शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

दिवसभर रस्त्यात... रात्री गोठ्यात!

By admin | Updated: July 12, 2015 21:51 IST

सांगा रस्ता कुणाचा? : मोकाट अन् पाळीव जनावरांचा शहरातील रस्त्यांवर वावर; वाहतुकीला अडथळा, अपघाताचीही शक्यता

प्रदीप यादव - सातारा -शहरातील रस्त्यांना लागलेले खड्ड्यांचे ग्रहण सुटता सुटेना. छोट्या-मोठ्या कामांसाठी नेहमी रस्ते खोदले जातात, त्यामुळे खड्डेमय रस्त्यावरील प्रवास सातारकरांच्या अंगवळणी पडला आहे. मात्र, आता नवीनच समस्या निर्माण झाली असून मोकाट अन् पाळीव जनावरे दिवसभर शहरातील रस्तोरस्ती भटकत असतात. परिणामी वाहतुकीला अडचण निर्माण होण्याबरोबरच जनावरांच्या जिवालाही धोका पोहोचू शकतो.सातारा शहराचा विकास होत असताना पाळीव जनावराना फिरण्यासाठी आता जागा उरलेली नाही. शहराच्या बाहेर जनावरे चरावयास नेताना मोठी कसरत करावी लागते. राजपथ, कर्मवीर पथावरूनच जनावरे हाकत न्यावी लागत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही रोजची कटकट बनली आहे. गाय, म्हशीचे कळप शहरातील रस्त्यांवरून जाताना वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडते. जनावरे रस्त्यातच बैठक मारत असल्यामुळे मोठ्या वाहनांना पुढे जाणे मुश्किल होते. अनेकदा दुचाकी जनावरांना धडकतात. गाड्या घसरण्याबरोबरच जनावरांनाही दुखापत होण्याची शक्यता असते.राजपथावर तर मोकाट जनावरांचे कळप मोकाट फिरत असतात. त्यांना मालक नसल्यामुळे ती कुठेही फिरत असतात. रस्त्याकडेला वाढलेले गवत, कचराकुंड्यांमध्ये टाकलेले अन्नपदार्थ, फळे, खराब भाजीपाला खाण्यासाठी मोकाट जनावरांबरोबरच पाळीव जनावरेही गर्दी करतात अन् वाहतुकीचा बोजवारा उडतो.कर्मवीर पथावरून बसस्थानकाकडे चरावयास जाणारी जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत असतात. विशेष म्हणजे ही जनावरे पाळीव आहेत. मात्र, त्यांचा मालक जनावरे सोडून देतो. दिवसभर ही जनावरे रस्त्यावर भटकून चरतात आणि दिवस मावळतीला गेला की आपल्या गोठ्यात जाऊन विसावतात. जनावरांच्या या सवयी मालकांना माहीत असल्यामुळे ते निर्धास्त राहतात. जनावरांच्या मागे फिरावे लागत नसल्यामुळे मालक निर्धास्त राहतात, मात्र वाहनचालकांची मोठी तारांबळ उडते. पशुधन हे शेतकऱ्यांसाठी जीव की प्राण असते. शहरातील रस्त्यांवरून जनावरे नेताना मालकांनी स्वत: त्यांच्या बरोबर असणे गरजेचे आहे. यामुळे जनावरे रस्त्यात न घुटमळता ती मोकळ्या जागेवर पोहोचतील आणि होणारे अपघात टळतील. जनावरांच्या जिवालाही धोकाकाही दिवसांपूर्वी राजपथावर पोलीस करमणूक केंद्रासमोर भटक्या गायींचा कळप रस्त्यावरून जात होता. दोन गायी रस्त्यातच उभ्या होत्या. सकाळी साडेअकराची वेळ असल्यामुळे वाहनांची वर्दळ जास्त होती. समोरून बस आली अन् रस्त्यात उभ्या असलेल्या एका गायीच्या जवळून गेली. गायीने थोडी जरी हालचाल केली असती तरी तिच्या पाठीचे हाड मोडले असते किंवा बसच्या धक्क्याने खाली पडून चाकाखाली येऊ शकली असती.