शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
2
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
3
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
4
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
5
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
6
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
7
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
8
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
9
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
10
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
11
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
12
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
13
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
14
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
15
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
16
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
17
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
18
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
19
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
20
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

सोनगाव प्रकाशमय, ६५ कुटुंबीयांचा काळोख कायमचा दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:16 IST

सातारा : गेल्या अनेक वर्षांपासून मिनमिनत्या दिव्याखाली आपला संसाराचा गाडा चालविणाऱ्या तसेच आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आपल्या घरी कधी वीज येईल, अशी कल्पनाही न करणाºया फलटण तालुक्यातील सोनगाव येथील ६५ कुटुंबियांच्या घरातील काळोख कायमचा दूर झाला आहे. या कुटुंबांना शासनाच्या सौभाग्य योजनेअंतर्गत मोफत वीजकनेक्शन मिळाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.फलटण तालुक्यातील ...

सातारा : गेल्या अनेक वर्षांपासून मिनमिनत्या दिव्याखाली आपला संसाराचा गाडा चालविणाऱ्या तसेच आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आपल्या घरी कधी वीज येईल, अशी कल्पनाही न करणाºया फलटण तालुक्यातील सोनगाव येथील ६५ कुटुंबियांच्या घरातील काळोख कायमचा दूर झाला आहे. या कुटुंबांना शासनाच्या सौभाग्य योजनेअंतर्गत मोफत वीजकनेक्शन मिळाल्याने सर्वांनी आनंद व्यक्त केला.फलटण तालुक्यातील सोनगावच्या वयोवृद्ध माने दाम्पत्याच्या चंद्र्रमौळी झोपडीत रॉकेलवर चालणारा मिणमिणता दिवा हाच रात्रीच्या अंधारात उजेडाचा एकमेव आधार होता. हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना वीजजोडणी घेता आली नव्हती. मात्र महावितरणने सौभाग्य योजनेतून नुकतीच माने दाम्पत्यास मोफत वीजजोडणी दिली. आयुष्याच्या उत्तरार्धात विजेचा प्रकाश मिळाल्याने माने दाम्पत्याच्या घराबरोबरच त्यांचा चेहराही आनंदाने उजळून निघाला.फलटणपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर बहुसंख्य दलित वस्ती असलेलं पावणेचारशे उंबरठ्यांचं सोनगाव. शेतमजुरी हेच बहुतेकांच्या उदरनिवार्हाचं साधन. त्यामुळे काही घरांत स्वातंत्र्यानंतरही वीज पोहोचू शकली नव्हती. वीजजोडणी घ्यायची म्हटली तरी त्यासाठी पैसे आणायचे कोठून? असा यक्षप्रश्न अनेकांसमोर पडलेला. रॉकेलवर तेवणारी चिमणी अन् कंदिलाचा अंधूक प्रकाश हेच त्यांचं प्रारब्ध होतं.अशावेळी आसपासच्या घरांतले विजेचे दिवे पाहून आपल्याही घरात वीज असती तर किती बरं झालं असतं, असा विचार या दाम्पत्याच्या मनाला स्पर्शून जायचा; पण स्वप्न व सत्यात अडसर होता तो आर्थिक परिस्थितीचा. अशातच ११ एप्रिल २०१७ ची सकाळ त्यांच्या आयुष्यात स्वप्नपूतीर्ची आस घेऊन आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ जयंतीनिमित्त केंद्र सरकारने ग्रामस्वराज्य अभियानातून विजेपासून वंचित असलेल्या मागास नागरिकांना सौभाग्य योजनेतून वीज देण्याचा कार्यक्रम हाती घेतला. माने दाम्पत्यासह ६५ घरे वीजजोडणीपासून वंचित असल्याचे आढळून आले. यातील एकही घर अंधारात राहू नये म्हणून महावितरणने सोनगावात तीनवेळा लाभार्थ्यांच्या बैठका, भेटीगाठी घेतल्या. या लाभार्थ्यांना ५ मेपर्यंत वीजजोडणी देण्याची कालमर्यादा शासनाने निश्चित केली होती. परंतु सूर्यवंशी व त्यांच्या सहकाºयांनी रात्रीचा दिवस करत मुदतीपूर्वीच काम पूर्ण केले. तब्बल ११ नवीन खांब व तारा बसवून ६५ घरांत त्यांनी प्रकाश पोहोचविला.वायरिंग पूर्ण झाल्यानंतर यशोदा माने यांनी बटन दाबताच दिवसाही एलईडी दिव्याच्या प्रकाशाने घर उजळून निघाले. त्यांचा आनंदी चेहरा पाहून महावितरणच्या कर्मचाºयांनाही कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळाले.