शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

हा नाश थांबवा...बिरादरीतील युवकांची साद, ‘किसन वीर’ला भेट : वसुंधरा बचाव; पाणी अडविण्याचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 21:30 IST

पाचवड : ‘हा नाश थांबवा भूमातेचे तन-मन जळते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे’ अशी साद घालत तसेच स्वच्छ भारत अभियान,

पाचवड : ‘हा नाश थांबवा भूमातेचे तन-मन जळते आहे, ही वसुंधरा जनसंख्येच्या भाराने रडते आहे’ अशी साद घालत तसेच स्वच्छ भारत अभियान, वसुंधरा बचाव, पाणी अडवा पाणी जिरवा असा संदेश देत मुंबई ते बेंगलोर सायकलवारी करणाºया युवक बिरादारीच्या तीस युवकांनी किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यास भेट दिली.क्रांतीभाई शहा संस्थापक असलेल्या युवक बिरादरी गेल्या पाच दशकांपासून देशात नाविण्यपूर्ण उपक्रमाद्वारे समाजप्रबोधन, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आदी समाज जीवनाशी निगडित विविध विषयांवर जनजागृतीचे काम करीत आहे. इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त यंदा युवक बिरादरीने विविध संदेशांसह सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीतील युवकांनी भुर्इंज, ता. वाई येथील कारखान्यास भेट देऊन साखर कारखाना, वीजनिर्मिती प्रकल्पासह कारखान्याने सभासद हिताच्या राबविलेल्या विविध उपक्रमांना भेट देऊन माहिती घेतली. २६/११ शहीद स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. 

झाडे लावा, पर्यावरण वाचवा व पाणी अडवा हे आमच्या युवक बिरादरीच्या अजेंड्यावरील प्रमुख आणि महत्त्वाचे विषय आहे. मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर साखर कारखान्याने हजारो झाडांची लागवड करून वृक्ष लागवड व पर्यावरण संवर्धनाला आणि शेततळी उभारून पाणी अडवा-पाणी जिरवा या संकल्पनांना मूर्त स्वरूप दिल्याचे प्रत्यक्ष पाहून समाधान वाटले, असे सायकल रॅलीचे नेतृत्व करणाºया आदित्य पंडित याने नमूद केले. तसेच कारखान्याने केलेल्या चौफेर प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. या सायकल रॅलीचे स्वागत संचालक चंद्रकांत इंगवले, नंदकुमार निकम, फायनान्स मॅनेजर टी. जी. पवार व को-जन इन्चार्ज धीरज वाघोले यांनी केले.भुर्इंज, ता. वाई येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्यास युवक बिरादरीच्या मुंबई-बेंगलोर सायकल वारीतील युवकांनी भेट दिली. यावेळी संचालक चंद्रकांत इंगवले, नंदकुमार निकम, टी. जी. पवार, धीरज वाघोले व कर्मचारी उपस्थित होते.