शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

केंद्राची अनास्था तर राज्य सरकार अनभिज्ञ

By admin | Updated: November 16, 2015 23:59 IST

विखे-पाटलांचा आरोप : पूर्णवेळ कृषिमंत्री नाही तर मुख्यमंत्र्यांना गृहखाते सोडवेना

कऱ्हाड : ‘ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी, याबाबत केंद्र सरकारची अनास्था दिसत आहेच; पण राज्यातील सरकार तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत अनभिज्ञ दिसत आहे. राज्याला पूर्णवेळ कृषिमंत्री नाही, ही बाब गंभीर असून, सरकारने आपले दायित्व निभावण्याची गरज आहे,’ असे मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील खासगी दौऱ्यानिमित्त कऱ्हाडला आले असता येथील विमानतळावर पत्रकारांशी ते बोलत होते. आमदार आनंदराव पाटील, नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे, राजू शिंदे, अविनाश नलवडे आदींनी पुष्पगुच्छ देऊन राधाकृष्ण विखे-पाटील यांचे स्वागत केले. विखे-पाटील म्हणाले, ‘तीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या तरीही सरकारला अजूनही जाग आलेली दिसत नाही. राज्याला पूर्णवेळ कृषिमंत्री नाही, तसेच गृहमंत्रीही नाही. मुख्यमंत्री फडणवीस नागपूर सिटी क्राईम कॅपिटल झाली तरी गृहखाते सोडायला तयार नाहीत. त्यामुळे हे सारे प्रश्न कसे मार्गी लागणार हा गहण मुद्दा आहे. राज्यातील सरकाराने शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतलेले दिसत नाहीत. ‘जलयुक्त शिवार’ ही कोण्या एका अधिकाऱ्याच्या डोक्यातून आलेली योजना शासन राबवत आहे. अमूक-तमूक टीएमसी पाणीसाठा वाढला, असे तुणतुणे वाजविण्यातच सरकार मश्गुल आहे. परंतु ही त्यांची कल्पना भ्रामक आहे. हे लोकांच्या लक्षात येत आहे. मुंबईतील आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजन समारंभाला आपणाला का डावलण्यात आले, कार्यक्रम सरकारचा होता की एका पक्षाचा, याबाबत छेडले असता जे लोक सत्तेतील शिवसेनेलाच बाजूला ठेवतात. तिथे आमचा विषय दूरच; परंतु असे केले तरी आंबेडकरी जनतेचा काँग्रेसवरील विश्वास कमी होईल, अशी त्यांची भावना चुकीची आहे. नुकत्याच झालेल्या बिहारच्या निवडणुकीतील निकाल म्हणजे भाजप सरकारवरील जनतेचा विश्वास कमी होत असल्याची पोेचपावती आहे. त्यामुळे यातून तरी हे सरकार काही धडा घेईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.’ (प्रतिनिधी)नगराध्यक्षांचे निवेदनविरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना कऱ्हाडच्या नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे यांनी एक निवेदन दिले. ते हातात घेताच विखे-पाटील यांनी हे काय आहे, असे विचारले. त्यावर त्यांनी नगरसेवकांना असहकार्य करणाऱ्या मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांच्या बदलीचा ठराव करून दोन महिने उलटले तरी प्रशासन लक्ष घालत नसल्याचे नगराध्यक्षांनी नमूद केले. आपण यात लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी करताच मी पृथ्वीराज चहाण यांच्याशी बोलून काय करायचे ते ठरवतो, असे उत्तर त्यांनी दिले. ं