शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

बारामतीला पळविणारे पाणी थांबवा

By admin | Updated: March 6, 2015 23:44 IST

शिवतारेंनी खडसावले : कुठल्याही दादाच्या दबावाला बळी पडू नका

फलटण : ‘सातारा जिल्ह्यातील नागरिकांच्या हक्काचे नीरा-देवधरचे पाणी यापुढे बारामतीला जाऊ देऊ नका,’ अशा शब्दात सक्त आदेश देऊन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी नीरा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना खडसावले की, ‘तुम्ही अधिकारी आहात की भित्ताड, कोणत्याही दादाच्या दबावाला बळी पडाल, तर याद राखा.’फलटण येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री शिवतारे बोलत होते. ‘जिल्ह्यातील प्रलंबित धरणे व कालव्यांच्या कामांसाठी निधीची तरतूद केली जात आहे. लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, ही शासन व आमची भावना आहे. नीरा-देवधरच्या पाण्यावर हक्क नसताना बारामतीला ते पळविले जात आहे. पाण्यावर ज्याचा हक्क आहे, त्यांनाच ते पाणी मिळाले पाहिजे,’ अशा शब्दांत शिवतारे यांनी नीरा-उजवाच्या कार्यकारी अभियंत्यांना बजावले.दरम्यान, त्यावर पाणी वाटप समितीची बैठक झाली असून, त्याप्रमाणे कार्यवाही सुरू असल्याचे संबंधित अभियंत्यांनी सांगितले. यावर शिवतारे चांगलेच संतप्त झाले. ‘तुम्ही अभियंता आहात की भित्ताड. मी सांगतो त्याप्रमाणे करा. समिती बरखास्त झाली आहे. कोणत्याही दादाचा दबाव सहन करू नका. ज्याच्या हक्काचे पाणी आहे त्यालाच मिळेल तेवढे बघा,’असे त्यांनी खडसावले.प्रशासन अद्यापही युती शासनाशी जुळले नसल्याचे निदर्शनास आणून देताच ‘सर्वत्र हीच परिस्थिती आहे. सातारा सरळ केले आहे. आता फलटणही करू,’ असे शिवतारे यांनी स्पष्ट केले. येथील औद्योगिक वसाहतीतील कंपनीत भूमिपुत्रांना रोजगार मिळत नसल्याचे निदर्शनास आणून देताच, याप्रश्नी आपण लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेतील आग संशयास्पदफलटण पालिकेच्या गोडावूनला बुधवारी (दि. ४) रात्री साडेअकराच्या सुमारास आग लागली. यासंदर्भात आपणाकडे तक्रार आली असल्याने आपण प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यामध्ये संशयास्पद गोष्टी आढळल्या आहेत. या आगीच्या घटनेची सखोल चौकशी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना दिल्याचे शिवतारे यांनी सांगितले.‘श्रीराम’च्या निवडणुकीत पॅनेल उतरवणारश्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना शिवतारे म्हणाले, ‘शिवसेना सर्व समविचारी लोकांना बरोबर घेऊन पूर्ण ताकदीनिशी पॅनेल उतरविणार आहे. खासदार राजू शेट्टी, आमदार महादेव जानकर यांच्याशी चर्चा झाली असून, या पॅनेलमध्ये निष्ठावंतांना स्थान देणार आहे. यामध्ये दल बदलूंना स्थान असणार नाही. ही निवडणूक आपण गांभीर्याने घेत आहे.’ (प्रतिनिधी)