शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

मोळाच्या ओढ्याजवळ मृत्यूचा चौक...

By admin | Updated: February 6, 2017 00:55 IST

अपघातांना निमंत्रण : सातारा-पुणे, सातारा-महाबळेश्वर रस्त्यामुळे वर्दळ मोठी; परंतु उपाययोजनांच्या त्रुटी !

सातारा : जिल्हाभर गेल्या महिन्यात रस्ता सुरक्षा सप्ताह जोरात साजरा केला गेला. परंतु शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मोळाच्या ओढाजवळील सातारा-पुणे व सातारा-महाबळेश्वर या दोन मार्गांना जोडणाऱ्या चौकात कोणत्याही उपाययोजना नसल्याने तो अपघातांना निमंत्रण देत आहे. अनेकांच्या आयुष्याचा छेद घेतलेला हा चौक ओलांडताना वाहनचालकांचा थरकाप उडवत आहे. सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा पोलिस, राज्य परिवहन महामंडळातर्फे जिल्ह्यात रस्ता सुरक्षा सप्ताह दरवर्षी थाटात साजरा केला जातो. यानिमित्ताने शहरातून अनेक उपक्रम राबवून जनजागृती केली गेली. हे सर्व कौतुकास्पद आहेच; परंतु अनेक वर्षांपासून धोकादायक ठरलेल्या बाबींकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे समोर येत आहेत. सातारा-पुणे मार्गावरील मोळाचा ओढा येथे असलेला चौक हा त्यापैकीच एक आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण झाले आहे. त्यामुळे पुण्याकडून साताऱ्यात येणारी वाहने सरासरी ऐंशी किलोमीटर प्रतितास पेक्षा जास्त वेगाने येतात. आनेवाडी टोलनाक्याचा अपवाद वगळण्यानंतर साताऱ्यापर्यंत वाहनांना कसलाही अडथळा नाही. त्यामुळे साताऱ्यात प्रवेश केला तरी वाहने आहे त्याच वेगात येतात. लिंबखिंडपासून साताऱ्यात येणारा रस्ता मोळाचा ओढापर्यंत अरुंद आहे. बरेचशे अंतर जास्त वेगात वाहन चालविल्यामुळे वाहनांचा वेग कमी करण्याची वाहनचालकांची मानसिकता होत नाही. त्यामुळे अरुंद मार्गावरून समोरून आलेल्या वाहनांना कट मारत शहरात येतात. काही अंतरावर मोळाचा ओढा लागतो. त्याठिकाणी अचानक छेद रस्ता लागतो. महाबळेश्वरकडून येणारी वाहनेही या चौकात येताना वेग कमी करत नाहीत. साताऱ्याकडून पुण्याकडे निघालेली वाहने चौक ओलांडून पुण्याकडे जातात. त्यामुळे लहान-मोठे अपघात घडत आहेत. (प्रतिनिधी) रस्त्याकडेलाच भाजीमंडई सातारा-पुणे, सातारा-महाबळेश्वरला जाणारा रस्ता जेथे जोडला जातो. तेथेच रस्त्याच्या कडेलाच सायंकाळच्या वेळेस शेतकरी भाजी विकण्यासाठी बसतात. या परिसरातील ग्रामस्थांसाठी यामुळे सोय होत असली तरी रहदारीसाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे भाजीविक्रेत्यांना पर्यायी जागा देऊन भविष्यातील संकट टाळण्याची गरज आहे. वाहतूक पोलिस अन् सिग्नलचा अभाव या चौकात वाहनांचा ताण असतो. त्यामुळे येथे चोवीस तास धोका दाखविणारे स्वयंचलित सिग्नल बसविण्याची गरज आहे. तसेच वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्याची मागणी अनेक वर्षांपासून जोर धरत आहे. सायंकाळी दुचाकींची वर्दळ सातारा शहराचा विस्तार होत आहे. त्यामुळे बहुसंख्य लोक कण्हेर, साबळेवाडी, नुने, सारखळ, कोंडवे तसेच सैदापूर, वर्ये, नेले, किडगाव, धावडशी आदी गावांमधील तरुण-तरुणी महाविद्यालय तसेच नोकरीनिमित्ताने दुचाकीवरून साताऱ्यात येतात. सकाळी आठ ते अकरा व सायंकाळी पाच ते सात या वेळेत दुचाकींची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या काळात पोलिस देण्याची गरज आहे. )