शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

तारळी धरण फुल टू सेफ...! जलसंपदा मंत्र्यांकडे अहवाल

By admin | Updated: March 21, 2017 20:01 IST

तारळी धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा अहवाल जलसंपदा खात्याकडे सादर करण्यात आला आहे.

 आॅनलाईन लोकमत
उंब्रज (सातारा), दि. 21 - तारळी धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा अहवाल जलसंपदा खात्याकडे सादर करण्यात आला आहे.  जानेवारी महिन्यात तारळी नदीवरील तारळी धरणाच्या व्हॉल्व्हचा दरवाजा खराब झाल्यामुळे या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. नागरिकांच्यात भीती निर्माण झाली. यांत्रिकी, स्थापत्य विभागाच्या अभियंत्यांनी आपत्कालीन दरवाजा सोडून हा विसर्ग थांबवला होता. त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. चौकशीअंती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे याबाबत अहवाल सादर करण्यात आला असून, यात तारळी धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा पाटबंधारे विभागाने केला आहे.
दरम्यान, भाजपाचे ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस प्रा. गणेश इंजेकर यांनी मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांच्याकडे तारळी धरणाच्या सुरक्षिततेबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती. या मागणीच्या आधारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ चौकशीचा आदेश दिला होता. त्या आदेशाने चौकशी पूर्ण झाली असून, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे सहायक अभियंता सु. दि. बारबिंड यांनी तारळी धरणाच्या सुरक्षिततेस कोणताही धोका नाही व धरण पूर्णपणे सुरक्षित आहे, असा अहवाल दिला आहे.
तारळी धरणाच्या तुटलेल्या व्हॉल्व्हची व धरणाच्या सुरक्षिततेबाबत चौकशी करण्याची मागणी करणाºया भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस प्रा. गणेश इंजेकर यांनी मंत्री, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्रालय मुबंई यांना या बाबतचा चौकशी अहवाल पाटबंधारे विभागाने दिला आहे. या अहवालानुसार तारळी धरणात सिंचन तथा विद्युत विमोचकासाठी ३ द्वारांची उभारणी २००९-०१० मध्ये करण्यात आली आहे. यामध्ये आपत्कालीन द्वार/थोपद्वार, धरण बांधकामामध्ये क्विक क्लोजिंग गेट व अधोबाजूस सिंचनासाठी असलेल्या शाखेवर सेवाद्वाराची उभारणी झाली आहे.
दि. ६ जानेवारी २०१७ रोजी सिंचन तथा विद्युत विमोचकाच्या शीर्घ गतीने बंद होणाºया द्वाराकडे जाणाºया गँलरीमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग होताना दिसून आला. क्विक क्लोजिंग गेटच्या बोनेटमधून पाणी गळती होत असावी, असा प्राथमिक अंदाज करण्यात आला. यावेळी पाण्याचा विसर्ग ४०० क्युसेकच्या वर होता. 
यानंतर तातडीने आवश्यक ती पूर्वतयारी करून यांत्रिकी व स्थापत्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने उर्ध्व बाजूचे आपत्कालीन द्वार या सर्व विभागांच्या अभियंत्यांच्या उपस्थितीत रात्री साडेअकरा वाजता यशस्वीरीत्या सोडून उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात आले व गँलरीमधील पाण्याची गळती थांबली. याची खात्री केली.  
ही गळती क्विक क्लोजिंग गेटचे बॉनेट कव्हर तुटल्याने झाली असल्याने यामुळे तारळी धरणाच्या सुरक्षिततेस कोणताच धोका नाही. धरण पूर्णपणे सुरक्षित आहे, असे नमूद केले आहे.
तसेच क्विक क्लोजिंग गेट, बोनेट अँड होईस्ट अरेजमेंट आदी घटकांची दुरुस्तीची कार्यवाही यांत्रिकी व स्थापत्य विभागांच्या समन्वयाने लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे, असे अहवालात सहायक अधीक्षक अभियंता सु. दि. बारबिंड यांनी म्हटले असल्याची माहिती गणेश इंजेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)