शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

एसटी तीच, ठिकाणबी तेच.. पुन्हा बंद पडली..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:14 IST

कातरखटाव : खटाव तालुक्यातील वडूज आगाराच्या नियोजनशून्य व ढिसाळ कारभारामुळे एसट्या कुठेही बंद पडायला लागल्या आहेत. त्याचं झालं असं ...

कातरखटाव : खटाव तालुक्यातील वडूज आगाराच्या नियोजनशून्य व ढिसाळ कारभारामुळे एसट्या कुठेही बंद पडायला लागल्या आहेत. त्याचं झालं असं वडूज आगाराची वडूज-कान्हरवाडी एसटी (एमएच १२ ईएफ ६८९७) ही एसटी वडूज, कातरखटाव, एनकूळ, खातवळ, कान्हरवाडी फेऱ्या करीत असते. १ तारखेला वडूजमधून प्रवासी घेऊन निघाली आणि कातरखटाव थांब्यावर साडेपाच वाजता बंद पडली अन् प्रवाशांचे हाल झाले. आज तोच प्रकार पुन्हा गुरुवारी (दि. ४) हीच लालपरी दुपारी दीड वाजता वडूज डेपोतून निघाली पुन्हा त्याचं ठिकाणी कातरखटाव बसथांब्यावर येऊन बंद पडली. त्यामुळे नेहमीप्रमाणे ‘चलो उतरो यार धक्का मार,’ या खेळामुळे प्रवासी व ग्रामस्थांमध्ये खुमासदार चर्चेचा विषय बनला.

लॉकडाऊन काळात गेली सात महिने एसटीची चाकं बंद होती. परंतु गेल्या महिनाभरापासून प्रवाशांच्या सेवेसाठी असणाऱ्या एसटीची चाकं फिरायला लागली असलीतरी आज इथे ब्रेक निकामी तर उद्या तिथे, कधी स्टार्टर लागेना तर कधी बॅटरीला करंट येईना. चालक, वाहकांचे हाल, दिवसभर सुटी नाही. कितीही उशीर होऊ द्या एसटीच्या फेऱ्या पुऱ्या करायच्याच; परंतु एसट्या प्रत्येक गावात, खेड्यापाड्यात वेळेवर गेल्या तरच एसटीला प्रवासी भेटतील. एसटीचं जर दोन-दोन तास उशीर झाला तर प्रवासी थांबतील का.. आणि परत म्हणायचे एसटी महामंडळ तोट्यात आहे. अशा या वडूज आगाराच्या गचाळ कारभारामुळे घरी परतणाऱ्या शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना दोन ते तीन तास रखडपट्टीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

प्रतिक्रिया :

एनकूळला निघालोय आत्ता काय करायचं तिकीट काढून बसलोय. अडकून बसलोय, चालू होईल तेव्हा जायचं, हे काय आम्हाला नवीन नाही. वडूज आगाराची नेहमीचाच प्रकार आहे.

-मुकुंदराव खाडे, प्रवासी एनकूळ

प्रतिक्रिया :

बंद पडलीय ढकलून बघितली चालू होईना, मागं ढकलली.. पुढं ढकलली स्टार्टर लावून बघितलं चालू होतं नाही. आपोआप बंद पडत आहे. प्रवाशांनी तिकीट काढलेले असतात, त्यांचे बोलणे खावे लागतेय. काय करायचं.

- विलास मदने, एसटी चालक

०५कातरखटाव

फोटो ओळ : वडूज आगारातील वडूज-कान्हरवाडी बसचा ब्रेक निकामी झाल्याने पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. (छाया : विठ्ठल नलवडे)