शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
2
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
3
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
4
"माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
5
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
6
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
7
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
8
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
9
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
10
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
11
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
12
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
13
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
15
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
16
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
17
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
18
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
19
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
20
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर रस्त्यात... रात्री गोठ्यात!

By admin | Updated: July 12, 2015 21:51 IST

सांगा रस्ता कुणाचा? : मोकाट अन् पाळीव जनावरांचा शहरातील रस्त्यांवर वावर; वाहतुकीला अडथळा, अपघाताचीही शक्यता

प्रदीप यादव - सातारा -शहरातील रस्त्यांना लागलेले खड्ड्यांचे ग्रहण सुटता सुटेना. छोट्या-मोठ्या कामांसाठी नेहमी रस्ते खोदले जातात, त्यामुळे खड्डेमय रस्त्यावरील प्रवास सातारकरांच्या अंगवळणी पडला आहे. मात्र, आता नवीनच समस्या निर्माण झाली असून मोकाट अन् पाळीव जनावरे दिवसभर शहरातील रस्तोरस्ती भटकत असतात. परिणामी वाहतुकीला अडचण निर्माण होण्याबरोबरच जनावरांच्या जिवालाही धोका पोहोचू शकतो.सातारा शहराचा विकास होत असताना पाळीव जनावराना फिरण्यासाठी आता जागा उरलेली नाही. शहराच्या बाहेर जनावरे चरावयास नेताना मोठी कसरत करावी लागते. राजपथ, कर्मवीर पथावरूनच जनावरे हाकत न्यावी लागत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही रोजची कटकट बनली आहे. गाय, म्हशीचे कळप शहरातील रस्त्यांवरून जाताना वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडते. जनावरे रस्त्यातच बैठक मारत असल्यामुळे मोठ्या वाहनांना पुढे जाणे मुश्किल होते. अनेकदा दुचाकी जनावरांना धडकतात. गाड्या घसरण्याबरोबरच जनावरांनाही दुखापत होण्याची शक्यता असते.राजपथावर तर मोकाट जनावरांचे कळप मोकाट फिरत असतात. त्यांना मालक नसल्यामुळे ती कुठेही फिरत असतात. रस्त्याकडेला वाढलेले गवत, कचराकुंड्यांमध्ये टाकलेले अन्नपदार्थ, फळे, खराब भाजीपाला खाण्यासाठी मोकाट जनावरांबरोबरच पाळीव जनावरेही गर्दी करतात अन् वाहतुकीचा बोजवारा उडतो.कर्मवीर पथावरून बसस्थानकाकडे चरावयास जाणारी जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत असतात. विशेष म्हणजे ही जनावरे पाळीव आहेत. मात्र, त्यांचा मालक जनावरे सोडून देतो. दिवसभर ही जनावरे रस्त्यावर भटकून चरतात आणि दिवस मावळतीला गेला की आपल्या गोठ्यात जाऊन विसावतात. जनावरांच्या या सवयी मालकांना माहीत असल्यामुळे ते निर्धास्त राहतात. जनावरांच्या मागे फिरावे लागत नसल्यामुळे मालक निर्धास्त राहतात, मात्र वाहनचालकांची मोठी तारांबळ उडते. पशुधन हे शेतकऱ्यांसाठी जीव की प्राण असते. शहरातील रस्त्यांवरून जनावरे नेताना मालकांनी स्वत: त्यांच्या बरोबर असणे गरजेचे आहे. यामुळे जनावरे रस्त्यात न घुटमळता ती मोकळ्या जागेवर पोहोचतील आणि होणारे अपघात टळतील. जनावरांच्या जिवालाही धोकाकाही दिवसांपूर्वी राजपथावर पोलीस करमणूक केंद्रासमोर भटक्या गायींचा कळप रस्त्यावरून जात होता. दोन गायी रस्त्यातच उभ्या होत्या. सकाळी साडेअकराची वेळ असल्यामुळे वाहनांची वर्दळ जास्त होती. समोरून बस आली अन् रस्त्यात उभ्या असलेल्या एका गायीच्या जवळून गेली. गायीने थोडी जरी हालचाल केली असती तरी तिच्या पाठीचे हाड मोडले असते किंवा बसच्या धक्क्याने खाली पडून चाकाखाली येऊ शकली असती.