शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
3
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
4
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
5
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
6
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
7
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
8
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
9
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
10
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
11
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
12
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
13
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
14
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
15
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
16
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
17
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
18
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
19
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम

पसरणी गावाने देशाला थोर व्यक्ती दिल्या

By admin | Updated: May 24, 2016 00:56 IST

पृथ्वीराज चव्हाण : विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी गौरवोद्गार; केंद्रातील सरकारकडून जातीयतेचे राजकारण

वाई : ‘पसरणी गावाने पद्मश्री बी. जी. शिर्के व पद्मश्री शाहीर साबळे यांच्या रूपाने थोर व्यक्ती देशाला दिल्या आहेत. त्यांच्या विचाराचा वारसा जपत गावातील तरुण ‘नवतरुण विकास आघाडी’च्या माध्यमातून गावची एकी व गावपण जपत कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली. ज्यांच्यामुळे विकास कामे मार्गी लागली त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही भावना समाजात लोप पावली असताना आता मुख्यमंत्री वा कोणत्याही उच्च पदावर नसताना पसरणीकरांनी केलेल्या सन्मानामुळे मी भारावून गेलो आहे,’ असे भावनिक मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.पसरणी, ता. वाई येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, नंदकुमार खामकर, आरपीआय जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्या राधाताई शिंदे, विजय भिलारे, विकास शिंदे, रतन शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.चव्हाण म्हाणाले, ‘या देशाचा विकास हा लोकशाही मार्गानेच झाला असून, आगामी काळात समतावादी विचाराने सर्वधर्म मानणाऱ्या पक्षांनी एकत्रित येऊन लोकशाही बळकट करावी लागणार आहे. देशातील केंद्राच्या सरकारकडून जातीयतेचे राजकारण चालले असून, केंद्र व राज्य सरकार दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी कमी पडत आहे. मुख्यमंत्री असताना जिल्ह्यातील अनेक विकास कामे मार्गी लावली. त्यावेळी पसरणीच्या नवतरुण विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जी कामे सुचविली त्याला मंजुरी दिली; पण आता मी मुख्यमंत्री वा कोणत्याही उच्चपदावर असताना झालेल्या कामाबद्दल त्यांनी जी कृतज्ञता व्यक्त करून जो सन्मान केला त्यातून मी भारावून गेलो.’मदन भोसले म्हणाले, ‘आजकाल परिस्थिती फार वेगळी आहे. जे जनतेची कामे करतात ते काहीच बोलत नाहीत. आज खोट्या कामाचे श्रेय घेणारी मंडळी जास्त आहेत. ज्यांनी काम केलं त्यांचा मान राखनं हा चांगुलपणा पसरणीकरांमध्ये आहे. १३ वर्षांपूर्वी आजारी असणारा किसन वीर कारखाना ऊर्जितावस्थेत आणून प्रतापगडसह खंडाळा कारखान्यातून आज साखर निर्मिती होऊ शकली आहे. यावेळी आनंदराव पाटील, अशोकराव गायकवाड, दिलीप वाडकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास किसन भिलारे, स्वप्नील बगाडे, नगरसेवक सचिन फरांदे, महेंद्र धनवे, चंद्रकांत चव्हाण, रोहिदास पिसाळ, प्रवीण जगताप, अजित खामकर, विजय शिंदे आदींची व पसरणी परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. (प्रतिनिधी)... तर गावाचा शाश्वत विकास साधता येईल‘पद्मश्री बी. जी. शिर्के यांचे व माझे अतिशय घनिष्ठ संबंध होते. मी ही त्याकाळी इंजिनिअर असल्यामुळे अनेक कामात त्यांच्याशी चर्चा करत असे. त्यांच्या बोलण्यात नेहमी गावच्या नवतरुणांनी जोपासून आपापल्या गावचा विकास आराखडा तयार करावा म्हणजे अनेक कामे क्रमाने मार्गी लागतील व शाश्वत विकास साधता येईल,’ असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.