शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाण्यांच्या किमतीत दुपटीने वाढ

By admin | Updated: June 8, 2014 00:52 IST

शेतकरी हवालदिल : क्षेत्र कमी झाल्याने उत्पादन घटण्याची शक्यता

कोपर्डे हवेली : खरीप हंगामातील तीन महिन्यांचे पीक म्हणून शेतकरी सोयाबीनचे उत्पादन घेतात. वेगवेगळ्या जातींची प्रमाणित केलेली बियाणे वापरून जादा उत्पादन काढण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीन बियाण्यांच्या किमतीत दुपटीने वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा असून, कंपनीने सोयबीनच्या बियाण्यांमध्ये दुपटीने वाढ केली आहे. महागडे बियाणे परवडत नसल्यामुळे अनेक शेतकरी वेगळी पिके घेण्याच्या तयारीत आहेत. सोयाबीन बियाण्याची पेरणी करून उत्पादन घेण्यासाठी एकरी ४० किलो बियाणे लागते. गेल्यावर्षी वेगवेगळ्या जातींच्या बियाण्यांची किंमत ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो होती. यावर्षी मात्र ९० रुपयांपासून १०५ रुपयांपर्यंत दर आहे. त्यामुळे एकरी बियाणे खरेदी करण्यासाठी सुमारे चार हजार रुपये खर्च येत आहे. जे. एस. ३३५ जातींच्या बियाण्यांची २५ किलोची किंमत २७०० रुपये आहे. रोहित सिड्स कंपनीचे ३० किलोची किंमत २७०० रुपये आहे. सुमारे ९० पासून १०५ रुपये एक किलोची किमती आहेत. बाजारपेठेत सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा जाणवत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. बियाणे मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. (वार्ताहर)