शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

सोनगाव-शेळकेवाडी पूल ठरतोय वाहतुकीसाठी धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शेंद्रे : सातारा तालुक्यातील सातारा - आसनगाव मार्गावरील उरमोडी नदीवर असणारा सोनगाव-शेळकेवाडी पूल पावसाळ्यात वाहतुकीसाठी धोकादायक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शेंद्रे : सातारा तालुक्यातील सातारा - आसनगाव मार्गावरील उरमोडी नदीवर असणारा सोनगाव-शेळकेवाडी पूल पावसाळ्यात वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. पुलाच्या खाली नदीचे आणि पुलावरील रस्त्यावर पावसाचे पाणी साचत असल्यामुळे वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सोनगाव-शेळकेवाडी मार्गावरील पुलाच्या निर्मितीला अनेक वर्षे झाली आहेत. पाऊस सुरू झाल्यावर या पुलावरच पावसाचे पाणी साचून राहते. त्यातच या पुलाला असणाऱ्या संरक्षक कठड्यावरील पाईपही चोरीला गेल्या आहेत. पुलावरील रस्त्यावर खड्डेही पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या पुलावरील साचलेल्या पाण्यातूनच दुचाकी व चारचाकी वाहने जातात. पुलावर साचून राहणाऱ्या पाण्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यातच संरक्षक कठड्याचेही पाईप चोरीला गेल्यामुळे एखादा मोठा अपघात झाल्यास वाहन थेट नदीपात्रात पडण्याची शक्यता आहे.

या पुलाच्या संरक्षक कठड्यासंदर्भात येथील स्थानिकांनी तक्रार करूनही बांधकाम विभागाकडून कोणतीही उपाययोजना अद्याप करण्यात आलेली नाही. या पुलाचा वापर आसनगाव परिसरातील दहा ते बारा गावांमधील लोक रहदारीसाठी करतात. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

फोटो : २९ सागर नावडकर

उरमोडी नदीवरील सोनगाव-शेळकेवाडी पुलावरच पाणी साचत असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. (छाया : सागर नावडकर)