शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
3
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
4
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
5
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
6
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
7
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
8
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
9
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
10
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
11
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
12
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
13
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
14
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
15
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
16
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
17
बापरे बाप! जावई संतापला, बायको सतत माहेरी जाते म्हणून सासरच्या घरावर बुलडोझर चालवला अन्...
18
SA20 : सलामीच्या सामन्यात MI फ्रँचायझी संघाकडून हिटमॅन रोहितच्या जोडीदाराचा शतकी धमाका, पण...
19
सुट्टीच्या मुडमध्ये असाल तर सावधान! ३१ डिसेंबरपर्यंत 'ही' ३ महत्त्वाची कामे उरका, अन्यथा १ जानेवारीपासून आर्थिक व्यवहारांना बसणार ब्रेक
20
चुलत भावासोबतच शरीरसंबंध, तरुणी राहिली गर्भवती; गर्भपात करण्यासाठी गोळी घेतली अन् गेला जीव
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार

By admin | Updated: November 30, 2015 01:19 IST

विलासराव पाटील-उंडाळकर : कऱ्हाड कृषी प्रदर्शन समारोप; जिल्हाधिकाऱ्यांसह मान्यवरांची उपस्थिती

 कऱ्हाड : ‘पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण असे यंदाचे बारावे यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन ठरले आहे. या प्रदर्शनात पाच दिवसांत कोल्हापूर, रत्नागिरी, मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भेट दिली. कऱ्हाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने गेली अकरा वर्षांपासून कृषी प्रदर्शन आयोजित केले जाते. या प्रदर्शनातून शेतकऱ्यांच्या यशोगाथा राज्यभर पोहोचविल्या जातात. या प्रदर्शनातील यश पुढेही टिकून राहावे म्हणून पुढील वर्षापासून संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे,’ असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री, माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनी केली.बारावे यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचा समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक जितेंद्र शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर कोळी, जिल्हा परिषद कृषी अधिकारी डॉ. चांगदेव बागल, कऱ्हाड उपविभागीय अधिकारी किशोर पवार, निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड, उपविभागीय कृषी अधिकारी प्रभाकर पाटील, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, शुअरशॉट इव्हेंट मॅनेजमेंटचे अध्यक्ष संदीप गिड्डे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शिवाजीराव जाधव, उपसभापती आत्माराम जाधव आदींंसह संचालक उपस्थित होते.माजीमंत्री उंडाळकर म्हणाले, ‘या प्रदर्शनामुळे महाराष्ट्रात क्रांती घडली आहे. आताच्या काळात देशात ६५ टक्के शेतकरी अजूनही शेतीवर अवलंबून आहेत. या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या प्रदर्शनास तरुण शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रदर्शनातील सहभागामुळे त्यांच्या कर्तृत्वाला चालना मिळाली. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचेही शेतीतील कार्य फार मोठे आहे. म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने पुढील वर्षापासून राज्यातील यशस्वी शेतकऱ्यांला राज्यस्तरीय उत्कृष्ठ शेतकरी पुरस्कार देण्याचा निर्णय कऱ्हाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले, ‘कऱ्हाडचे बारावे यशवंतराव चव्हाण कृ षी प्रदर्शन हे यशस्वी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले होते. यावर्षी प्रदर्शनात शेतीप्रगतीविषयी विविध उपक्रम राबविण्यात आले आहे.’ यावेळी जिल्हा अधीक्षक जितेंद्र शिंदे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी यशस्वी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (प्रतिनिधी)