शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

स्ट्रॉबेरीच्या गोडीला मिळाली साहित्याची जोड : भिलारला नवी ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 23:01 IST

सातारा : ‘स्ट्रॉबेरीचे गाव’ म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील भिलार या गावाची आता ‘साहित्याचे गाव’ म्हणून नवी ओळख निर्माण होऊ लागली आहे

ठळक मुद्देवाचन संस्कृती वाढविणाºया उपक्रमाचे देशभरातील पर्यटकांकडून कौतुकप्रकल्पात स्थानिकांना जास्तीत जास्त सहभागी करण्यात आले

सातारा : ‘स्ट्रॉबेरीचे गाव’ म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील भिलार या गावाची आता ‘साहित्याचे गाव’ म्हणून नवी ओळख निर्माण होऊ लागली आहे. देश व जगभरातील पर्यटक नेहमीच महाबळेश्वर व भिलार या गावांना भेटी देतात. या पर्यटकांना महाराष्ट्र कळावा म्हणून राज्य शासनाने या वर्षी भिलार गावाला ‘पुस्तकाचं गाव’ म्हणून नवी ओळख दिली. ती ओळख खूप गडद झाली असून, हजारो पर्यटक या गावाकडे आकर्षित होत आहेत.

भिलार गावात मेपासून महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने अनोखं ‘पुस्तकाचं गाव’ साकारण्यात आलं. आज या पुस्तकाच्या गावामध्ये २५ घरांमध्ये वेगवेगळया साहित्य प्रकारांची पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. वाचन संस्कृती वाढावी, पर्यटकांना मराठी भाषेची समृद्धी कळावी म्हणून मराठी भाषेतील नवे-जुने लेखन, संत साहित्य, कथा कादंबरी, कविता, ललित, चरित्रे-आत्मचरित्रे, क्रीडा, बालसाहित्य आणि इतिहास या साहित्य प्रकारांची घरात दालन उभी केली आहेत.

केवळ एक सरकारी वाचनालय उभारण्यापेक्षा या प्रकल्पात स्थानिकांना जास्तीत जास्त सहभागी करण्यात आले आहे. येणाºया प्रत्येक पर्यटकाला त्याच्या आवडीप्रमाणे वाचन करता येते. जवळपास पंधरा हजार मराठी पुस्तके या गावात ठेवण्यात आली आहे. भिलारला स्ट्रॉबेरीची गोडी चाखण्यासाठी येणाºया प्रत्येक पर्यटकाला आता साहित्याची गोडीही लागत असून, या उपक्रमाचे कौतुकही केले जात आहे.घरावरील चित्रे देतायत साहित्याची प्रचितीनिवडलेल्या पंचवीस घरांवर विविध प्रकारची चित्रं रेखाटण्यात आली आहेत. चित्राच्या संगतीनुसार त्या घरात वाचकाला साहित्य उपलब्ध होते. ज्या घरांच्या भिंतीवर निसर्ग चित्र काढण्यात आली आहेत, त्या घरात निसर्ग चित्रण अथवा प्रवास वर्णनपर साहित्य ठेवण्यात आले आहे. ऐतिहासिक चित्र रेखाटलेल्या घरात ऐतिहासिक साहित्य वाचनासाठी ठेवण्यात आले आहे. संतांची चित्र काढलेल्या घरामध्ये संतवाड:मय व अध्यात्मिक पुस्तकांची भेट वाचकांना होते. अशा प्रकारे केवळ चित्रांवरून पर्यटकाला त्या घरात कोणते साहित्य वाचनाला उपलब्ध आहे, याची माहिती मिळते.काय आहे पुस्तकांच्या गावात?२५ घरांत १५ हजार पुस्तकांचा खजिनापर्यटकांच्या आवडीनुसार वाचनासाठी साहित्य उपलब्धचित्रांच्या संगतीनुसार पुस्तकांची मांडणीगावात कथाकथन अन् कविता वाचनाचे आयोजनपर्यटकांच्या भेटीला नामवंत लेखक-प्रकाशकअंधांसाठी ई-बुकची उपलब्धता 

शासनाने हा राबविलेला उपक्रम छान आहे. येथे वेगवेगळे पुस्तके वाचून मला आनंद मिळत आहे. या गावामध्ये महाराष्ट्रातील कानाकोपºयातून पर्यटक येत आहेत, मी शासनाची आभारी आहे.- हेमलता वाघ,पर्यटक, इंदोर, मध्य प्रदेशमाझ्या घरामध्ये कथा साहित्य ठेवण्यात आले आहे. शनिशिंगणापूर येथील घरांना दरवाजे नाहीत तसेच माझ्या घरालाही दरवाजा नाही. पुस्तक वाचण्यासाठी माझे घर पर्यटकांसाठी चोवीस तास खुले केले आहे.- प्रवीण भिलारे, ग्रामस्थ