शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

केंद्राची अनास्था तर राज्य सरकार अनभिज्ञ

By admin | Updated: November 16, 2015 23:59 IST

विखे-पाटलांचा आरोप : पूर्णवेळ कृषिमंत्री नाही तर मुख्यमंत्र्यांना गृहखाते सोडवेना

कऱ्हाड : ‘ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी, याबाबत केंद्र सरकारची अनास्था दिसत आहेच; पण राज्यातील सरकार तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत अनभिज्ञ दिसत आहे. राज्याला पूर्णवेळ कृषिमंत्री नाही, ही बाब गंभीर असून, सरकारने आपले दायित्व निभावण्याची गरज आहे,’ असे मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील खासगी दौऱ्यानिमित्त कऱ्हाडला आले असता येथील विमानतळावर पत्रकारांशी ते बोलत होते. आमदार आनंदराव पाटील, नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे, राजू शिंदे, अविनाश नलवडे आदींनी पुष्पगुच्छ देऊन राधाकृष्ण विखे-पाटील यांचे स्वागत केले. विखे-पाटील म्हणाले, ‘तीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या तरीही सरकारला अजूनही जाग आलेली दिसत नाही. राज्याला पूर्णवेळ कृषिमंत्री नाही, तसेच गृहमंत्रीही नाही. मुख्यमंत्री फडणवीस नागपूर सिटी क्राईम कॅपिटल झाली तरी गृहखाते सोडायला तयार नाहीत. त्यामुळे हे सारे प्रश्न कसे मार्गी लागणार हा गहण मुद्दा आहे. राज्यातील सरकाराने शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतलेले दिसत नाहीत. ‘जलयुक्त शिवार’ ही कोण्या एका अधिकाऱ्याच्या डोक्यातून आलेली योजना शासन राबवत आहे. अमूक-तमूक टीएमसी पाणीसाठा वाढला, असे तुणतुणे वाजविण्यातच सरकार मश्गुल आहे. परंतु ही त्यांची कल्पना भ्रामक आहे. हे लोकांच्या लक्षात येत आहे. मुंबईतील आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजन समारंभाला आपणाला का डावलण्यात आले, कार्यक्रम सरकारचा होता की एका पक्षाचा, याबाबत छेडले असता जे लोक सत्तेतील शिवसेनेलाच बाजूला ठेवतात. तिथे आमचा विषय दूरच; परंतु असे केले तरी आंबेडकरी जनतेचा काँग्रेसवरील विश्वास कमी होईल, अशी त्यांची भावना चुकीची आहे. नुकत्याच झालेल्या बिहारच्या निवडणुकीतील निकाल म्हणजे भाजप सरकारवरील जनतेचा विश्वास कमी होत असल्याची पोेचपावती आहे. त्यामुळे यातून तरी हे सरकार काही धडा घेईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.’ (प्रतिनिधी)नगराध्यक्षांचे निवेदनविरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना कऱ्हाडच्या नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे यांनी एक निवेदन दिले. ते हातात घेताच विखे-पाटील यांनी हे काय आहे, असे विचारले. त्यावर त्यांनी नगरसेवकांना असहकार्य करणाऱ्या मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांच्या बदलीचा ठराव करून दोन महिने उलटले तरी प्रशासन लक्ष घालत नसल्याचे नगराध्यक्षांनी नमूद केले. आपण यात लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी करताच मी पृथ्वीराज चहाण यांच्याशी बोलून काय करायचे ते ठरवतो, असे उत्तर त्यांनी दिले. ं