शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

७२ तासांत उत्पादन थांबवा

By admin | Updated: May 17, 2015 01:28 IST

‘किसन वीर’, ‘कृष्णा’ला आदेश : कृष्णेचे पाणी दूषित केल्याप्रकरणी कारवाई

सातारा : कृष्णा नदीचे पाणी प्रदूषित केल्याचा ठपका ठेवत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या येथील उपप्रादेशिक कार्यालयाने वाई तालुक्यातील ‘किसन वीर’ व कऱ्हाड तालुक्यातील ‘कृष्णा’ या दोन्ही सहकारी साखर कारखान्यांना ७२ तासांच्या आत उत्पादन प्रक्रिया थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. दि. १४ मे रोजी ही नोटीस धाडण्यात आली आहे. किसन वीर सहकारी साखर कारखान्याचा चिंधवली नाल्याजवळ कंपोष्ट खत प्रकल्प आहे. लिंब (ता. सातारा) येथील लोकांच्या तक्रारींवरून उपप्रादेशिक प्रदूषण मंडळाने प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली होती. या प्रकल्पाचे दूषित पाणी चिंधवली नाल्यातून कृष्णा नदीत मिसळत असल्याचे उपप्रादेशिक प्रदूषण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. याबाबत किसन वीर कारखान्याला नोटीसही देण्यात आली होती; परंतु तिचे उत्तर न आल्याने उत्पादन प्रक्रिया थांबविण्याचे निर्देश देण्यात आल्याचे कारखान्याला पाठविलेल्या नोटिसीत म्हटले आहे. तसेच कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे प्रदूषित पाणीही कृष्णा नदीत मिसळत आहे. याठिकाणीही उपप्रादेशिक प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. या कारखान्याला प्रदूषण मंडळातर्फे कारणे दाखवा नोटीस धाडण्यात आली होती. आॅक्टोबर २०१४ व मार्च २०१५ अशा दोन नोटिसा पाठवूनही त्याबाबत समाधानकारक उत्तर आले नाही. कृष्णा नदीचे पाणी प्रदूषित करण्याचा ठपका या दोन कारखान्यांवर ठेवला आहे. हे दोन्ही कारखाने ‘नो पोल्युशन’ झोनमध्ये येतात. त्यामुळे या कारखान्यांनी हवा व पाणी यांचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.कारखान्यांनापरवाना देताना पाणी, हवा यांचे प्रदूषण होणार नाही, याबाबत काळजी घेणे हे कायद्याने बंधनकारक असल्याचे या नोटिसीत म्हटले आहे. प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी ए. एफ. देशमाने यांनी ही नोटीस बजावली आहे. (प्रतिनिधी)