शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

पथदिव्यांचे थकीत बिल राज्य शासनाने भरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:26 IST

वाई : वाई येथे माजी आमदार मदन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी भाजपाच्या वतीने वीजवितरण कंपनीला पथदिव्यांचे थकीत बिल ग्रामपंचायतीकडून ...

वाई : वाई येथे माजी आमदार मदन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी भाजपाच्या वतीने वीजवितरण कंपनीला पथदिव्यांचे थकीत बिल ग्रामपंचायतीकडून न घेता राज्य सरकारकडून घेण्यात यावे, असे निवेदन देण्यात आले.

वाई भाजपाच्या वतीने व विविध ग्रामपंचायतीच्या वतीने वाई येथे वीजवितरण कंपनीच्या अभियंता तसेच प्रांताधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे देण्यात आले. १५ व्या वित्त आयोगाच्या पैशातून गावातील आरोग्य, पाणीपुरवठा, गटारे आदी कामांसाठी खर्च करते. आता त्यातून पथदिव्यांची बिल भरण्यासाठी तरतूद ग्रामपंचायतीने करावी, असे सांगण्यात आले. यामुळे ग्रामपंचायतीच्या विकासकामांना खीळ बसणार आहे. म्हणूनच शासनाने फेरविचार करावा आणि ती स्वतः किंवा जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत भरण्यात यावी, जर शासनाने लवकर तोडगा काढला नाही तर सर्व ग्रामपंचायती व भाजपाच्या वतीने मोठं आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. हे निवेदन देताना यशराज भोसले, सचिन घाटगे, गजानन भोसले, तालुकाध्यक्ष रोहिदास पिसाळ, चंद्रकांत शेलार, यशवंत लेले, सागर जाधव, मयूर गाढवे,

युवराज कोंढाळकर, विक्रम शिंदे, ज्ञानेश्वर कायंगुडे, प्रशांत जाधव, दीपक जाधव यांसह अनेक भाजपचे कार्यकर्ते व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.