शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपातळी खालावल्यावर विहिरींना उफळा !

By admin | Updated: April 15, 2016 23:34 IST

प्रशासनाचं ‘वरातीमागून घोडं’ : जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात प्रस्ताव मंजुरीसाठी उत्साह दाटून आला.

सातारा : जिल्हा परिषदेकडे प्रस्तावित केलेल्या ३१५ विंधन विहिरींच्या प्रस्तावात ‘क्युरी’ काढून फाईल गुंडाळून ठेवणारे अधिकारीच आता पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर दिसेल त्या फाईलवर सह्या करू लागलेत; मात्र पाणी पातळी खाली गेल्यानंतर विंधन विहिरींना मंजुरी देणाऱ्या या प्रशासनाची ‘वरातीमागून घोडे ,’ अशी परिस्थिती झालीय.दुष्काळाचे गांभीर्य नसलेली शासकीय यंत्रणा आणि निर्णय न घेण्याचा हटयोग करून बसलेले मंत्री यांच्या आडकित्त्यात दुष्काळी जनतेच्या अपेक्षांचा चुराडा होताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये १९७२ पेक्षा भयंकर दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. सलग तीन वर्षे पावसाने पाठ फिरवली असल्याने जलयुक्तची कामे होऊन देखील बंधारे, तलाव, नद्या कोरड्या पडल्या आहेत. जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या परिस्थितीमध्ये दुष्काळी उपाययोजनांकडे गांभीर्याने पाहिले गेले नसल्याने ऐनवेळी निर्णय घेण्याची मालिकाच सुरू झाली आहे. गेल्या महिन्यात टंचाई आढावा बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा विभाग विंधन विहिरींचे प्रस्ताव दाबून ठेवत असल्याचे आमदारांनी उघडकीस आणले होते. ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायती विंधन विहिरींची मागणी करुन थकत होते. मात्र, सरकारी फाईल पुढे सरकत नसल्याने भटकंती सुरूच होती. जिल्ह्यातील ३१५ प्रस्तावित विंधन विहिरींची कामे तत्काळ पूर्ण करण्यात यावीत, खासगी काम करणाऱ्या मशिनरी १८ एप्रिलपर्यंत ताब्यात घेऊन ही कामे हाती घ्या, टंचाई काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्वांनी एकत्रित कामाला लागा, असे आदेश पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले, त्यानंतर जिल्हा परिषदेची यंत्रणा कामाला लागली. प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रिया वेगाने सुरू आहेत. या प्रक्रियेनंतर विहिरींच्या प्रत्यक्ष कामाला मे महिना उजाडणार आहे. मे महिन्यात जमिनीतील पाणीपातळी आणखी खालावणार असल्याने या कामाचा फायदा होणार की खर्च केलेला पैसा पाण्यात जाणार? हाही सवाल आहे. टँकर फिडिंग पॉइंटची देयके टंचाईमधून देण्यात यावीत, टँकरची मागणी होताच सात दिवसांच्या आत टँकर चालू करावा, उपसा सिंचन योजनेची देयके टंचाईमधून देण्यात यावीत, असे निर्णय पालकमंत्री शिवतारे यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत घेतले होते. टंचाईग्रस्त भागांमध्ये केवळ २ टँकर सरकारी मालकीचे तर इतर ७३ टँकर खासगी मालकीचे आहेत. टँकर लॉबी शासकीय यंत्रणेला हाताशी धरून कागदे रंगवत पाणी वाटपाची बिले काढून घेत असल्याने त्यांच्यासाठी दुष्काळ ‘ईष्टआपत्ती’ ठरल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी) उन्हाळ्यामुळे पिण्याच्या पाण्याची गरज वाढली आहे. मात्र आठ दिवसांतून एकदा तेही अनियमितपणे टँकर गावात येत असतो. वाड्या-वस्त्यांवर तर रस्त्यांअभावी पोहोचतही नाही, अशी अवस्था आहे. पाणी मिळाले नाही, तर आम्ही ऊर बडवून मरायचे काय?- विठ्ठल जाधव, दुष्काळग्रस्त शेतकरीपालकमंत्र्यांनीच दुष्काळी भागात तळ ठोकावादुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्यावाचून तडफडणारी गावे हतबल झाली आहेत. ज्या ठिकाणी रस्त्यांची सोय नाही, अथवा रस्ते कच्चे आहे, त्या वाड्या-वस्त्यांवर टँकर पोहोचत नाहीत. अनेक ठिकाणी टंचाईग्रस्त व टँकरचे चालक यांच्यात या कारणाने बाचाबाची होत असते. शासकीय यंत्रणाही केवळ कागदी घोडे नाचविण्यात मश्गूल असल्याने पालकमंत्र्यांनी मुंबईत बसून टंचाई आढावा बैठका घेण्याऐवजी जरा दुष्काळी भागात येऊन निर्णय घ्यावेत. त्यांनी दुष्काळी भागात तळ ठोकला तर त्यांना वस्तुस्थिती अधिक ठळकपणे दिसेल, अशी मागणी दुष्काळी भागातील नागरिक करत आहेत.