शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:37 IST

सातारा : ‘कधीही एकत्र न येणारे सत्तेत आहेत. त्यामुळे राज्यातील उद्धव ठाकरेंचे सरकार वादविवादात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनाही मोकळेपणाने काम ...

सातारा : ‘कधीही एकत्र न येणारे सत्तेत आहेत. त्यामुळे राज्यातील उद्धव ठाकरेंचे सरकार वादविवादात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनाही मोकळेपणाने काम करता येत नाही. त्यातच सन्मान मिळत नसल्याने काँग्रेसने पाठिंबा काढला तर हे सरकार फार काळ टिकणार नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारच पुन्हा राज्यात येईल,’ असा दावाच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री आठवले बोलत होते. या वेळी ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, आप्पा तुपे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सातारा दौऱ्यावर आल्यानंतर मंत्री आठवलेंनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री आठवले म्हणाले, शेतकऱ्यांबद्दल आम्हाला प्रेम आहे. त्यांना न्याय देण्याची भूमिका केंद्र शासनाचीही आहे. केंद्राने कृषीविषयक केलेले तीन कायदे हे शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच आहेत. तरीही कायदे मागे घ्या म्हणणे चुकीचे आहे. शेतकरी नेतेही ऐकायला तयार नाहीत. एक कायदा मागे घेतला तर दुसरे कायदे मागे घ्या म्हणून मागणी होऊ शकते. त्यामुळे संसदेलाच काहीही अर्थ राहणार नाही. आताचे कायदे मागे घेण्यापेक्षा त्यात बदल करण्याची मागणी शेतकरी नेत्यांनी करावी.

राज्यातील सत्तेत शिवसेना आणि भाजपने एकत्र यायला हवे होते. मात्र, शिवसेनेची भूमिका अडवणुकीची राहिली. शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचे कधीही ठरलेले नव्हते, असे सांगून मंत्री आठवले पुढे म्हणाले, ‘मनसुख हिरेन यांची आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय आहे. मुकेश अंबानींचे घर उडविण्याचा एक कट असू शकतो. पोलीस अधिकारी वाझेंची वागणूक संशयास्पद असून पाठीशी न घालता त्यांची चौकशी करावी.

चौकट :

राज ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचा आदेश पाळायचा नसेल...

राज्यात कोरोनाची स्थिती वाढलेली आहे. नागरिकांवर कारवाई होते. अशा वेळी मनसे नेते राज ठाकरे हे विनामास्क जातात याबद्दल आपले मत काय, असा प्रश्न मंत्री आठवलेंना पत्रकारांनी केला. यावर आठवले म्हणाले, मास्क नसेल तर नेत्यांवरही कारवाई होणे अपेक्षित आहे. राज ठाकरे हेही नेते आहेत. कदाचित त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आदेश मानायचा नसेल म्हणून ते मास्क वापरत नसतील. पण, त्यांचा त्रास कोणाला होऊ नये, असे वाटते.

.................

आघाडीचे २७, २८ आमदार फुटतील...

राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. त्यामुळे भाजपचे नेते राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा उपस्थित करतात. त्यामुळे मध्यावधी निवडणूक होणार का, असा प्रश्न केल्यावर मंत्री रामदास आठवले म्हणाले, मध्यावधी निवडणूक कोणाला नको आहे. पण, भाजपकडे महाविकास आघाडीतील २७ ते २८ आमदार फुटून येतील. सध्या आमच्याकडे ११७ आमदार आहेत. त्यामुळे राज्यात भाजपची सत्ता कधीही येऊ शकते.