शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

हा नाश थांबवा...बिरादरीतील युवकांची साद, ‘किसन वीर’ला भेट : वसुंधरा बचाव; पाणी अडविण्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 21:30 IST

पाचवड : ‘हा नाश थांबवा भूमातेचे तन-मन जळते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे’ अशी साद घालत तसेच स्वच्छ भारत अभियान,

पाचवड : ‘हा नाश थांबवा भूमातेचे तन-मन जळते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे’ अशी साद घालत तसेच स्वच्छ भारत अभियान, वसुंधरा बचाव, पाणी अडवा पाणी जिरवा असा संदेश देत मुंबई ते बेंगलोर सायकलवारी करणाºया युवक बिरादारीच्या तीस युवकांनी किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यास भेट दिली.क्रांतीभाई शहा संस्थापक असलेल्या युवक बिरादरी गेल्या पाच दशकांपासून देशात नाविण्यपूर्ण उपक्रमाद्वारे समाजप्रबोधन, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आदी समाज जीवनाशी निगडित विविध विषयांवर जनजागृतीचे काम करीत आहे. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यंदा युवक बिरादरीने विविध संदेशांसह सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीतील युवकांनी भुर्इंज, ता. वाई येथील कारखान्यास भेट देऊन साखर कारखाना, वीजनिर्मिती प्रकल्पासह कारखान्याने सभासद हिताच्या राबविलेल्या विविध उपक्रमांना भेट देऊन माहिती घेतली. २६/११ शहीद स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. 

झाडे लावा, पर्यावरण वाचवा व पाणी अडवा हे आमच्या युवक बिरादरीच्या अजेंड्यावरील प्रमुख आणि महत्त्वाचे विषय आहे. मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर साखर कारखान्याने हजारो झाडांची लागवड करून वृक्ष लागवड व पर्यावरण संवर्धनाला आणि शेततळी उभारून पाणी अडवा-पाणी जिरवा या संकल्पनांना मूर्त स्वरूप दिल्याचे प्रत्यक्ष पाहून समाधान वाटले, असे सायकल रॅलीचे नेतृत्व करणाºया आदित्य पंडित याने नमूद केले. तसेच कारखान्याने केलेल्या चौफेर प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. या सायकल रॅलीचे स्वागत संचालक चंद्रकांत इंगवले, नंदकुमार निकम, फायनान्स मॅनेजर टी. जी. पवार व को-जन इन्चार्ज धीरज वाघोले यांनी केले.भुर्इंज, ता. वाई येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्यास युवक बिरादरीच्या मुंबई-बेंगलोर सायकल वारीतील युवकांनी भेट दिली. यावेळी संचालक चंद्रकांत इंगवले, नंदकुमार निकम, टी. जी. पवार, धीरज वाघोले व कर्मचारी उपस्थित होते.