शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
6
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
7
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
8
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
9
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
10
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
11
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
12
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
13
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
14
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
15
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
16
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
17
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
18
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
19
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
20
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

‘एसटी’ वाचवतेय रोज एक लाख लिटर पाणी

By admin | Updated: May 23, 2016 00:22 IST

सातारा विभाग : आठशे बसेस दोन दिवसांतून धुतल्याने मोठी बचत--जलमित्र

सातारा : जलमित्र केवळ माणसांनीच व्हायला हवंय असं कोणी म्हटलंय. एखादी संस्थाही होऊ शकते, याचा प्रत्यय राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातून दाखवून दिला आहे. महामंडळाच्या सातारा विभागाकडे तब्बल आठशे एसटी गाड्या आहेत. या गाड्या दररोज न धुता दोन-तीन दिवसांतून आवश्यकतेनुसार धुण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे दररोज सुमारे एक लाख लिटर पाणी बचत होत आहे.राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाकडे आठशे एसटी गाड्या आहेत. प्रवाशांना दररोज चकाचक स्वच्छ गाडी असली तर प्रवास करायलाही आवडते, त्यामुळे या गाड्या नियमित धुण्यावर प्रत्येक आगाराचा प्रयत्न असतो. किमान लांब पल्ल्यांच्या गाड्या धुतल्यानंतरच आगारातून बाहेर काढल्या जातात. त्यामुळे एक गाडी धुण्यासाठी साधारणपणे दोनशे लिटर पाणी सहज लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत असते.राज्यभर पडलेला दुष्काळ, पाण्यासाठी चाललेली वणवण पाहून महामंडळाने या गाड्या पाणी वापरात काटकसर करण्याच्या लेखी सूचना सर्व विभाग नियंत्रक व आगार व्यवस्थापकांना केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सातारा विभागानेही केली असून, ते पत्र जिल्ह्यातील अकरा विभागांना पाठविले आहे.या मोहिमेला कर्मचारीही चांगला प्रतिसाद देत आहेत. गाडी खूपच अस्वच्छ झाली असेल तरच धुतल्या जात आहेत. आठशे गाड्या दररोज धुतल्या असत्या तर १ लाख ६० हजार लिटर पाण्याचा वापर झाला असता. मात्र, आता रोज पन्नास टक्केच गाड्या धुतल्या तरी किमान ७५ हजार लिटर पाणी व इतर मार्गाने वाचविलेले असे एकूण सुमारे एक लाख लिटर पाण्याची सहज बचत होत आहे. (प्रतिनिधी)नळांना बसविल्या तोट्या गाड्या धुण्यासाठी सर्वाधिक वापर होत आहे. असे असले तरी सर्व आगार, बसस्थानक, विभागीय कार्यशाळेत कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी, वापरासाठी पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांच्या अनेक नळांना तोट्या नव्हत्या. त्या ठिकाणी तोट्या बसविणे. आगारातील जलवाहिन्यांना गळती असल्यास त्या काढण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे रोज थेंब-थेंब पाण्याची बचत करण्यासाठी एसटीनं पुढाकार घेतला आहे. पाणीबचतीत सर्व आगार सहभागी दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने पाणीबचतीची मोहीम उघडली आहे. यामध्ये सर्वच अकरा आगार सहभागी झाले असून, त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, हे आनंदाची बाब आहे.- विनोदकुमार भालेराव, विभागीय वाहतूक अधिकारी.