शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीच्या कागदपत्रांसाठी पालकांसह विद्यार्थ्यांची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST

रामापूर : शिष्यवृत्ती हा शिक्षण क्षेत्रासह विद्यार्थी आणि पालकांचा जिव्हाळ्याचा विषय. शिष्यवृत्तीमुळे अनेक गरजू व होतकरू विद्यार्थ्याला शिक्षण घेणे ...

रामापूर : शिष्यवृत्ती हा शिक्षण क्षेत्रासह विद्यार्थी आणि पालकांचा जिव्हाळ्याचा विषय. शिष्यवृत्तीमुळे अनेक गरजू व होतकरू विद्यार्थ्याला शिक्षण घेणे सुलभ होते. मात्र, शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांना दरवर्षी कागदपत्रांची जमवाजमव करताना धावपळ करावी लागते. ही धावपळ खर्चिक आणि त्रासदायक असते.

दरम्यान, विद्यार्थी व पालकांची ही धावपळ वाचविण्यासाठी आणि शालेय शिक्षणासाठी कायमस्वरूपी लागणारी विद्यार्थ्याची कागदपत्र सहज उपलब्ध होण्यासाठी शिक्षण आयडी क्रमांकाची संकल्पना सुरू करणे गरजेचे आहे. त्याबाबत एका कार्यशाळेत चर्चाही झाली आहे. मात्र, अद्याप शासन स्तरावर या संकल्पनेबाबत गांभीर्याने विचार झालेला नाही.

विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या जोरावर शिष्यवृत्ती, मागासवर्गीय शिष्यवृत्ती, पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता, पुस्तक पेढी, दिव्यांग शिष्यवृत्ती, एकलव्य शिष्यवृत्ती अशा १८ प्रकारच्या शिष्यवृत्ती मिळत असतात. या शिष्यवृत्तीच्या रकमेतून काही गरीब, होतकरू मुलांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होत असते. मात्र, शिष्यवृत्तीसाठी शासकीय कार्यालयातून विद्यार्थ्यांना काही कागदपत्रांची जमवाजमव करावी लागते. ही कागदपत्र दरवर्षी काढावी लागत असल्याने पालकांना आणि विद्यार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

संबंधित विभाग दरवर्षी याबाबत नोटीस प्रसिद्ध करीत असतो. त्यामध्ये कोणत्या शिष्यवृत्ती आहेत, त्यासाठी कोणती पात्रता लागते, कोणती कागदपत्र आवश्यक आहेत याची माहिती त्या नोटीसद्वारे पालकांना दिली जाते. त्यानुसार विद्यार्थी आणि पालक या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शासकीय कार्यालयात धाव घेतात. एका कागदासाठी वारंवार हेलपाटे मारूनही काम होत नाही.

विद्यार्थ्याला पहिलीत प्रवेश देतानाच आधारकार्डप्रमाणे एखादा शिक्षण आयडी क्रमांक दिला तर जोपर्यंत संबंधित विद्यार्थी शिक्षण घेत आहे तोपर्यंत त्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. तसेच पहिलीत स्वीकारलेली त्याची सर्व कागदपत्रे अखेरपर्यंत त्याच्या त्या शिक्षण आयडी क्रमांकावर कायमस्वरूपी उपलब्ध राहतील. दरवर्षी कागदपत्रांसाठी धावाधाव करण्याचा विद्यार्थी आणि पालकांचा त्रास कमी होईल. हीच संकल्पना कऱ्हाडच्या गाडगे महाराज विद्यालयाच्या कार्यशाळेत प्रा. डॉ. विक्रमराव पाटील यांनी मांडली आहे. त्याबाबत सकारात्मक विचार होणे गरजेचे आहे.

- चौकट

शिक्षण पूर्ण होईपर्यंत आयडी क्रमांकाचा उपयोग

पहिलीत प्रवेश घेताना विद्यार्थ्याला दिलेल्या शिक्षण आयडी क्रमांकाचा फायदा शासन पातळीवर होणार आहे. दरवर्षी तीच तीच कागदपत्रे काढण्याचा विद्यार्थी व पालकांना होणारा त्रास बंद होईल. तसेच एका आयडी क्रमांकावर विद्यार्थ्याला शिक्षणासाठी लागणारी सर्व कागदपत्रे राहतील. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासही त्याचा फायदा होईल. संबंधित विभागाचे शिष्यवृत्तीचे काम वेळेत पूर्ण होऊन विद्यार्थी आणि पालकांना त्याचा फायदा होईल. शिष्यवृत्तीचे उद्दिष्टही पूर्ण होईल. त्यामुळे युनिक आयडी क्रमांकाचा शासन पातळीवर विचार होणे गरजेचे आहे.

- कोट

शिष्यवृत्ती ही गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना संजीवनी ठरत असते. शिष्यवृत्तीतून संबंधित विद्यार्थ्याला आपले शिक्षण पूर्ण करता येते. मात्र किचकट कागदपत्रांमुळे अनेक अडचणी येतात. यावर उपाय म्हणून आधारकार्डप्रमाणे मुलांना शिक्षण घेताना शिक्षण आयडी क्रमांक मिळावा. ज्यामुळे त्याला वारंवार कागदपत्रे काढण्यासाठी धावाधाव करावी लागणार नाही. शासनाने याचा विचार करायला हवा.

- प्रा. डॉ. विक्रमराव पाटील

शंकरराव जगताप महाविद्यालय, वाघोली