शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

कोयना प्रकल्पग्रस्तांचे राज्यभर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:40 IST

कोयनानगर : कोयना धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने राज्यातील विविध जिल्ह्यांत सोमवार (दि. १७)पासून बेमुदत आंदोलन सुरू ...

कोयनानगर : कोयना धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने राज्यातील विविध जिल्ह्यांत सोमवार (दि. १७)पासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊनचे नियम पाळत प्रकल्पग्रस्त विविध प्रलंबित मागण्यासाठी घरात व घरासमोरील अंगणात कुटुंबीयांसमवेत बसून आंदोलनात सहभागी झाले.

कोयना धरणास ६५ वर्षे झाली तरी धरणासाठी ज्यांनी जमीन घरदार पणाला लावले त्याचे योग्य पुनर्वसन न झाले नाही तर हजारो धरणग्रस्त व अभयारण्यग्रस्त न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. यासाठीच घराच्या अंगणात कुटुंबासह बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात सात जिल्ह्यांतील धरणग्रस्त सहभागी झाले आहेत.

कोयना प्रकल्प आणि अभयारण्याग्रस्तांचे हजारोंचे पुनवर्सन प्रलंबित आहे. तीन वर्षांत तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णयाची बैठक झाली होती. त्यामध्ये निर्णय होऊन कोयनेच्या प्रलंबित प्रश्नावर मंत्रालय पातळीवर उच्चस्तरीय कमिटी व जिल्हा पातळीवर टास्क फोर्स स्थापन करून कारवाई करण्याचा निर्णय झाला होता. त्याच्यापाठोपाठ मुख्यमंत्री यांच्या वॉर रूममध्ये बैठक होऊन प्रत्यक्षात झालेल्या निर्णयाची अंमलबजावणीसाठी बैठक होऊन कारवाई करण्याबाबत निर्णय झाला. मात्र, त्याला प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. म्हणूनच कोयना धरणग्रस्तांनी कोरोनाच्या पहिला लाटेमध्ये आंदोलन केले. त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विधान भवन येथे बैठक झाली. त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांचे संकलन दोन महिन्यांत करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी शासकीय कर्मचारी उपलब्ध करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला. त्यामुळे पात्र प्रकल्पग्रस्तांचे संकलन जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने पूर्ण झाले; परंतु पुढे काही कारवाई झाली नाही. म्हणूनच २५ मार्च रोजी सह्याद्री अतिथिगृहात पुन्हा बैठक झाली. त्या बैठकीत प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी निर्णय झाला. एक मे या महाराष्ट्र दिनी कोयना धरणग्रस्तांच्या जमिनी वाटपाची कार्यवाही करावी असा आदेश देण्यात आला; परंतु त्या आदेशालाही जिल्हा प्रशासनाने केराची टोपली दाखविली म्हणूनच सोमवारी आंदोलन चालू झाले आहे हे प्रत्यक्षात निर्णयाची अंमलबजावणीसाठी व लोकशाहीच्या रक्षणासाठी करण्यात येत आहे.’

चौकट

कोरोनाच्या नावाखाली वेळकाढूपणा

धरणग्रस्तांच्या व अभयारण्यग्रस्तांंच्या प्रश्नांवर जो वेळकाढूपणा चालला आहे तो नक्की कशासाठी, निवडणूक घेताना त्यासाठी लागणारे कर्मचारी जिल्हा प्रशासन परदेशातून आणणार आहे का? मग कोयनेच्या प्रश्नांवर पाणी कुठे मुरतंय हे एकदा प्रशासनाने जाहीर करावे.

- सचिन कदम,

कोयना प्रकल्पग्रस्त