शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

मलकापुरात प्रदूषण मुक्त दिवाळीचा विद्यार्थ्यांचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 15:43 IST

सध्यस्थितीची गरज ओळखून पर्यावरण समतोल राखण्यासाठी येणाºया दिवाळीत फटाके न वाजविण्याची ४ हजार ४३८ विद्यार्थ्यांसह १७० शिक्षकांनी शपथ घेतली. बाहेरील खाद्यपदार्थांचा वापर टाळून प्रदूषण मुक्त व निरोगी दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला.

ठळक मुद्देसाडेचार हजार विद्यार्थ्यांनी घेतली शपथशिक्षकांचाही सहभाग, दहा हजार पत्रकांचे वाटपमळाईदेवी शिक्षण संस्थेकडून उपक्रम

मलकापूर, 11 : सध्यस्थितीची गरज ओळखून पर्यावरण समतोल राखण्यासाठी येणाºया दिवाळीत फटाके न वाजविण्याची ४ हजार ४३८ विद्यार्थ्यांसह १७० शिक्षकांनी शपथ घेतली. बाहेरील खाद्यपदार्थांचा वापर टाळून प्रदूषण मुक्त व निरोगी दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला.

येथील मळाईदेवी शिक्षण संस्थेकडून अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवत समाजप्रबोधन केले जाते. संस्थेच्या विविध शाखांमधे ४ हजार ४३८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर सर्व शाखांमधे १७० शिक्षक ज्ञानदानाचे काम करीत आहेत. मंगळवार, दि. १० रोजी सर्व शाखांमध्ये एकाचवेळी फटाकेविरहीत व प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची सामुदायिक शपथ घेण्यात आली.

फटाके वाजविल्यामुळे गंभीर आजार होतात. सर्वत्र कचºयाचे साम्राज्य निर्माण होते. अशा अनेक विघातक दुष्परिणामाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच दिवाळीसाठी बाहेरून खाद्यपदार्थ न आणता घरात बनविलेला फराळ करून आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेऊ या, असा संकल्पही यावेळी करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेचे सचिव अशोकराव थोरात म्हणाले, दिवसेंदिवस प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. फटाके वाजविल्यामुळे दिवाळीतच सर्वात जास्त प्रदूषण होते. हे टाळण्यासाठी समाजातील समाजकार्य करणाºया विविध संस्था व सर्व शिक्षण संस्थांनी समाजप्रबोधन करणे गरजेचे आहे. सर्वांनीच प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी प्रसार आणि प्रचार करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शरद तांबवेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले. एस. बी. शिर्के यांनी प्रास्ताविक केले. तर आर. आर. पाटील यांनी आभार मानले.दहा हजार पत्रकांचे वाटपमळाईदेवी शिक्षण संस्थेने प्रदूषण मुक्त दिवाळी का साजरी करावी? याबाबतचे एक पत्रक छापले आहे. हे प्रबोधन स्वत:च्या संस्थेपुरते मर्यादित न ठेवता त्याला व्यापक स्वरूप देण्यात आले आहे. अशी १० हजार पत्रके छापून तालुक्यातील विविध शाळांमध्ये वाटली आहेत. त्यामुळे खºया अर्थाने प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे.