शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

बोलक्या अंगणवाड्या पडल्या ओस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 16:45 IST

अंगणवाडीतार्इंनी गत काही दिवसांपासून संप सुरू केला आहे. मानधनाची रास्त व बेताची मागणी असतानाही शासन या संपाकडे गांभीर्याने पाहत नसल्याची परिस्थिती आहे. सुमारे महिनाभरापासून संप सुरू असल्याने बोलक्या अंगणवाड्या सध्या ओस पडल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. 

ठळक मुद्देअंगणवाडी सेविकांचा संप बालकांचेही शैक्षणिक नुकसान

कार्वे (जि. सातारा), 5 : अंगणवाडीतार्इंनी गत काही दिवसांपासून संप सुरू केला आहे. मानधनाची रास्त व बेताची मागणी असतानाही शासन या संपाकडे गांभीर्याने पाहत नसल्याची परिस्थिती आहे. सुमारे महिनाभरापासून संप सुरू असल्याने बोलक्या अंगणवाड्या सध्या ओस पडल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. 

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करावी, बचट गटांच्या गत दहा महिन्यांपासून थकीत असणाºया आहाराच्या बिलांची रक्कम तातडीने द्यावी, झेरॉक्स, स्टेशनरी, आॅनलाईन अहवालावर केलेला दोन हजार रुपये खर्च द्यावा आदी प्रमुख मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी संपाचे हत्यार उपसले आहे. यापूर्वीही याच मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला होता.

प्रशासकीय अधिकाºयांना वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र, त्याची दखल घेतली गेली नसल्याने अखेर सेविकांनी राज्यव्यापी संप पुकारला. अंगणवाडी सेविकांना ८० ते १०० रुपये एवढी रोजची हजेरी मिळते. या तूटपुंज्या मानधनावर त्यांना संसार चालवावा लागतो. एवढ्या कमी मानधनात काम करूनही सेविकांवर कामाचा ताण नेहमीच जास्त असतो. आम्ही काम करतो; पण पगारवाढ द्या, अशी सेविकांची रास्त मागणी आहे. मात्र, त्याकडे शासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे अंगणवाडी तार्इंचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून, त्यांची प्रचंड आर्थिक कोंडी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

अंगणवाडी बंद असल्याने सेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासन लक्ष देत नसल्याने दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्न त्यांना सतावत आहे. तसेच या संपामुळे अंगणवाड्याही ओस पडल्या आहेत. शिक्षणाचा श्रीगणेशा असलेली अंगणवाडी बंद असल्यामुळे बालकेही शिक्षणापासून वंचित राहत आहेत. आपल्या पाल्याच्या शिक्षणाची होणारी हेळसांड पाहून पालकही अस्वस्थ झाले असून, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन हा संप मिटवावा, अशी मागणी होत आहे.