शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

साताऱ्यात शहर बस सेवेसाठी कृती समितीच्या हालचाली!, गेली २० वर्षे बस सेवा बंद 

By प्रगती पाटील | Updated: September 26, 2023 18:27 IST

सातारा : वाढते इंधनाचे दर, वाहनांच्या वाढत्या किमती, पार्किंगची गैरसोय, अपुरे रस्ते, वाहतुकीची कोंडी यामुळे सातारकर हैराण आहेत. या ...

सातारा : वाढते इंधनाचे दर, वाहनांच्या वाढत्या किमती, पार्किंगची गैरसोय, अपुरे रस्ते, वाहतुकीची कोंडी यामुळे सातारकर हैराण आहेत. या पार्श्वभूमीवर गेली २० वर्षे बंद असलेली शहर बस वाहतूक सेवा सुरू करावी अशी मागणी समस्त सातारकरातून जोर धरू लागली आहे. ही मागणी तडीस नेण्यासाठी साताऱ्यात कृती समितीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.सातारा शहरात यापूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची शहर बस सेवा सुरु होती.  20 वर्षांपूर्वी ही सेवा बंद झाली. मागील 20 वर्षांत सातारा शहराचा विस्तार आणि लोकसंख्याही लक्षणीयरित्या वाढली. परिसरातील उपनगरेही आता सातारा नगर पालिकेच्या हद्दीमध्ये आली आहेत. शहराची रचना डोंगर उताराची असल्याने चालत सर्वत्र येणे-जाणे शक्‍य होत नाही. दुचाकी चालवता न येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणताही किफायतशीर वाहतुकीचा पर्याय उपलब्ध नाही. प्रत्येकाला माणसा गणिक दुचाकी खरेदी करणे व वापरणे परवडणारे नाही.शहरात पुण्याप्रमाणे सीएनजी रिक्षा नाहीत. शिवाय इंधनाच्या वाढत्या दरामुळे रिक्षाचालकांना मीटरवर रिक्षा चालवणे परवडत नाही. इतकी वर्षे रस्तेही ठिक नसल्याने रिक्षा दुरुस्तीवरही मोठा खर्च होत असे. खावली-रेल्वे स्टेशन ते दरे खुर्द हा पूर्व-पश्‍चिम विस्तार आणि बोगदा ते लिंबखिंड असा दक्षिण-उत्तर विस्तार पाहता जगतापवाडी-तामजाईनगरसह अनेक भागांना जोडणारी सिटी बस सेवा सुरु होणे गरजेचे आहे. सध्याचा गणेशोत्सव असेल किंवा येणारे नवरात्र असेल, सातारा शहरात गेल्या काही वर्षांत वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. सातारा शहराची रचना चढ-उताराची असल्याने दैनंदिन कामांसाठी हाताशी काही वाहन असणे आवश्‍यक ठरले आहे. त्यामुळे शहरात वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे प्रदूषणा बरोबरच पार्किंगचा प्रश्न जटील बनला आहे. शहर बस वाहतुकीच्या सर्व बसेस या मिनी बसेस असणे आवश्‍यक आहे. शहरातील लहान आणि अरुंद रस्त्यांवरुन 50 सिटर मोठ्या बसेस पळवण्यात काहीही अर्थ नाही. बस रूट आखताना एक सर्वव्यापी रिंगरोड असणे आवश्‍यक आहे, अशी मते समाज माध्यमातून सातारकर व्यक्त करत आहेत. जनरेटा वाढू लागल्यामुळे सातारा सिटी बस नागरिक कृती समिती स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाले आहेत.

लोकप्रतिनिधींनी घ्यावा पुढाकारया बस सेवेमध्ये दैनंदिन पासेस, मासिक पास, विद्यार्थी विशेष, महिला विशेष असे भागही करता येतील. काही बसेस वातानुकुलीतही ठेवता येतील. या सर्व बसेस बॅटरी किंवा इलेक्ट्रिक असतील तर प्रदुषणही टळेल. सातारकरांच्या हिताची काळजी असणाऱ्या सर्व नेत्यांना पक्षभेद विसरून हा प्रकल्प मार्गी कसा लावता येईल ते पहावे. 

वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्या पाहता, सातारा शहरामध्ये नव्या युगाशी सुसंगत अशी शहर बस वाहतूक सेवा सुरु होणे  गरजेचे आहे. नगर परिषद प्रशासन आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प आकाराला येऊ शकतो. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे सातारचे असल्याने, ते या प्रश्‍नाकडे तातडीचा प्रश्‍न म्हणून पाहतील आणि सातारकरांना आगामी दिवाळीची भेट बससेवेच्या रुपाने देतील, अशी अपेक्षा आहे.  - श्रीनिवास वारुंजीकर,  प्रवर्तक, "सातारा सिटीबस नागरिक कृती समिती'

टॅग्स :Satara areaसातारा परिसर