शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

विद्यार्थ्यांनी केली ऐतिहासिक तळ्यांची दुरुस्ती -‘एनएसएस’चा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 23:37 IST

छत्रपती शिवाजी महराज यांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या रायरेश्वर गडावर किसनवीर महाविद्यालयासह शिवाजी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या

ठळक मुद्देरायरेश्वर गडावरील रस्ता रुंदीकरणासह गडावरील परिसराची स्वच्छता

वाई : छत्रपती शिवाजी महराज यांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या रायरेश्वर गडावर किसनवीर महाविद्यालयासह शिवाजी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शेकडो विद्यार्थ्यांनी रायरेश्वर गडावरील दोन ऐतिहासिक तळ्यांची दुरुस्ती, गडावरील परिसर स्वच्छता तसेच गडावर जाण्यासाठी रस्ता तयार केला.

किसनवीर महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसांच्या निवासी कॅम्पचे आयोजन केले होते. या कॅम्पचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आले. तर समारोप हा तीनवेळा महाराष्ट्र केसरी विजेते पैलवान व उपविभागीय पोलीस अधिकारी विजय चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी जगपरिक्रमा करणाऱ्या सायकलपटू वेदांगी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनामुळे विविध महाविद्यालयांतून आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. तसेच दररोज योग शिबिराचे आयोजन मुलांमध्ये व्यायामाचे महत्त्व पटवून दिले. शिवाजी विद्यापीठाच्या शिवपरिक्रमा गडकोट किल्ल्यांच्या उपक्रमांतर्गत दोन दिवसीय निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे संयोजन किसनवीर महाविद्यालयाने केले होते.

रायरेश्वर गडावर जाण्यासाठी असणाºया अरुंद रस्त्यावर श्रमदान करून दोन किलोमीटरचा रस्ता रुंदीकरण केले. तळ्यांच्या दुरुस्तीसाठी लागणारे एक डंपर ग्रीट गडाखालून गडावर नेऊन मजुरी वाचविली, असे विविध उपक्रम राबवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका गडाचे संवर्धन करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करून इतरांपुढे एक आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला. या श्रमदानाच्या कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर येवले, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. आनंद घोरपडे, लेप्टनंट प्रा. समीर पवार यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी शिबिराच्या आयोजनामध्ये विशेष परिश्रम घेतले.एक पाऊल स्वच्छतेकडे अभियानांतर्गत किसनवीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांसह विविध महाविद्यालयांतून आलेल्या दीडशे विद्यार्थ्यांनी रायरेश्वर गडावर शंभू महादेवच्या मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. तसेच गडावरील ऐतिहासिक असणाºया दोन तळ्यांची दुरुस्ती करून पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी मदत, गडावरील गरीब कुटुंबाच्या शेतात गहू काढण्याची कामे या मुलांनी करून ग्रामस्थांना आपलेसे केले. 

टॅग्स :Waterपाणी