शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

जीवनाच्या संघर्षात विषाचा प्याला ठरतोय मोहरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:38 IST

सातारा: द्रारिद्र्य, बेरोजगारी आणि कौटुंबिक कलहातून अनेकजण टोकाचे पाऊल उचलत असून, जीवनाच्या संघर्षात विषाचा प्यालाच मोहरा ठरत असल्याचे ...

सातारा: द्रारिद्र्य, बेरोजगारी आणि कौटुंबिक कलहातून अनेकजण टोकाचे पाऊल उचलत असून, जीवनाच्या संघर्षात विषाचा प्यालाच मोहरा ठरत असल्याचे अलीकडे पाहायला मिळते. जिल्ह्यात एका आठवड्यात तब्बल १८ जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. यावरूनच आयुष्य किती स्वस्त झालेय, याची प्रचीती येते. कोरोनाच्या शिरकावानंतर तर सर्वांच्याच आयुष्यात बदल झाला आहे. हे बदल कोणी सहन करतंय तर कोणाला सहन करता येइना. त्यामुळे अशा लोकांना आता विषाचा प्यालाच जवळचा वाटतोय.

कोरोनाने रोजगार हिरावल्याने अनेकजण बेरोजगार झाले. परिणामी, आर्थिक चणचण ही कौटुंबिक कलहाचे कारण ठरू लागले आहे. हे कलह आता एकमेकांचे जीव न घेता स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मानसिक संतुलन ढासळत असल्याने अगदी छोट्यातल्या छोट्या कारणातूही अनेकजण टोकाचे पाऊल उचलत आहेत. हे प्रमाण वर्षभरापूर्वीपेक्षा वाढल्याचे पोलिसांच्या नोंदवहीतील आकडेवारीवरून दिसून येत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात गत आठवड्यात तब्बल १८ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये बहुतांश कारणे ही दारूच्या नशेत असली तरी बेरोजगारी आणि आर्थिक चणचण हे एक मुख्य कारण असल्याचे पोलिसांच्या डायरीमध्ये नोंद करण्यात आले आहे.

साताऱ्यातील करंजेपेठेतील शुभम भंडारे या २३ वर्षाच्या युवकाने दारूच्या नशेत स्वतःचा गळा चिरून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा युवकही बेरोजगार आहे. त्याचबरोबर मयूर दशरथ मोरे (वय २२, रा. कारी, ता. सातारा) या युवकानेही दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्‍न केला आहे. तिसरी घटना कोरेगाव तालुक्यात घडली. अशोक नामदेव गवळे (वय ५५) यांनीही राहत्या घरी दारूच्या नशेत विषारी औषध प्राशन केले. तसेच जावळी तालुक्यातील सर्जापूर येथील संजय नारायण मोहिते (वय ३५) या युवकाने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्या करण्याचे आणखी एक कारण समोर आले ते म्हणजे, आजारपण. विशेषता वयोवृद्धांचे अंथरुणाला खिळलेले आजारपण. त्यांना सहन होत नाही, अशा कारणातूनही अनेक जण हा टोकाचा निर्णय घेत असल्याचे पाहायला मिळते. सातारा तालुक्यातील अरे या गावातील अंकुश रामजी महाडिक या ८० वर्षीय वृद्धाने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्‍न केला आहे. कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथील अमर गायकवाड (वय ४०) यांनीही घरगुती कारणातून विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्‍न केला तर खेड (ता.सातारा) येथील गणेश शिंदे (वय ३८) यांनीही राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्‍न केला होता. त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे इतरांनीही असाच आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. यातील काही जणांची कौटुंबिक तर काही जणांची बेरोजगारी त्यांना टोकाचे पाऊल उचलण्यात कारणीभूत ठरली आहे. रुग्णालयात अशा व्यक्तींना आणल्यानंतर नातेवाईकांकडून मूळ कारणांना बगल दिली जाते. त्यातील पहिले कारण आपली इज्जत जाईल तर दुसरे कारण आपल्या अंगलट येईल. फार तर अशा प्रकरणांमध्ये कोणाची तक्रार असेल तरच पोलीस यामध्ये डोकावून पाहतात. अन्यथा तक्रार नसेल तर केवळ जुजबी नोंद करून फाईल कायमची बंद करतात.

चौकटः राग करतोय राखरांगोळी

ताणतणाव, आर्थिक टंचाई, बेरोजगारी यामुळे अनेकांचे मानसिक संतुलन ढासळत चालले आहे. परिणामी कौटुंबिक कलह वाढताहेत. यातून रागामुळे आयुष्याची राखरांगोळी होते. पोलीसदप्तरी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांचे राग हे एक प्रमुख कारण असल्याचे समोर येत आहे.