शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या फुकट्या कर्मचाऱ्यांचा शोध सुरू!

By admin | Updated: April 9, 2016 00:11 IST

‘स्टाफ’ला बसणार लगाम : चाळीस किलोमीटर अंतरासाठीच मिळणार पास

जगदीश कोष्टी -- सातारा -खाकी पँट घालायची अन् कोणत्याही एसटीत बसायचं... वाहकानं विचारलंच तर ‘स्टाफ’ असं हात वर करून सांगितलं की झालं... या परंपरेला लगाम घालण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष शोध मोहीम राबवली आहे. असे कर्मचारी आढळले तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे.लाखो प्रवाशांना इच्छितस्थळी घेऊन जाण्याचे काम राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीनं आजवर केलं आहे. खासगी प्रवासी वाहतूक (वडाप)शी सामना करत महामंडळ सेवा करत आहे. दरम्यानच्या काळात एसटीला उतरती कळा आली होती. ‘लाल डबा’ म्हणून हिणवला जात असलेल्या एसटीला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी खासगीकरणाचा विचार होत होता. मात्र, त्याला एसटी कर्मचाऱ्यांसह समाजातून तीव्र विरोध झाला. हा विचार बाजूला पडला अन् विविध प्रयोग राबविण्यात आले. त्यामुळे महामंडळ फायद्यात आहे.महामंडळाच्या एका सातारा विभागात सुमारे साडेपाच हजार कर्मचारी कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे राज्यात लाखो कर्मचारी सेवा बजावत आहेत. कर्मचाऱ्यांना मोफत सेवा ही कधीच दिली जात नव्हती. केवळ कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास करण्यास परवानगी आहे. मात्र, लाखो कर्मचारी केवळ ‘स्टाफ’ असे सांगून आजवर मोफत प्रवास करत आहेत. जर एखाद्या वाहकाने ओळखपत्र मागितले तर त्याला ते दाखवले जाते. वास्तविक पाहता या ओळखपत्रावरून मोफत प्रवास करण्यास परवानगी नाही. तरीही खुलेआमपणे कर्मचारी मोफत प्रवास करत होते. केवळ सहानुभूत दाखवून कारवाई होत नव्हती. तोट्यातील संस्था फायद्यात आणायची तर प्रत्येक कर्मचाऱ्याने ती माझी आहे, असे समजून व्यवहार करणे अपेक्षित असते. खासगी कामासाठीही कर्मचारी मोफत प्रवास करत असतील तर महामंडळ कसे फायद्यात येणार, असा एक मतप्रवाह पुढे येत होता. त्यातून ही मोहीम राबविली जात आहे. भाडं...दंड...कारवाईया मोहिमेत कोणता कर्मचारी खासगी कामासाठी मोफत प्रवास करताना आढळला तर त्याच्याकडून चुकवलेले भाडे वसूल केले जाणार आहे. त्यानंतर तो आढळला तर त्याला दंड केला जाईल. एवढे झाल्यानंतरही कर्मचारी आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. राहत्या घरापासून कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी चाळीस किलोमीटरच्या अंतरासाठी प्रवासपास दिला जातो. त्याशिवाय खासगी कामासाठी मोफत प्रवास करणे योग्य नाही. अनेक कर्मचारी एसटी मुक्कामाच्या ठिकाणी सोडून दुसऱ्या एसटीने गावी येतात. मात्र, त्यांनाही असे करणे नियमबाह्य आहे. त्यामुळे या शोध मोहिमेमुळे फुकट प्रवास करणाऱ्यांना निश्चित चाप बसेल.- विनोद भालेराव,विभागीय वाहतूक अधिकारी, सातारा विभाग