शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

७२ तासांत उत्पादन थांबवा

By admin | Updated: May 17, 2015 01:28 IST

‘किसन वीर’, ‘कृष्णा’ला आदेश : कृष्णेचे पाणी दूषित केल्याप्रकरणी कारवाई

सातारा : कृष्णा नदीचे पाणी प्रदूषित केल्याचा ठपका ठेवत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या येथील उपप्रादेशिक कार्यालयाने वाई तालुक्यातील ‘किसन वीर’ व कऱ्हाड तालुक्यातील ‘कृष्णा’ या दोन्ही सहकारी साखर कारखान्यांना ७२ तासांच्या आत उत्पादन प्रक्रिया थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. दि. १४ मे रोजी ही नोटीस धाडण्यात आली आहे. किसन वीर सहकारी साखर कारखान्याचा चिंधवली नाल्याजवळ कंपोष्ट खत प्रकल्प आहे. लिंब (ता. सातारा) येथील लोकांच्या तक्रारींवरून उपप्रादेशिक प्रदूषण मंडळाने प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली होती. या प्रकल्पाचे दूषित पाणी चिंधवली नाल्यातून कृष्णा नदीत मिसळत असल्याचे उपप्रादेशिक प्रदूषण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. याबाबत किसन वीर कारखान्याला नोटीसही देण्यात आली होती; परंतु तिचे उत्तर न आल्याने उत्पादन प्रक्रिया थांबविण्याचे निर्देश देण्यात आल्याचे कारखान्याला पाठविलेल्या नोटिसीत म्हटले आहे. तसेच कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे प्रदूषित पाणीही कृष्णा नदीत मिसळत आहे. याठिकाणीही उपप्रादेशिक प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. या कारखान्याला प्रदूषण मंडळातर्फे कारणे दाखवा नोटीस धाडण्यात आली होती. आॅक्टोबर २०१४ व मार्च २०१५ अशा दोन नोटिसा पाठवूनही त्याबाबत समाधानकारक उत्तर आले नाही. कृष्णा नदीचे पाणी प्रदूषित करण्याचा ठपका या दोन कारखान्यांवर ठेवला आहे. हे दोन्ही कारखाने ‘नो पोल्युशन’ झोनमध्ये येतात. त्यामुळे या कारखान्यांनी हवा व पाणी यांचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.कारखान्यांनापरवाना देताना पाणी, हवा यांचे प्रदूषण होणार नाही, याबाबत काळजी घेणे हे कायद्याने बंधनकारक असल्याचे या नोटिसीत म्हटले आहे. प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी ए. एफ. देशमाने यांनी ही नोटीस बजावली आहे. (प्रतिनिधी)