शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

सातारा जिल्'ातील दोनशे ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा निर्मूलन प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 21:39 IST

सातारा : जिल्'ातील दोनशे गावांमध्ये घनकचरा निर्मूलन प्रकल्प उभारणीचे काम सातारा जिल्हा परिषदेने हाती घेतले आहे.

ठळक मुद्देगावांमधील कचरा कोंडाळे दूर होण्यास मदत होणार सोनगाव येथे मोठा कचरा डेपो

सातारा : जिल्'ातील दोनशे गावांमध्ये घनकचरा निर्मूलन प्रकल्प उभारणीचे काम सातारा जिल्हा परिषदेने हाती घेतले आहे. यासाठी सर्वच तालुक्यांतील ३ हजारांच्यावर लोकसंख्या असणाºया गावांची निवड करण्यात आली असून, गावांमधील कचरा कोंडाळे दूर होण्यास मदत होणार आहे.

शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये घनकचरा निर्मूलनाची गंभीर समस्या उभी आहे. साताºयासारख्या शहरात सोनगाव येथे मोठा कचरा डेपो आहे. मात्र, शहराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये कचºयाचा प्रश्न कायम आहे. काही ग्रामपंचायती घंटागाड्यांमार्फत कचरा उचलतात; परंतु त्यात सातत्य नाही. साहजिकच रोजचा निघणारा कचरा ग्रामपंचायतींनी सोय केलेल्या कचरा कुंड्यांत तसेच ओढ्यांत अथवा मोकळ्या जागेत टाकला जातो.

कचराकुंड्या ओसंडून वाहतात. भटकी कुत्री, डुकरे या कचºयांमधून अन्न शोधण्याचा प्रयत्न करत असतात. हाच कचरा पुन्हा रस्त्याकडेला येऊन पडतो.पावसाळ्यात तर प्लास्टिकच्या पिशव्या ओढे, नाल्यांमध्ये तुंबून राहतात. कुजलेल्या कचºयावर माशा, डास बसतात. त्याच माशा व डास नागरी वस्तीमध्ये उच्छाद मांडतात. लोकांचे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. कचºयाची ही समस्या दिवसेंदिवस डोके वर काढताना दिसत असल्याने जिल्हा परिषदेने घनकचरा निर्मूलनाचा अभिनव प्रकल्प हाती घेतला आहे.

संबंधित ग्रामपंचायतींनी हा कचरा घंटागाड्यांमार्फत उचलायचा. त्यासाठी थोडा वाढीव कर आकारला जाणार असला तरी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघून गावे सुंदर व स्वच्छ राहणार आहेत. गोळा केलेल्या कचºयावर ग्रामपंचायतींनी घनकचरा निर्मूलन प्रकल्प उभारावा, गांडूळ खत निर्मिती करून ते शेतकºयांना विकावे, त्यातून मिळणारे उत्पन्न गावच्या विकासासाठी वापरावे, असे नियोजन करण्यात आले आहे. 

प्लास्टिक कचºयाची समस्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी ग्रामपंचायतींनीच प्रबोधन करणे आवश्यक आहे. महाबळेश्वर तालुक्याला तर प्लास्टिकवर पूर्ण बंदी आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे आवश्यक ठरेल. घनकचरा निर्मूलन प्रकल्पासाठी जिल्'ातील सर्वच तालुक्यांच्या गटविकास अधिकाºयांना योग्य त्या सूचना करण्यात आल्या आहेत.- डॉ. कैलास शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद