शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

बाजरी, सोयाबीनचा पेरा जास्त : खरिपाची पेरणी १०५ टक्के ; पावसामुळे भुईमुगाला अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 21:25 IST

जिल्ह्यातील पेरणी ७ आॅगस्टच्या आकडेवारीनुसार १०५ टक्के झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ५२ हजार ८८ हेक्टर आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील भातावरही परिणाम

सातारा : जिल्ह्यात उशिरा पाऊस आल्याने खरीप हंगामातील पेरणीवर परिणाम होणार का? अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, सद्य:स्थितीत जिल्ह्यात १०५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये बाजरी आणि सोयाबीनची पेरणी व टक्केवारीही अधिक असून, पावसामुळे भुईमूग आणि भात लागणीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस दाखल होतो. तर त्यापूर्वी उन्हाळ्यात वळवाचा आणि मान्सूनपूर्व पाऊस बरसतो. त्यामुळे शेतकरी हे मान्सून सुरू होण्यापूर्वीच मशागतीची कामे करून बी-बियाण्यांची जुळवाजुळव करतो; पण यंदा वळवाचा पाऊसच झाला नाही. तर मान्सूनच्या पावसाने २० जूननंतर जिल्ह्यात प्रवेश केला. सुरुवातीला पूर्व आणि पश्चिम भागात चांगला पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांना हायसे वाटले; पण त्यानंतर पूर्व भागाकडे पावसाने वक्रदृष्टी ठेवत पश्चिमेकडे जोरदार सुरुवात केली. परिणामी पूर्वेकडील पेरणी रखडणार, असे वाटत होते. तरीही शेतकऱ्यांनी असणाºया ओलीवर पेरणी उरकण्याचे काम केले. त्यामुळे जिल्ह्यातील पेरणी ७ आॅगस्टच्या आकडेवारीनुसार १०५ टक्के झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ५२ हजार ८८ हेक्टर आहे. त्याहून अधिक म्हणजे ३ लाख ७० हजार ७४९ हेक्टरवर पेरा झालाय. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक क्षेत्र ५३ हजार ७५० हेक्टर असून, प्रत्यक्षात ५९ हजार १९६ हेक्टरवर शेतकºयांनी हे पीक घेतलंय. त्यानंतर भाताचे क्षेत्र ५० हजार ८१७ हेक्टर असलेतरी आतापर्यंत ४१ हजार २६५ हेक्टरवरच लागण झालीय. हे प्रमाण ८१.२० टक्के इतके आहे. कºहाडला ८ हजार ९७७ पैकी फक्त ४ हजार ३२० हेक्टरवर लागण झाली आहे. बाजरीचे क्षेत्र तिसºया क्रमांकावर असून, ४९ हजार ५३१ हेक्टर क्षेत्र असलेतरी प्रत्यक्षात ५७ हजार १५५ हेक्टरवर पेरणी झालीय. बाजरी प्रामुख्याने माण, खटाव आणि फलटण तालुक्यात अधिक प्रमाणात घेण्यात येते.भुईमुगाच्या पेरणीवर पावसाचा परिणाम झाला आहे. कारण, पश्चिम भागात पावसाची संततधार राहिली, त्यामुळे शेतकºयांना वेळेत पेरणी करता आली नाही. भुईमुगाचे ४० हजार ४३० हेक्टर एवढे क्षेत्र निश्चित करण्यात आलं आहे. त्यापैकी ३३ हजार २३० हेक्टरवर पेरणी झाली असून, टक्केवारी ८२.१९ इतकी आहे.

सातारा तालुक्यात ७ हजार ४२१ पैकी २ हजार ९२९, पाटणमध्ये १७ हजार ५६८ पैकी १६ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालीय. तर जावळी तालुक्यात सर्वसाधारणपणे २ हजार ९७४ हेक्टर क्षेत्र होते. तरीहीभुईमुगाची लागण ४ हजार ५८५ हेक्टरवर झाली. ही पेरणी अधिक ठरली आहे.जिल्ह्यात ज्वारीची पेरणी ६२.६४ टक्के झाली आहे. तर मका ७४.३६ टक्के, नाचणी ७४.९७, तूर ७४.५७, उडीद १०५.१४, मुगाची १५६ टक्के पेरणी झाली आहे.

पश्चिमेकडे नुकसानीची भीती...जिल्ह्यात पूर्वेकडे एकदम कमी पाऊस पडतो. तर पश्चिमेकडे पावसाळ्यात धुवाँधार असतो. यावर्षी पश्चिमेकडे पावसाने हाहाकार माजवला. तर पूर्वेकडे मात्र पावसाची दडीच आहे. त्यामुळे पूर्व भागातील पिकांसाठी पावसाची आवश्यकता आहे. तरच उत्पादन हाती येईल. पश्चिमेकडे मात्र सततच्या पावसाने पिकांचे नुकसान होणार आहे. तर काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्याने पीकही संपल्याची स्थिती आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfloodपूरFarmerशेतकरी