शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

राज्याने माजी सैनिकांची भरती प्रक्रिया त्वरित करावी : सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

सातारा : राज्य शासनाने माजी सैनिकांना नोकरीत आरक्षण ठेवले, परंतु काही कारणांतून त्यांना नाकारण्यात येत आहे. त्यामुळे माजी सैनिकांची ...

सातारा : राज्य शासनाने माजी सैनिकांना नोकरीत आरक्षण ठेवले, परंतु काही कारणांतून त्यांना नाकारण्यात येत आहे. त्यामुळे माजी सैनिकांची भरती प्रक्रिया त्वरित करावी. दोन्ही शासनाने माजी सैनिकांना ५८ वर्षांपर्यंत नोकरीची हमी द्यावी व माजी सैनिकांना न्याय द्यावा, अन्यथा कारगिल विजय दिनापासून आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल,’ असा इशारा निवृत्त ब्रिगेडियर व माजी खासदार सुधीर सावंत यांनी दिला.

सातारा येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. निवृत्त ब्रिगेडियर सावंत म्हणाले, ‘२०१८ मध्ये ८०० उमेदवारांना पोलीस भरतीतील प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आहे. त्यात १८० माजी सैनिक आहेत. त्यांची वयोमर्यादा वाढत असून नवीन भरती प्रक्रिया होईपर्यंत सर्व उमेदवारांना नोकरीत रुजू करून घेण्यात यावे. देशात ५८ वर्षांपर्यंत सरकारी नोकरी दिली जाते. पण सैनिक वयाच्या ३० ते ३५ वर्षातच निवृत्त होतो. हा सैनिकांवर मोठा अन्याय आहे. इतर लोकांप्रमाणे माजी सैनिकांना ५८ वर्षांपर्यंत केंद्र व राज्य शासनाने नोकरीची हमी द्यावी. तसेच सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर सैनिकांना इतर शासकीय सेवेत वर्ग करावे.

देशात शहीद झाले आहेत त्यांच्या वीरपत्नी किंवा मुलांना त्वरित शासकीय नोकरी देण्यात यावी. डिप्लोमा नसल्यामुळे कृषी सहायक पदावर ७४ माजी सैनिकांची निवड होऊनही त्यांना घेण्यात आले नाही. नवी मुंबई फायर ब्रिगेडमध्ये १२ माजी सैनिकांची निवड झाली. परंतु त्यांच्याकडे फायर फायटिंग कोर्स केल्याचे प्रमाणपत्र नसल्याने त्यांना नाकारण्यात आले. यासह अन्य मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी २० जुलैपूर्वी बैठक घेऊन माजी सैनिकांना न्याय द्यावा. अन्यथा कारगिल विजय दिनापासून सैनिक फेडरेशनच्या वतीने आंदोलनाची भूमिका घेणार आहे, असेही सुधीर सावंत यांनी स्पष्ट केले.

या वेळी सैनिक फेडरेशनचे पदाधिकारी, माजी सैनिक उपस्थित होते.

\\\\\\\\\\\\\\\\\\\\