्यापीठे या सत्र पद्धतीचा अवलंब करतात. वर्षभरात सत्र पद्धतीने होणाºया दोन परीक्षेच्या नियोजनात शिक्षकांचा किमान ३० टक्क्यांहून अधिक वेळ जातो.

नागपूर येथे झालेल्या परिषदेत आणि शिवाजी विद्यापीठात झालेल्या मीटिंगमध्येही यासंदर्भात काही कुलगुरुंनी या सत्र पद्धतीचा मुद्दा मांडला. सत्र पद्धत सध्या उपयुक्त ठरत नाही. विद्यार्थी हा फक्त परीक्षार्थीच बनत चालला आहे, त्याला इतर कला-कौशल्यासाठी वेळ मिळत नाही, असे काही मुद्दे या परिषदेत मांडले गेले होते.या सत्रपद्धतीमुळे विद्यार्थ्याला अभ्यासासाठी पुरेसा वेळही मिळत नसल्याचे मत काही शिक्षकांनी नोंदवले. सत्र पद्धत बरी का वार्षिक? या संभ्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत.वर्षभराचे अध्यापन कसेबसे पूर्णवर्षभरात किमान १८० दिवस अध्ययन, अध्यापन झालेच पाहिजे. प्रत्यक्षात ३६५ दिवसांचा हिशोब पाहिला तर उन्हाळी सुटी, दिवाळी सुटी, इतर सण, उत्सव, सार्वजनिक सुट्या आणि वर्षाचे रविवार यांची अंदाजे बेरीज १३५ दिवसतरी होते. ३६५ वजा १३५ बरोबर २३० दिवस आणि त्यामध्ये दोन्ही सत्रांत किमान ४०-४० दिवस (प्रत्यक्षात दोन महिने किंवा जास्त) आणि कसेबसे १५० दिवस प्रत्यक्ष कामकाजासाठी उरतात. त्यामध्ये पुन्हा गॅदरिंग, खेळांचे सामने आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदा आदी कार्यक्रम याच दिवसांत असतात.सत्र परीक्षा फायदे :१. विद्यार्थी नियमित हजर राहतात.१. विद्यार्थी नियमित अभ्यास करतात.१. वर्षातून दोन परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यावर अभ्यासाचा मानसिक ताण येत नाही.१. परीक्षांचे नियोजन आटोपशीरहोते.सत्र परीक्षा तोटे :१. अभ्यासासाठी वेळ मिळत नाही.१. वेळखाऊ प्रक्रिया आहे.१. इतर कौशल्यांसाठी वेळ देता येत नाही.१. अन्य जबाबदाºयांमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही. 

सत्र पद्धतीमुळे अध्यापनाचे काम आटोक्यात येते. मात्र मुलांना इतर अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये भाग घेता येत नाही. यामुळे मुलांमध्ये संभ्रम निर्माण होतो.- प्रा. डॉ. ए. एस. पाटीलसत्र पद्धत ही वेळखाऊ प्रक्रिया आहे. यामुळे विद्यार्थ्यांना जे शिकविणं अपेक्षित असतं त्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. वेळ अपुरा असल्यामुळे अभ्यासक्रम शिकविताना अनेक अडचणी येतात.- प्रा. डॉ. युन्नूस शेखसत्र पद्धतीमुळे मला अभ्यासाव्यतिरिक्त इतर बाबींना वेळ देता येत नाही. वर्षातून एकदा परीक्षा घेतल्यास अभ्यासालाही वेळ मिळेल आणि मला खेळातही भाग घेता येईल.- परशुराम कांबळे, विद्यार्थीवार्षिक परीक्षेपेक्षा सत्र पद्धत खूप चांगली आहे. कारण, अभ्यास चांगला होतो. वार्षिक परीक्षेमुळे वर्षभर अभ्यास करता येत नाही आणि एकदमच अभ्यासाचा ताण येतो.- अश्विनी भोसले, विद्यार्थिनी

टॅग्स :examपरीक्षाSatara areaसातारा परिसर