शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पाणीप्रश्न सोडवा; मगच गुडमॉर्निंग पथक फिरवा!

By admin | Updated: October 30, 2015 23:21 IST

दुष्काळी जनतेचा संताप : पिंपोडे बुदु्रक, वाठार स्टेशन भागात कारवाई

वाठार स्टेशन : हागणदारीमुक्त गाव या संकल्पनेतून ग्रामीण भागात शौचालय वापराबाबत शासनाने जागृत भूमिका घेतली असून यासाठी कोरेगाव पंचायत समितीमार्फत गेल्या दोन दिवसांपासून गुडमार्निंग पथक कार्यरत करण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्तात या पथकाने कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागातील पिंपोडे बुद्रुक गटात आसनगाव, सोनके, सोळशी, नांदवळ या गावातील ७ लोकांना पकडले व समज देऊन सोडून देण्यात आले. गुडमॉर्निंग पथकाने देऊर, पिंपोडे बुद्रुक, दहिगाव, तडवळे या गावांतील १६ जणांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात हजर केले. याच दरम्यान वाठार पोलिस ठाण्यात रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल आवळे यांनी पथकातील विस्तार अधिकारी घारे यांना या भागातील दुष्काळी परिस्थितीबाबत माहिती देत आधी या भागाचा पाणीप्रश्न सोडवा मगच लोकांवर कारवाई करा, अशी आक्रमक भूमिका घेतल्याने घारे यांनी तक्रार देण्याचे टाळले. पोलिसांनी सोळा जणांना समज देऊन सोडून दिले. शासन शौचालय बांधण्यासाठी जरी अनुदान देत असेल तरी मिळत असलेल्या अनुदानात शौचालय पूर्ण होत नाही. दुष्काळी भागातील गावांना शौचालयासाठी मुबलक पाणी देण्याचे काम ग्रामपंचायतींनी करावे, अशीच ग्रामस्थांची भूमिका आहे. (वार्ताहर)गेल्या वर्षी वाठारस्टेशनमध्ये गुडमॉर्निंग पथकावर सरपंचांनीच हल्लाबोल केला होता . यामागे गावचा पाणीप्रश्न हाच मुद्दा होता. याची पुनरावृती करण्याची वेळ आणू नये. पाणी प्रश्न सोडवा मगच कारवाई करावी, अन्यथा जशास तसे उत्तर देण्याची आमची भूमिका राहील. - अमोल आवळे, जिल्हा उपाध्यक्ष, रिपाइं शासनाचा शौचालयसक्ती हा उपक्रम स्तुत्य आहे. आम्ही याचा आदर करतो; परंतु ज्या पध्दतीने गुडमॉर्निंग पथक या लोकांना दमदाटी व अरेरावी करत आहे, हे योग्य नाही. - संभाजी कदम, ग्रामस्थ, देऊर