शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

हा नाश थांबवा...बिरादरीतील युवकांची साद, ‘किसन वीर’ला भेट : वसुंधरा बचाव; पाणी अडविण्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 21:30 IST

पाचवड : ‘हा नाश थांबवा भूमातेचे तन-मन जळते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे’ अशी साद घालत तसेच स्वच्छ भारत अभियान,

पाचवड : ‘हा नाश थांबवा भूमातेचे तन-मन जळते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे’ अशी साद घालत तसेच स्वच्छ भारत अभियान, वसुंधरा बचाव, पाणी अडवा पाणी जिरवा असा संदेश देत मुंबई ते बेंगलोर सायकलवारी करणाºया युवक बिरादारीच्या तीस युवकांनी किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यास भेट दिली.क्रांतीभाई शहा संस्थापक असलेल्या युवक बिरादरी गेल्या पाच दशकांपासून देशात नाविण्यपूर्ण उपक्रमाद्वारे समाजप्रबोधन, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आदी समाज जीवनाशी निगडित विविध विषयांवर जनजागृतीचे काम करीत आहे. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यंदा युवक बिरादरीने विविध संदेशांसह सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीतील युवकांनी भुर्इंज, ता. वाई येथील कारखान्यास भेट देऊन साखर कारखाना, वीजनिर्मिती प्रकल्पासह कारखान्याने सभासद हिताच्या राबविलेल्या विविध उपक्रमांना भेट देऊन माहिती घेतली. २६/११ शहीद स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. 

झाडे लावा, पर्यावरण वाचवा व पाणी अडवा हे आमच्या युवक बिरादरीच्या अजेंड्यावरील प्रमुख आणि महत्त्वाचे विषय आहे. मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर साखर कारखान्याने हजारो झाडांची लागवड करून वृक्ष लागवड व पर्यावरण संवर्धनाला आणि शेततळी उभारून पाणी अडवा-पाणी जिरवा या संकल्पनांना मूर्त स्वरूप दिल्याचे प्रत्यक्ष पाहून समाधान वाटले, असे सायकल रॅलीचे नेतृत्व करणाºया आदित्य पंडित याने नमूद केले. तसेच कारखान्याने केलेल्या चौफेर प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. या सायकल रॅलीचे स्वागत संचालक चंद्रकांत इंगवले, नंदकुमार निकम, फायनान्स मॅनेजर टी. जी. पवार व को-जन इन्चार्ज धीरज वाघोले यांनी केले.भुर्इंज, ता. वाई येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्यास युवक बिरादरीच्या मुंबई-बेंगलोर सायकल वारीतील युवकांनी भेट दिली. यावेळी संचालक चंद्रकांत इंगवले, नंदकुमार निकम, टी. जी. पवार, धीरज वाघोले व कर्मचारी उपस्थित होते.