शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

बारामतीला पळविणारे पाणी थांबवा

By admin | Updated: March 6, 2015 23:44 IST

शिवतारेंनी खडसावले : कुठल्याही दादाच्या दबावाला बळी पडू नका

फलटण : ‘सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या हक्काचे नीरा-देवधरचे पाणी यापुढे बारामतीला जाऊ देऊ नका,’ अशा शब्दात सक्त आदेश देऊन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी नीरा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना खडसावले की, ‘तुम्ही अधिकारी आहात की भित्ताड, कोणत्याही दादाच्या दबावाला बळी पडाल, तर याद राखा.’फलटण येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री शिवतारे बोलत होते. ‘जिल्ह्यातील प्रलंबित धरणे व कालव्यांच्या कामांसाठी निधीची तरतूद केली जात आहे. लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, ही शासन व आमची भावना आहे. नीरा-देवधरच्या पाण्यावर हक्क नसताना बारामतीला ते पळविले जात आहे. पाण्यावर ज्याचा हक्क आहे, त्यांनाच ते पाणी मिळाले पाहिजे,’ अशा शब्दांत शिवतारे यांनी नीरा-उजवाच्या कार्यकारी अभियंत्यांना बजावले.दरम्यान, त्यावर पाणी वाटप समितीची बैठक झाली असून, त्याप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याचे संबंधित अभियंत्यांनी सांगितले. यावर शिवतारे चांगलेच संतप्त झाले. ‘तुम्ही अभियंता आहात की भित्ताड. मी सांगतो त्याप्रमाणे करा. समिती बरखास्त झाली आहे. कोणत्याही दादाचा दबाव सहन करू नका. ज्याच्या हक्काचे पाणी आहे त्यालाच मिळेल तेवढे बघा,’असे त्यांनी खडसावले.प्रशासन अद्यापही युती शासनाशी जुळले नसल्याचे निदर्शनास आणून देताच ‘सर्वत्र हीच परिस्थिती आहे. सातारा सरळ केले आहे. आता फलटणही करू,’ असे शिवतारे यांनी स्पष्ट केले. येथील औद्योगिक वसाहतीतील कंपनीत भूमिपुत्रांना रोजगार मिळत नसल्याचे निदर्शनास आणून देताच, याप्रश्नी आपण लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेतील आग संशयास्पदफलटण पालिकेच्या गोडावूनला बुधवारी (दि. ४) रात्री साडेअकराच्या सुमारास आग लागली. यासंदर्भात आपणाकडे तक्रार आली असल्याने आपण प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यामध्ये संशयास्पद गोष्टी आढळल्या आहेत. या आगीच्या घटनेची सखोल चौकशी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना दिल्याचे शिवतारे यांनी सांगितले.‘श्रीराम’च्या निवडणुकीत पॅनेल उतरवणारश्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना शिवतारे म्हणाले, ‘शिवसेना सर्व समविचारी लोकांना बरोबर घेऊन पूर्ण ताकदीनिशी पॅनेल उतरविणार आहे. खासदार राजू शेट्टी, आमदार महादेव जानकर यांच्याशी चर्चा झाली असून, या पॅनेलमध्ये निष्ठावंतांना स्थान देणार आहे. यामध्ये दल बदलूंना स्थान असणार नाही. ही निवडणूक आपण गांभीर्याने घेत आहे.’ (प्रतिनिधी)