शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

सातारा तालुक्यात वर्चस्वासाठी संघर्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा तालुक्यातील १३0 ग्रामपंचायतीची निवडणूक लागली. त्यातील ४0 ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात नेत्यांना यश आले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा तालुक्यातील १३0 ग्रामपंचायतीची निवडणूक लागली. त्यातील ४0 ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात नेत्यांना यश आले असले तरी ९0 ग्रामपंचायतींत काँटे की टक्कर सुरू आहे. तालुक्यावरील वर्चस्वासाठी दोन राजेंचे गट कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहेत. या निवडणुकीतील यशापयशावरच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीची गणिते ठरणार आहेत.

आगामी नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे गट वर्चस्वासाठी झुंजताना दिसत आहेत. दोन्ही राजे एकाच पक्षात असतानादेखील तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या झुंजी सुरू असल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील खेड या ग्रामपंचायतीत माजी सभापती मिलिंद कदम यांचा गट सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. शेंद्रे ग्रामपंचायतीमध्ये आप्पा पडवळ व सुनील काटकर यांना मानणारे गट सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. परळी गटात माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले यांचा गट झुंजताना दिसतो आहे. बोरगाव, वर्ये, वेळे, नागठाणे, पाडळी, नुने, कोडोली, अंगापूर वंदन, संगममाहुली, नांदगाव, शिवथर, सैदापूर, किडगाव या ग्रामपंचायतीतदेखील दोन्ही राजेंचे गट एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

कोडोली ग्रामपंचायतीमध्ये आमदार शशिकांत शिंदे व आमदार महेश शिंदे यांना मानणा-या कार्यकर्त्यांमध्ये उभा संघर्ष सुरू आहे. तासगाव ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांनी स्वतंत्र पॅनेल उभे केले आहे. शिवथर ग्रामपंचायतीमध्ये माजी कृषी सभापती किरण साबळे-पाटील यांच्या गटाविरोधात भाजपने उमेदवार उभे केले आहेत. आगामी विकास सेवा सोसायट्या, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिले जाते.

४0 ग्रामपंचायती बिनविरोध

सातारा तालुक्यातील जांभळेवाडी, समर्थनगर, आष्टे, आलवडी, धावली, सायळी, विजयनगर, कामर्थी तर्फ सातारा, अटाळी सावली, गणेशवाडी, कोंदणी नरेवाडी, शेरेवाडी, भाटमरळी, भरतगाव, पिंपळवाडी, जोतीबाचीवाडी, कुशी, आंबवडे बुद्रुक, मस्करवाडी, कुस बु., रामकृष्णनगर, शिवाजीनगर, कुमठे, धनवडेवाडी, पाटेश्वरनगर, लिंबाचीवाडी, जाधववाडी, देवकल पारंबे, चाळकेवाडी, कुरुण, कुस खु., रोहोट, कुरुलबाजी, झरेवाडी, चिंचणी, अंगापूर तर्फ तारगाव, परमाळे, चिंचणी पुनर्वसित, बनघर या ४0 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.