शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

राज्य सरकारने तडकाफडकी कोणताही निर्णय घेऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:38 IST

सातारा : कोरोनात केलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांची तसेच सर्वसामान्य जनतेची अवस्था दयनीय झालेली आहे. आता तीन आठवडे लागू करण्याचा निर्णय ...

सातारा : कोरोनात केलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांची तसेच सर्वसामान्य जनतेची अवस्था दयनीय झालेली आहे. आता तीन आठवडे लागू करण्याचा निर्णय होणार असल्याची चर्चा आहे. राज्य शासनाने कोणताही निर्णय तडकाफडकी घेऊ नये, अन्यथा त्याचे दूरगामी परिणाम होतील, अशी भीती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, लोकांनी कर्ज काढून व्यवसाय सुरू केले आहेत. अनेक लोकांचे हातावर पोट आहे. तीन आठवडे लाॅकडाऊन केले तर या लोकांचे जगणे मुश्कील होऊन जाईल. त्यामुळे तीन आठवड्यांच्या लोकडाऊनमुळे लोकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे. राज्य शासनाने तडकाफडकी निर्णय घेऊ नये, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

राज्य शासनाने तयारी करायला हवी होती, याबाबत सांगताना ते म्हणाले, मधल्या काळात पेशंट कमी झाले त्यावर दुसरी लाट येऊ शकते हे लक्षात घेऊन राज्य शासनाने तशी तयारी करायला हवी होती. रेमडेसिवीर इंजेक्शन, बेडची उपायोजना, हॉस्पिटलची तयारी, आदी गोष्टींवर राज्य शासनाने भर द्यायला हवा होता; पण ते मधल्या काळात झालेले नाही. त्यामुळे ऐनवेळी आता दुसऱ्यांदा कोरोनाचा सामना करताना अवघड जात आहे. तरीही लोकांची गैरसोय लक्षात घेऊन आम्ही राज्य आणि केंद्र शासनाच्या पातळीवर बोलणी करून रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, सिलिंडर, हॉस्पिटलमधील बेडची व्यवस्था, आदींबाबत लक्ष ठेवून आहोत.

संभाजी भिडे यांनी सांगली येथे केलेल्या वक्तव्याबाबत देखील शिवेंद्रसिंहराजे यांनी नाराजी व्यक्त केली. उद्याच्या कालावधीमध्ये परिस्थिती काय आणि आपण बोलतोय काय याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. कोरोना हा कोणाला होऊ शकतो, शूर व्यक्तीला होतो, इतर कुणाला होत नाही, आज असं बोलणं चुकीचं आहे.