शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

सोयाबीन पीक घरात...उधारीवाले दारात, सातारा तालुक्यातील शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 17:01 IST

शासनाकडून सोयाबिनला निर्धारीत दर दिला जात आहे. मात्र, दुसरीकडे सोयाबीन खरेदीसाठी घालण्यात आलेल्या जाचक अटींची पूर्तता करताना सातारा तालुक्यातील शेतकरी हवालदील झाले आहेत.

ठळक मुद्देखरेदीच्या जाचक अटी शिथील करण्याची मागणी तालुक्यातील शेंद्र्रे, आसनगाव परिसरात सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री केंद्र्रांवर सोयाबीन खरेदीसाठी अनेक निकष

शेंद्रे ,दि. ११ : शासनाकडून सोयाबिनला निर्धारीत दर दिला जात आहे. मात्र, दुसरीकडे सोयाबीन खरेदीसाठी घालण्यात आलेल्या जाचक अटींची पूर्तता करताना सातारा तालुक्यातील शेतकरी हवालदील झाले आहेत. खरेदीअभावी सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडून असून पीक घरात... उधारीवाले दारात अशीच परिस्थिती सर्वत्र दिसू लागली आहे.

सातारा तालुक्यातील शेंद्र्रे व आसनगाव परिसरात सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यंदाही या पिकाचे शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादन घेतले आहे. शासनाने प्रत्येक तालुका खरेदी-विक्री संघामार्फत सोयाबीन पिकाची खरेदी प्रति क्विंटल ३ हजार ५० रुपये दराने सुरू केली आहे. परंतु खरेदी-विक्री केंद्र्रांवर सोयाबीन खरेदीसाठी अनेक निकष लावण्यात आले आहेत.

परिणामी या पीकाची काढनी व मळनी होऊन महिला उलटला तरी शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच पडून आहे. जाचक अटींमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचनींचा सामना करावा लागत आहे. अटींची पूर्तता न केल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन घेऊन पुन्हा माघारी यावे लागत आहे.

सोयाबीन काढणीस एकरी तीन ते चार हजार रुपए तर मळनीस एका पोत्यास २५० ते ३०० रुपये एवढा खर्च येतो. बहुतांश शेतकरी सोयाबीन पिकाची काढनी, मळनी व मशागत उधारीवर व बोलीवर करतात.

काढणी झाल्यावर लगेचच पिकाची विक्री करून देणी भागविली जातात. परंतु विक्रीअभावी सोयाबीन घरात पडून राहिल्याने पीक घरात... उधारीवाले दारात असे चित्र सध्या सातारा तालुक्यात दिसू लागले आहे.

एकीकडे शेतकरी अडचणीत आला असताना खासगी व्यापारी मात्र गुपचुप कमी दराने सोयाबीनची खरेदी करत आहेत. घरात पडून राहण्यापेक्षा शेतकरी नाईलाजाने प्रति क्विंटल २ हजार ५०० इतक्या कमी दरात सोयाबीनची खासगी व्यापाऱ्यांना विक्री करीत आहेत. शासनाचे या जाचक अटी शिथील कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.खरेदीसाठी निकष

  1.  सोयाबीनमध्ये घाण, माती नसावी
  2. स्वच्छ चाळणी केलेला असावा
  3. आद्रतेचे प्रमाण १२ टक्के पेक्षा कमी असावे
  4.  दर्जा एफएक्यू (पिवळा) असावा
  5. साताबाऱ्यावर सोयाबीनची चालू वर्षाची नोंद असावी

जाचक अटींची पूर्तता करताना शेतकरी मेटाकुटीला येत आहे. त्यामुळे शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात सोयाबीन विक्री करीत आहे. शासनाने जाचक अटी शिथील करून सरसकट खरेदी सुरू करावी.- महेंद्र्रकुमार मुळीक,शेतकरी, सोनगाव.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार