शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

पुरंदरेंचा पुरस्कार थांबवा

By admin | Updated: August 18, 2015 00:52 IST

उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र : आक्षेपांचा सोक्षमोक्ष लावा

सातारा : बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात येणाऱ्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारावरून उठलेल्या वादात आता शिवरायांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनीही उडी घेतली आहे. पुरंदरेंच्या लेखनाबाबत घेतलेल्या आक्षेपांचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत पुरस्कार स्थगित ठेवावा, असे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. ‘महाराष्ट्र शासनाने ब. मो. ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर केला आणि तो प्रदान करण्याची तयारी केली आहे. तथापि, पुरंदरे यांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या काही लेखनासंबंधात पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी आणि त्यानंतर फार मोठ्या प्रमाणात आक्षेप जाहीरपणे घेतले जात आहेत. जरूर त्या अभ्यासाअंती, या आक्षेपात तथ्य असल्याचे आमचेही मत आहे आणि त्यामुळे ही बाब आम्हाला अत्यंत वेदनादायी झाली आहे. सबब या संपूर्ण आक्षेपांची तपासणी करून, जोपर्यंत सोक्षमोक्ष लागत नाही, तोपर्यंत पुरंदरे यांना जाहीर झालेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार स्थगित ठेवावा,’ असे परखड मत खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केले आहे. ‘छत्रपती शिवरायांमुळे भारत देश झाला. महाराष्ट्राला प्रतिष्ठा मिळाली. जगातील प्रगत देशांत शिवरायांविषयी संशोधन व अभ्यास केला जातो. किंबहुना राज्यकर्ता कसा असावा, तर रयतप्रेमी शिवरायांसारखा, असे दाखले जागतिक स्तरावरून केल्या जाणाऱ्या अभ्यासात नमूद केले जातात. जिजाऊ आईसाहेब तर राष्ट्रमाता आहेत. शासनाने अरबी समुद्रामध्ये १०८ फूट उंचीचे शिवस्मारक उभे करण्याचे जाहीर केले आहे. शिवराय व जिजाऊ आईसाहेब यांच्याविषयी शासनाच्या कृतिशील भावनेचे विकृतीकरण होऊ नये म्हणून तज्ज्ञांकडून लेखनाची तपासणी करून आक्षेपांचे निरसन होईपर्यंत हा पुरस्कार वितरणाचा निर्णय स्थगित करावा,’ असेही खासदार उदयनराजे यांनी नमूद केले आहे. (प्रतिनिधी) आक्षेपार्ह लेखन अधिकृत केल्याचा समज ‘बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेल्या असंविधानिक लेखनामुळे सामान्य जनतेमध्ये पुरंदरे यांना जाहीर झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’बाबत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. शासनाने पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार घोषित करून त्यांचे आक्षेपार्ह लेखन अधिकृत केल्याचा समज मोठ्या प्रमाणावर समाजात पसरत आहे,’ असे खासदार उदयनराजे यांनी नमूद केले आहे.