शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राची अनास्था तर राज्य सरकार अनभिज्ञ

By admin | Updated: November 16, 2015 23:59 IST

विखे-पाटलांचा आरोप : पूर्णवेळ कृषिमंत्री नाही तर मुख्यमंत्र्यांना गृहखाते सोडवेना

कऱ्हाड : ‘ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी, याबाबत केंद्र सरकारची अनास्था दिसत आहेच; पण राज्यातील सरकार तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत अनभिज्ञ दिसत आहे. राज्याला पूर्णवेळ कृषिमंत्री नाही, ही बाब गंभीर असून, सरकारने आपले दायित्व निभावण्याची गरज आहे,’ असे मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील खासगी दौऱ्यानिमित्त कऱ्हाडला आले असता येथील विमानतळावर पत्रकारांशी ते बोलत होते. आमदार आनंदराव पाटील, नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे, राजू शिंदे, अविनाश नलवडे आदींनी पुष्पगुच्छ देऊन राधाकृष्ण विखे-पाटील यांचे स्वागत केले. विखे-पाटील म्हणाले, ‘तीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या तरीही सरकारला अजूनही जाग आलेली दिसत नाही. राज्याला पूर्णवेळ कृषिमंत्री नाही, तसेच गृहमंत्रीही नाही. मुख्यमंत्री फडणवीस नागपूर सिटी क्राईम कॅपिटल झाली तरी गृहखाते सोडायला तयार नाहीत. त्यामुळे हे सारे प्रश्न कसे मार्गी लागणार हा गहण मुद्दा आहे. राज्यातील सरकाराने शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतलेले दिसत नाहीत. ‘जलयुक्त शिवार’ ही कोण्या एका अधिकाऱ्याच्या डोक्यातून आलेली योजना शासन राबवत आहे. अमूक-तमूक टीएमसी पाणीसाठा वाढला, असे तुणतुणे वाजविण्यातच सरकार मश्गुल आहे. परंतु ही त्यांची कल्पना भ्रामक आहे. हे लोकांच्या लक्षात येत आहे. मुंबईतील आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजन समारंभाला आपणाला का डावलण्यात आले, कार्यक्रम सरकारचा होता की एका पक्षाचा, याबाबत छेडले असता जे लोक सत्तेतील शिवसेनेलाच बाजूला ठेवतात. तिथे आमचा विषय दूरच; परंतु असे केले तरी आंबेडकरी जनतेचा काँग्रेसवरील विश्वास कमी होईल, अशी त्यांची भावना चुकीची आहे. नुकत्याच झालेल्या बिहारच्या निवडणुकीतील निकाल म्हणजे भाजप सरकारवरील जनतेचा विश्वास कमी होत असल्याची पोेचपावती आहे. त्यामुळे यातून तरी हे सरकार काही धडा घेईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.’ (प्रतिनिधी)नगराध्यक्षांचे निवेदनविरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना कऱ्हाडच्या नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे यांनी एक निवेदन दिले. ते हातात घेताच विखे-पाटील यांनी हे काय आहे, असे विचारले. त्यावर त्यांनी नगरसेवकांना असहकार्य करणाऱ्या मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांच्या बदलीचा ठराव करून दोन महिने उलटले तरी प्रशासन लक्ष घालत नसल्याचे नगराध्यक्षांनी नमूद केले. आपण यात लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी करताच मी पृथ्वीराज चहाण यांच्याशी बोलून काय करायचे ते ठरवतो, असे उत्तर त्यांनी दिले. ं