शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

सोयाबीन पीक घरात...उधारीवाले दारात, सातारा तालुक्यातील शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 17:01 IST

शासनाकडून सोयाबिनला निर्धारीत दर दिला जात आहे. मात्र, दुसरीकडे सोयाबीन खरेदीसाठी घालण्यात आलेल्या जाचक अटींची पूर्तता करताना सातारा तालुक्यातील शेतकरी हवालदील झाले आहेत.

ठळक मुद्देखरेदीच्या जाचक अटी शिथील करण्याची मागणी तालुक्यातील शेंद्र्रे, आसनगाव परिसरात सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री केंद्र्रांवर सोयाबीन खरेदीसाठी अनेक निकष

शेंद्रे ,दि. ११ : शासनाकडून सोयाबिनला निर्धारीत दर दिला जात आहे. मात्र, दुसरीकडे सोयाबीन खरेदीसाठी घालण्यात आलेल्या जाचक अटींची पूर्तता करताना सातारा तालुक्यातील शेतकरी हवालदील झाले आहेत. खरेदीअभावी सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडून असून पीक घरात... उधारीवाले दारात अशीच परिस्थिती सर्वत्र दिसू लागली आहे.

सातारा तालुक्यातील शेंद्र्रे व आसनगाव परिसरात सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदाही या पिकाचे शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादन घेतले आहे. शासनाने प्रत्येक तालुका खरेदी-विक्री संघामार्फत सोयाबीन पिकाची खरेदी प्रति क्विंटल ३ हजार ५० रुपये दराने सुरू केली आहे. परंतु खरेदी-विक्री केंद्र्रांवर सोयाबीन खरेदीसाठी अनेक निकष लावण्यात आले आहेत.

परिणामी या पीकाची काढनी व मळनी होऊन महिला उलटला तरी शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच पडून आहे. जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचनींचा सामना करावा लागत आहे. अटींची पूर्तता न केल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन घेऊन पुन्हा माघारी यावे लागत आहे.

सोयाबीन काढणीस एकरी तीन ते चार हजार रुपए तर मळनीस एका पोत्यास २५० ते ३०० रुपये एवढा खर्च येतो. बहुतांश शेतकरी सोयाबीन पिकाची काढनी, मळनी व मशागत उधारीवर व बोलीवर करतात.

काढणी झाल्यावर लगेचच पिकाची विक्री करून देणी भागविली जातात. परंतु विक्रीअभावी सोयाबीन घरात पडून राहिल्याने पीक घरात... उधारीवाले दारात असे चित्र सध्या सातारा तालुक्यात दिसू लागले आहे.

एकीकडे शेतकरी अडचणीत आला असताना खासगी व्यापारी मात्र गुपचुप कमी दराने सोयाबीनची खरेदी करत आहेत. घरात पडून राहण्यापेक्षा शेतकरी नाईलाजाने प्रति क्विंटल २ हजार ५०० इतक्या कमी दरात सोयाबीनची खासगी व्यापाऱ्यांना विक्री करीत आहेत. शासनाचे या जाचक अटी शिथील कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.खरेदीसाठी निकष

  1.  सोयाबीनमध्ये घाण, माती नसावी
  2. स्वच्छ चाळणी केलेला असावा
  3. आद्रतेचे प्रमाण १२ टक्के पेक्षा कमी असावे
  4.  दर्जा एफएक्यू (पिवळा) असावा
  5. साताबाऱ्यावर सोयाबीनची चालू वर्षाची नोंद असावी

जाचक अटींची पूर्तता करताना शेतकरी मेटाकुटीला येत आहे. त्यामुळे शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात सोयाबीन विक्री करीत आहे. शासनाने जाचक अटी शिथील करून सरसकट खरेदी सुरू करावी.- महेंद्र्रकुमार मुळीक,शेतकरी, सोनगाव.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार