शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तारळी धरण फुल टू सेफ...! जलसंपदा मंत्र्यांकडे अहवाल

By admin | Updated: March 21, 2017 20:01 IST

तारळी धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा अहवाल जलसंपदा खात्याकडे सादर करण्यात आला आहे.

 आॅनलाईन लोकमत
उंब्रज (सातारा), दि. 21 - तारळी धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा अहवाल जलसंपदा खात्याकडे सादर करण्यात आला आहे.  जानेवारी महिन्यात तारळी नदीवरील तारळी धरणाच्या व्हॉल्व्हचा दरवाजा खराब झाल्यामुळे या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. नागरिकांच्यात भीती निर्माण झाली. यांत्रिकी, स्थापत्य विभागाच्या अभियंत्यांनी आपत्कालीन दरवाजा सोडून हा विसर्ग थांबवला होता. त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. चौकशीअंती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे याबाबत अहवाल सादर करण्यात आला असून, यात तारळी धरण पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा पाटबंधारे विभागाने केला आहे.
दरम्यान, भाजपाचे ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस प्रा. गणेश इंजेकर यांनी मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांच्याकडे तारळी धरणाच्या सुरक्षिततेबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती. या मागणीच्या आधारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तत्काळ चौकशीचा आदेश दिला होता. त्या आदेशाने चौकशी पूर्ण झाली असून, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे सहायक अभियंता सु. दि. बारबिंड यांनी तारळी धरणाच्या सुरक्षिततेस कोणताही धोका नाही व धरण पूर्णपणे सुरक्षित आहे, असा अहवाल दिला आहे.
तारळी धरणाच्या तुटलेल्या व्हॉल्व्हची व धरणाच्या सुरक्षिततेबाबत चौकशी करण्याची मागणी करणाºया भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस प्रा. गणेश इंजेकर यांनी मंत्री, वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्रालय मुबंई यांना या बाबतचा चौकशी अहवाल पाटबंधारे विभागाने दिला आहे. या अहवालानुसार तारळी धरणात सिंचन तथा विद्युत विमोचकासाठी ३ द्वारांची उभारणी २००९-०१० मध्ये करण्यात आली आहे. यामध्ये आपत्कालीन द्वार/थोपद्वार, धरण बांधकामामध्ये क्विक क्लोजिंग गेट व अधोबाजूस सिंचनासाठी असलेल्या शाखेवर सेवाद्वाराची उभारणी झाली आहे.
दि. ६ जानेवारी २०१७ रोजी सिंचन तथा विद्युत विमोचकाच्या शीर्घ गतीने बंद होणाºया द्वाराकडे जाणाºया गँलरीमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग होताना दिसून आला. क्विक क्लोजिंग गेटच्या बोनेटमधून पाणी गळती होत असावी, असा प्राथमिक अंदाज करण्यात आला. यावेळी पाण्याचा विसर्ग ४०० क्युसेकच्या वर होता. 
यानंतर तातडीने आवश्यक ती पूर्वतयारी करून यांत्रिकी व स्थापत्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने उर्ध्व बाजूचे आपत्कालीन द्वार या सर्व विभागांच्या अभियंत्यांच्या उपस्थितीत रात्री साडेअकरा वाजता यशस्वीरीत्या सोडून उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात आले व गँलरीमधील पाण्याची गळती थांबली. याची खात्री केली.  
ही गळती क्विक क्लोजिंग गेटचे बॉनेट कव्हर तुटल्याने झाली असल्याने यामुळे तारळी धरणाच्या सुरक्षिततेस कोणताच धोका नाही. धरण पूर्णपणे सुरक्षित आहे, असे नमूद केले आहे.
तसेच क्विक क्लोजिंग गेट, बोनेट अँड होईस्ट अरेजमेंट आदी घटकांची दुरुस्तीची कार्यवाही यांत्रिकी व स्थापत्य विभागांच्या समन्वयाने लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे, असे अहवालात सहायक अधीक्षक अभियंता सु. दि. बारबिंड यांनी म्हटले असल्याची माहिती गणेश इंजेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)